Skip to main content

अध्यात्म विराम १२

अध्यात्म विराम १२
 
कलियुगात घडणाऱ्या अनेकानेक घटना आणि घटणारे पुण्यकर्म व मोल जाणून, ईश्वराने भक्तीचे नऊ मार्ग प्रस्थापित करताना, पाहिला क्रमांक श्रवण या भक्ती प्रकाराला देऊन, एकप्रकारे, कलियुगातील लाखो श्रद्धाळू जनांच्या पाप क्षालनाचा, परिमार्जनाचा आणि या जन्मातील उद्धाराचा मार्गच आखून दिला आहे. अनेक अर्थाने श्रवणाचं मोल हे अवर्णनीय आणि महत्वपूर्ण आहे.

मुळात या भक्ती मार्गाला प्रथम क्रमांक का देण्यात आला असावा, याचा आधी परामर्श घेऊ. बालक जन्माला आलं की, ज्ञानेंद्रियांपैकी, जे सर्वात प्रथम कार्यरत होतं, ते मस्तिष्क अर्थात मेंदू आणि तत्पश्र्चात कान. दुष्टी ही सुरवातीच्या काळात क्षीण असते आणि ती कालांतराने साधारण वर्षभरात, पूर्ण विकसित होते. पण श्रवण ज्ञान हे मूल गर्भात असतानाच चांगल्या प्रमाणात विकसित झालेलं असतं. 

याच कारणाने, बालकं गर्भात असतानाच, अनेक प्रकारच्या आवाजांना, मातेच्या आवाजाला प्रतिसाद देतात. निदान ती बालकं, तो आवाज, साद ऐकून तो ग्रहण करतात. ती ग्रहण करून, प्रतिक्रिया देण्याची वृत्ती गर्भातच बालकांना झालेली असते. कित्येक बालकं, काही विशिष्ट आवाजाना, सादांना प्रतिसाद म्हणून गर्भातून मातेच्या उदरावर लाथ मारतात. हा त्यांचा प्रतिसाद असतो.

म्हणजेच जन्माआधीच श्रवण इंद्रिय बऱ्याच प्रमाणात विकसित झालेलं असतं. त्याचसाठी मातेच्यामाध्यमातून, बालकाला उत्तम, संस्कारयोग्य विचार, कथन, स्तोत्र, मंत्र इत्यादी श्रवण करायला लावण्यात येतात. ही श्रवण ज्ञानाची शक्ती इतकी विकसित असते की, याचा उत्तम दाखला महाभारतात वाचायला मिळतो. 

आपण महाभारतात वाचल्या प्रमाणे,सुभद्रा पुत्र अभिमन्यूने, मातेच्या गर्भात असताना ऐकलेलं, चक्रव्यूह भेदाचं गुह्य, महाभारत युद्धात, योग्य त्या दिवशी स्मरून, त्या दिवशी होऊ शकणारा पांडवांचा पराजय टळू शकला. म्हणजेच ईश्वराने श्रवण इंद्रिय, अगदी गर्भातच विकसित करण्याचं खरं प्रयोजन आपण अल्प प्रमाणात जाणून घेतलं. 

परंतु याची महती अद्भुत आणि अलौकिक आहे. त्या श्रवणाचा उपयोग दैनंदिन व्यवहारात, सर्वच प्राणी करून घेतात. उदाहरणार्थ, कोणत्याही प्राण्याला, आपल्या भक्ष्याची चाहूल, आपल्या मार्गातील धोका, हे सर्व वनात, दिसण्याआधी, कानाने ऐकू येते. 

त्याबाबत त्यांची ग्रहण क्षमता अत्यंत विकसित असते आणि छोट्यातील छोटे आवाज, ऐकून, त्यानुसार कृती करून, भूक आणि भय ही दोन मुख्य कर्म साधण्याची क्षमता आणि हेतू, श्रवण या ज्ञानग्रहण प्रकारात, सर्वच प्राणी साधतात. 

श्रवण ज्ञानाबद्दल, मूलभूत माहिती जाणल्यावर, याची अजून उपयुक्तता, माहिती, उपयोग, महती, फलश्रुती उद्याच्या भागात जाणून घेऊया. तोपर्यंत ईश्वराच्या नामाच्या, गुह्यतेचं श्रवण करण्याचं पुण्यकर्म करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...