Skip to main content

अध्यात्म विराम ४७

अध्यात्म विराम ४७
 
जगण्याच्या नादात मनुष्य अनेक चुकीच्या गोष्टी करत जातो. आयुष्यात त्या कदाचित जाणवत सुद्धा नाहीत. पण अंत समय आला की, आत्मा, ते सर्व चित्र मनचक्षू पुढे आणून, देहातील मन, बुद्धी आणि जाणीवा यांना जागृत करतो. सर्व चुका समोर येतात. माणूस पश्चात्ताप दग्ध होतो. पण त्यावेळी काहीही उपयोग होत नाही. मग यावर उपाय काय. भक्ती मार्गातील पुढील पायरी ईश्वराने विशेष करून या कारणाने जगताला दिली आहे. 

पादसेवन अर्थात श्रीहरी चरणात देह, बुद्धी, मन आणि अंतरात्मा या चारही मार्गांनी लीन होणे. म्हणजेच भक्ती मार्गातील प्रगती साधण्यासाठी, अंत समयीचा पश्चात्ताप चुकवण्यासाठी, शरणागत होऊन, लीनता अंगी बाणवून, आयुष्यातील प्रत्येक क्षण जगणं, हा सर्वात सोप्पा भक्ती मार्ग आहे. भगवंत हा सर्वश्रेष्ठ, सर्वकारक आहे. त्याच्या पुढे आपण शून्य आहोत, ही लीनतेची आणि शरणागत होण्याची, पाहिली पायरी आहे. 

मन हे सहसा परिस्थिती नुसार आपला पावित्रा, ठरवते. अर्थात परिस्थिती जशी असेल त्यानुसार वागणूक, विचार व मत बनवतं. त्यातही, विपरीत परिस्थितीत निराश, नकारात्मक आणि उत्तम स्थितीत उन्मादी असा दुहेरी नुकसानकारक पवित्रा मन घेतं. अनेकदा बुद्धी व देह, त्यानुसार साथ देत. अर्थात त्यामुळे, नुकसान मात्र प्रारब्धाचं होतं. 

याऊलट अनेक सर्वश्रेष्ठ व सत्पुरुष, कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनावर, परिस्थितीचा दबाव पडू न देता,परिस्थिती विपरीत वा उत्तम,कशीही असो आपल्या मनाचा हा समतोल ढळू देत नाहीत. म्हणजेच ते मनाला, कोणत्याही एका बाजूला झुकू देत नाहीत. हे तेंव्हाच शक्य होईल, जर मनाला उन्माद आणि विषाद दोन्ही भवरोग होऊ दिले नाहीत तर. हे त्याचं वेळी शक्य आहे, जेंव्हा मनाला परिस्थिती ऐवजी, एका अश्या ठिकाणी लीन करता येईल, जो वर्तुळाच्या संपूर्ण व्यासाचा केंद्रबिंदू असेल. 

असा केंद्रबिंदू, संपूर्ण ब्रम्हांडात एकच असू शकतो, तो म्हणजे, त्या वर्तुळ रूप ब्रम्हांडाचा निर्माता. या समस्त जगताचा, विश्वाचा आणि कल्पनेपलीकडील सर्व ज्ञात व अज्ञात सृष्टीचा एकच निर्माता आहे. तो म्हणजे नारायण हरी. ज्याला समस्त विश्व अनेकानेक नामांनी जाणतो, ओळखतो. त्या जगत पित्यापुढे,पूर्ण शरणागत असलेले, लीन असलेले, सदोदित विनम्र असलेले मन हे, देह व बुद्धी यांच्या प्रलोभनांना,अमिषाला,लोभाला,दुःस्थितीला अश्या कोणत्याही स्थितीला बळी पडणार नाही. 

अश्या या सर्व कारक पादसेवन, शरण रूप, लीन वृत्ती प्राप्त करून देणाऱ्या, भक्तीमार्गाच्या चवथ्या पायरीबद्दल उद्या सखोल चिंतन करूया. पण तोपर्यंत त्या विश्वरुप ईश्वराच्या नामाचं श्रवण, त्यांचं संकीर्तन आणि स्मरण करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...