Skip to main content

अध्यात्म विराम ५९

अध्यात्म विराम ५९

मन हे कसं आहे याबद्दल काल चिंतन केल्यानंतर, आज बघुया की तेच मन स्मरण, अर्चन आणि वंदन या शुभ सात्विक कार्यात एकाग्र होऊन, लीन व शरणागत का होत नाही. मन हे कायम, ज्याच्या पाठी आपण त्याला नेण्याचा प्रयत्न करतो,त्या पासून नेहमी, दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतं. याचं महत्वाचं कारण मनात दडलेलं आहे. मन हे ओढून नेण्याचा प्रयत्न केल्यास, अवखळ खोंडा प्रमाणे किंवा खट्याळ वासरा प्रमाणे, दावणी सोडवून घेण्याचा प्रयत्न करतं. दावणी पासून सोडल्यास, उधळल जातं. 

सहजच आठवून पहा, शाळेत असताना, सलग दोन तीन तास गणित, शास्त्र, विज्ञान या विषयांचा अभ्यास करावा लागला की,मन कंटाळून जातं व त्या नंतरच्या तासाला आपलं लक्ष अजिबात लागत नाही. याला कारण एकतर ते वय,त्या विषयांचा असलेला कंटाळा आणि इतर विषयांची मनाला असलेली ओढ. पण त्याच वेळी, पुढचा तास, खेळाचा असेल, तर मनातील उत्साह द्विगुणित होतो आणि मनाला तीच ऊर्जा पुन्हा प्राप्त होते. म्हणजे आवड नसलेल्या गोष्टींमधे मन रमत नाही आणि तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करते. 

उलट आवडत्या विषयात मन उत्साहाने सहभागी होतं आणि दुप्पट ऊर्जेने विषयात रममाण होतं. ही आवडत्या विषयांची किंवा विषयांचीच आवड, हा मनाचा नैसर्गिक ओढा असतो. हा ओढा मन देह व बुद्धी यांना नावडत्या विषयात रममाण होऊ देत नाही. आता याच मनाला आपण, काही क्षण एखाद्या मंदिर वा ईश्वरीय चिंतनाच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला तर, काही क्षण सुद्धा ते शांत बसत नाही. पण आवडत्या विषयात मात्र पूर्ण ऊर्जा, उत्साह व शक्तीने एकाग्र होऊन, कार्य करते. 

आता मनाच्या याच अवगुणाला जाणून,नवविधा भक्तीच्या नऊ मार्गांची निर्मिती ईश्वराने करून ठेवली आहे. श्रवणात फक्त कानाचा उपयोग करून, त्या ईश्वराच्या नामाला, गुणांना ग्रहण करण्याचा प्रयास व सराव करत जावा. त्याच ईश्वरी गुणांची प्रशंसा व स्तुती कीर्तन या सामूहिक स्वरूपात करून, नेत्र, कर्ण, बुद्धी आणि मन त्या समूहात एकत्र आणून, विषयाच्या गोडी पासून, दूर नेण्याचा प्रयत्न करत जावे. तश्या प्रयत्नाने, निदान मूळ विषया पासून मन काही काळ दूर राहण्याचा सराव करू शकेल. हे सर्व मनाच्या मूळ ओढीच्या विरुद्ध करायचे असल्याने, जाणीवपूर्वक काहीही न करता, सहजच या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करावा. 

वरील दोन्ही पायऱ्यांवर मनाला नुसतं स्थिर स्थितीत, या ईश्वरीय विषयात शिरकाव करायला लावण्याचा सराव हळूहळू होत जाईल. इथपर्यंत आपण मनाला चुचकारलं नाही. पण तिथे नेऊन, आपण त्या विषयाबद्दल आवड लागावी असा जाणून बुजून प्रयत्न करत जावे. या स्थितीत आल्यावर, त्या ईश्वरीय नामचं, त्याच्या गुणांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करावा आणि कर्ण, नेत्र, बुद्धी यांनी जे श्रवण करून, साठवलं, त्याचं स्मरण करण्याचा सराव करावा. स्मरणातील सरावातून पुढे त्या चरणी मन स्थिर करण्याचा अभ्यास करावा. 

या पायरीपर्यंत, देहाची आणि मनाची नाळ जुळण्यास सुरुवात झाली असेल. मन चरणी स्थिर झाल्यानंतर, त्या ईश्वराच्या गुणांची अर्चना, करून त्या ईश्वर शक्तिला वंदन, नमन, करण्यात मन आपोआप स्थिर, शांत, ध्यानस्थ होईल. या स्थितीपर्यंत, कारण, नेत्र, बुद्धी, मन यांसह पूर्ण देहाचं त्या ठिकाणी स्थिर होण्याचा सराव आणि सवय होईल. मनाला या सहा पायऱ्यांचा नकळत पण, नित्य अभ्यास करायला लावल्यास,मन नक्कीच विषया तून बाहेर येऊन, मन ईश्वर चिंतनात रममाण होऊ शकेल. 

याचा नित्य सराव करत जाऊया आणि उद्या पुहील चिंतन सुरू ठेवूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...