Skip to main content

अध्यात्म विराम ८०

अध्यात्म विराम ८०
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
  
अनन्यतेने ईश्वराचं नित्य स्मरण, पूजन, अर्चन करत परि पूर्णतेने उपासना करतो, अश्या नित्याभियुक्त भक्ताचं सर्व क्षेम पाहण्याचा योग मी नित्य साधतो. अर्थात त्याचं क्षेम मी वाहतो. आता वाहतो किंवा वहाम्यहम म्हणजे नक्की काय याचा अर्थ नीट समजून घेऊ. वाहणे म्हणजे एखादी, वस्तू, व्यक्ती यांना आपल्या खांद्यावर घेऊन, एका स्थाना हून दुसऱ्या स्थानी घेऊन जाणे. यात नेणे आणि घेऊन जाणे असे दोन्ही शब्द वापरता आले असते. पण घेऊन जाणे हेच योग्य आहे. कसे त्याचा विचार करूया. 

शब्दाच्या अर्थाने दोन्ही मधे फार भेद नसला तरीही, सखोल चिंतन केल्यावर हा भेद लक्षात येईल. नेणे म्हणजे एखादं कार्य जे आपण मोबदला घेऊन, एखाद्या करारा अन्वये, केलेलं एखादं निश्चित स्वरूपाचं कार्य म्हणता येईल. म्हणजे ज्यासाठी आपण सांसारिक व प्रापंचिक जबाबदारी यासाठी किंवा स्वतःच्या उदर निर्वाहासाठी करत असलेल्या नोकरी, धंदा, व्यवसाय इत्यादी मधील एखादं कार्य, जे लिखित किंवा अलिखित स्वरूपातील करारानुसार, काही निश्चित मोबदला घेऊन पार पाडत असलेली जबाबदारी.जी करायला आपण काही मोबदला घेऊनच बाध्य असतो. अन्यथा त्यासाठी विनामोबदला, आपण काहीही कष्ट घेणार नाही.

उदाहरणार्थ एखाद्या नोकरीत ठिकाणी, आपण आधी करत असलेलं कोणतही काम, नोकरी सोडल्यावर, आपण करणार नाही. म्हणजे नेणे या शब्दाचा निश्चित अर्थ आपण जाणला. ज्यामधे जबाबदारी मर्यादित आणि मोबदल्या सह असते. आता घेऊन जाणे म्हणजे काय ते समजून घेऊ. जे कार्य एकतर आपण आपलं कर्तव्य, ऐच्छिक जबाबदारी, नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून किंवा कोणाला तरी वचनबद्ध आहोत म्हणून, विना मोबदला किंवा अल्प मोबदला, ज्याचा कामाच्या स्वरूपाशी काहीही संबंध नसेल असा अत्यल्प मोबदला, यासाठी पार पाडतो, त्याला घेऊन जाणे म्हणता येईल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर नेणे म्हणजे इती कर्तव्य आणि घेऊन जाणे म्हणजे नितिकर्तव्य. घेऊन जाणे यातील जबाबदारी अमर्याद आणि नैतिक असते.

नेणे यामधे आपण मनाने त्यात गुंतलेले असूच असं नाही. कारण ती इतिकर्तव्यता आहे. पण घेऊन जाणे यामधे आपला मनाने,दृढ संकल्पाने आणि मुख्यत्वे आत्मानंद प्राप्त होतो म्हणून गुंतलेले असतो आणि त्या आनंदासाठी ते कार्य करतो. नेणे यातील जबाबदारी तात्पुरती आणि कराराभिमुख असते. तर घेऊन जाणे यातील जबाबदारी, ही कायमस्वरूपी आणि मुख्य म्हणजे अपेक्षा रहित असते. (यावर उद्या विस्ताराने चिंतन करूया). 

आता प्रभूंनी वहाम्यहम हा शब्द का वापरला आहे, याचा निश्चित खुलासा यातून होतो. याच शब्दातून प्रभूंनी हे देखील ध्वनित केलेलं आहे की, वाहतो याचा अर्थ, मी त्या भक्ताच्या क्षेम व कुशल याची जबाबदारी, आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्या भक्ताच्या मोक्ष मुक्ती पर्यंतची जबाबदारी प्रभूंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. 

यातून हेदेखील लक्षात येतं की, प्रभूंनी घेतलेली ही जबाबदारी किंवा ब्रीद, हे आत्म्याबाबत आहे, देहाशी याचा काहीही संबंध नाही. म्हणूनच प्रभू ठामपणे सांगतात की ती जबाबदारी मी वाहीन. कारण ते स्वतःच जाणतात की देहापश्चात या कार्याला पुढे नेण्यासाठी, त्या आत्म्याला योग्य तो देह देऊन, हे कार्य पुढे न्याव लागेल. 

यावर अजूनही सखोल विचार आपण उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...