Skip to main content

अध्यात्म विराम ६६

अध्यात्म विराम ६६

आम्ही दासांचेही दास हा भाव, खरी भक्ती आणि खरं आत्मज्ञान झालेल्या भक्ताच्या हृदयात दृढ असतो. किंबहुना खरा भक्त तोच असतो, ज्याच्या मनातील स्व आणि ग पूर्ण नष्ट होऊन, त्या मनात लीनता, विनम्रता आणि शरणागत भाव वास करून असतात. मुळात मी कोण हा शोध जिथे संपतो, तिथेच खरी दास्य भक्ती सुरू होऊ शकतो. कोहम अर्थात मी कोण, हा शोध श्रवण भक्तीच्या पायरी पाशी सुरू होऊन, दास्यभक्तीच्या पायरीला तो शोध पूर्ण होतो.

दास झालेला भक्त हा आपलं हित अहित, लाभ हानी, चांगलं वाईट, या संकल्पना पार करून, पुढे आलेला असतो. त्या भावभावना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत. श्रवण भक्तीच्या सुरुवातीला, माझा, मी हा पूर्ण जागा असतो. पण जसजसं ईश्वराबद्दल ज्ञान प्राप्त होत जाते, तसतसा हा अज्ञान रूप धुक्याचा पडदा दूर होत जातो. तो पडदा दूर होण्यासाठी भक्ती मार्गाच्या या नऊ पायऱ्या,नेमून देण्यात आल्या आहेत.

कदाचित आत्मज्ञानाची सुरुवात मी कोण हे आधी न जाणता, मला या जगतात आणणारा कोण हे जाणण्या तून सुरू व्हावी, हीच योग्य मार्गक्रमणा आहे. कारण मी कोण हे जाणण्याआधी, ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान हा खरा आत्म ज्ञानाचा  योग्य प्रवास असावा. कारण, या पंचमहाभूतरूप जगताचा निर्माता, स्वामी, मालक, पालक आणि सर्वस्व असलेला ईश्वर, हाच या जगातून पार होण्याचा आधार आहे, ही जाणीव, जागृत होणं आवश्यक  आहे, असं माझं मत आहे.

या श्रवण भक्तीने सुरू झालेला हा भक्तिरूप आत्मज्ञान यज्ञ, ईश्वरकीर्तन, ईश्वरस्मरण,ईश्वरचरणी सेवा, ईश्वराच्या कृपा प्राप्तीसाठी अर्चन, त्या दिव्य चरणांना नित्य वंदन करून, आपल्यातील मी आणि माझे या दोन स्वार्थ भावांना त्या चरणांशी अर्पण करून, त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना व वंदना करणं, हा ईश्वर अपेक्षित, भक्ताचा आत्मज्ञान प्रवास असावा. तरीही माझ्यातील मी आणि ग हे दोन भाव अहंकार रुपात शेष राहतात. ते मरणांती सुद्धा पाठ सोडत नाहीत. म्हणून त्यांना नामशेष करणं, हे प्रत्येक जडजीवाचं आद्य कर्तव्य आहे.

यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...