Skip to main content

अध्यात्म विराम १३

अध्यात्म विराम १३
 
श्रवण भक्तीच्या विषयातून, जरा मागे जाऊन, खोलातून हा विषय जाणून घेऊया. विश्वाची निर्मिती करताना, विधात्याने निसर्ग नियम निर्मिती केली. हे पूर्ण विश्व नव्हे तर ब्रम्हांड या नियमात बांधून टाकलं. प्रत्येक गोष्टी मागे कारणं आणि नियम आहेतच, ज्याला आधुनिक जगत विज्ञान असं म्हणतं. 

पण ते म्हणताना हे पूर्ण विसरून जातं की हे आपोआप निर्माण होऊच शकत नाही. नियमांनी बद्ध माणसाचं आयुष्य सुद्धा आहे. नव्हे या विश्वातील प्रत्येक वस्तू सजीव आणि निर्जीव प्रत्येकाला नियम आहेत. अगदी पंचमहाभूत रूप तत्व, ज्यातून, देहनिर्मिती करून ईश्वराने आपल्या अंशाला या भूतलावर प्रस्थापित केलं, त्यांना सुद्धा नियम आहेत. 

हे करतानासुद्धा विशिष्ट नियमातून, देह निर्माण होईल, तो वाढेल, त्याचा ठराविक वयात ठराविक विकास होईल आणि त्याद्वारे, त्या देहाच्या मूलभूत गरजा, आवश्यकता भागण्यासाठी, पुढे जाण्याचे मार्ग मिळण्यासाठी नैसर्गिक रित्या बदल होतील, ही व्यवस्था निर्माण करून देण्यात आली. त्याच व्यवस्थेतून, त्या दयाळू, चाणाक्ष, चलाख ईश्वराने तशीच व्यवस्था,देहातील आत्म्याला आपल्या पर्यंत पोचण्यासाठी, निर्माण केली. 

त्याच व्यवस्थेतून, इश्वरापर्यंत पोचण्याच्या मार्गाला अनेक वाटा, उपवाटा, स्थानं, हे सर्व सापडत गेलं. यातील काही माध्यमं, उपाय हे, त्याच विधात्याने शब्दबध्द करून, वेद रुपात जगाला प्रदान केलं.त्यातून अनेक ज्ञानी जन, विद्वान यांनी त्या ज्ञानाचा, त्या माध्यमांचा, मार्गांचा उपयोग करून, ईश्वरा पर्यंत जाण्यात यश मिळवलं. अर्थात यामध्ये त्या स्वयंभू शक्तीने नक्कीच सहाय्यता केली.

कारण एक तत्व जे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे, जो स्वतःची मदत करू शकतो, त्याला ईश्वर वेळप्रसंगी सहाय्य जरूर करतो. ईश्वराप्रप्ती जाण्याच्या या मार्गाचे नियम, निती हे निर्माण होतानासुद्धा, नैसर्गिक नियमांचाच उपयोग करण्यात आला आहे. म्हणजे या ज्ञानाच्याच माध्यमातून, ईश्वरी सहाय्याने निर्माण झालेल्या आणि इश्वराकडे नेणाऱ्या मार्गाचा क्रम हा नैसर्गिक आहे. 

ते मार्ग सुद्धा नऊ आहेत. कोणत्याही एका मार्गाने, जीव त्या सर्व शक्तिमान, शक्तीपर्यंत पोहचू शकतो. त्यांचा क्रम लावताना, निसर्गाच्या याच नियमातून त्या मार्गांची कशी रचना झाली, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...