अध्यात्म विराम ६६
आम्ही दासांचेही दास हा भाव, खरी भक्ती आणि खरं आत्मज्ञान झालेल्या भक्ताच्या हृदयात दृढ असतो. किंबहुना खरा भक्त तोच असतो, ज्याच्या मनातील स्व आणि ग पूर्ण नष्ट होऊन, त्या मनात लीनता, विनम्रता आणि शरणागत भाव वास करून असतात. मुळात मी कोण हा शोध जिथे संपतो, तिथेच खरी दास्य भक्ती सुरू होऊ शकतो. कोहम अर्थात मी कोण, हा शोध श्रवण भक्तीच्या पायरी पाशी सुरू होऊन, दास्यभक्तीच्या पायरीला तो शोध पूर्ण होतो.
दास झालेला भक्त हा आपलं हित अहित, लाभ हानी, चांगलं वाईट, या संकल्पना पार करून, पुढे आलेला असतो. त्या भावभावना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत. श्रवण भक्तीच्या सुरुवातीला, माझा, मी हा पूर्ण जागा असतो. पण जसजसं ईश्वराबद्दल ज्ञान प्राप्त होत जाते, तसतसा हा अज्ञान रूप धुक्याचा पडदा दूर होत जातो. तो पडदा दूर होण्यासाठी भक्ती मार्गाच्या या नऊ पायऱ्या,नेमून देण्यात आल्या आहेत.
कदाचित आत्मज्ञानाची सुरुवात मी कोण हे आधी न जाणता, मला या जगतात आणणारा कोण हे जाणण्या तून सुरू व्हावी, हीच योग्य मार्गक्रमणा आहे. कारण मी कोण हे जाणण्याआधी, ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान हा खरा आत्म ज्ञानाचा योग्य प्रवास असावा. कारण, या पंचमहाभूतरूप जगताचा निर्माता, स्वामी, मालक, पालक आणि सर्वस्व असलेला ईश्वर, हाच या जगातून पार होण्याचा आधार आहे, ही जाणीव, जागृत होणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे.
या श्रवण भक्तीने सुरू झालेला हा भक्तिरूप आत्मज्ञान यज्ञ, ईश्वरकीर्तन, ईश्वरस्मरण,ईश्वरचरणी सेवा, ईश्वराच्या कृपा प्राप्तीसाठी अर्चन, त्या दिव्य चरणांना नित्य वंदन करून, आपल्यातील मी आणि माझे या दोन स्वार्थ भावांना त्या चरणांशी अर्पण करून, त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना व वंदना करणं, हा ईश्वर अपेक्षित, भक्ताचा आत्मज्ञान प्रवास असावा. तरीही माझ्यातील मी आणि ग हे दोन भाव अहंकार रुपात शेष राहतात. ते मरणांती सुद्धा पाठ सोडत नाहीत. म्हणून त्यांना नामशेष करणं, हे प्रत्येक जडजीवाचं आद्य कर्तव्य आहे.
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
आम्ही दासांचेही दास हा भाव, खरी भक्ती आणि खरं आत्मज्ञान झालेल्या भक्ताच्या हृदयात दृढ असतो. किंबहुना खरा भक्त तोच असतो, ज्याच्या मनातील स्व आणि ग पूर्ण नष्ट होऊन, त्या मनात लीनता, विनम्रता आणि शरणागत भाव वास करून असतात. मुळात मी कोण हा शोध जिथे संपतो, तिथेच खरी दास्य भक्ती सुरू होऊ शकतो. कोहम अर्थात मी कोण, हा शोध श्रवण भक्तीच्या पायरी पाशी सुरू होऊन, दास्यभक्तीच्या पायरीला तो शोध पूर्ण होतो.
दास झालेला भक्त हा आपलं हित अहित, लाभ हानी, चांगलं वाईट, या संकल्पना पार करून, पुढे आलेला असतो. त्या भावभावना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत. श्रवण भक्तीच्या सुरुवातीला, माझा, मी हा पूर्ण जागा असतो. पण जसजसं ईश्वराबद्दल ज्ञान प्राप्त होत जाते, तसतसा हा अज्ञान रूप धुक्याचा पडदा दूर होत जातो. तो पडदा दूर होण्यासाठी भक्ती मार्गाच्या या नऊ पायऱ्या,नेमून देण्यात आल्या आहेत.
कदाचित आत्मज्ञानाची सुरुवात मी कोण हे आधी न जाणता, मला या जगतात आणणारा कोण हे जाणण्या तून सुरू व्हावी, हीच योग्य मार्गक्रमणा आहे. कारण मी कोण हे जाणण्याआधी, ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान हा खरा आत्म ज्ञानाचा योग्य प्रवास असावा. कारण, या पंचमहाभूतरूप जगताचा निर्माता, स्वामी, मालक, पालक आणि सर्वस्व असलेला ईश्वर, हाच या जगातून पार होण्याचा आधार आहे, ही जाणीव, जागृत होणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे.
या श्रवण भक्तीने सुरू झालेला हा भक्तिरूप आत्मज्ञान यज्ञ, ईश्वरकीर्तन, ईश्वरस्मरण,ईश्वरचरणी सेवा, ईश्वराच्या कृपा प्राप्तीसाठी अर्चन, त्या दिव्य चरणांना नित्य वंदन करून, आपल्यातील मी आणि माझे या दोन स्वार्थ भावांना त्या चरणांशी अर्पण करून, त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना व वंदना करणं, हा ईश्वर अपेक्षित, भक्ताचा आत्मज्ञान प्रवास असावा. तरीही माझ्यातील मी आणि ग हे दोन भाव अहंकार रुपात शेष राहतात. ते मरणांती सुद्धा पाठ सोडत नाहीत. म्हणून त्यांना नामशेष करणं, हे प्रत्येक जडजीवाचं आद्य कर्तव्य आहे.
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment