Skip to main content

अध्यात्म विराम ७८

अध्यात्म विराम ७८
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।

योगक्षेम म्हणजे सर्वसाधारण अर्थाने, उदरनिर्वाह, चरितार्थ, आयुष्याचा मार्ग असा अर्थ निघतो. म्हणजे आपल्या जीवनाची गाडी सुरळीत सुरू आहे, आयुष्यातील खाचखळगे फारसे नाहीत अशी स्थिती म्हणजे क्षेम कुशल. सर्व काही सामान्य स्थितीत आहे म्हणजे कुशल आहे असा अर्थ आपण काढतो. आयुष्यात अपेक्षा, आकांक्षा, इच्छा कामना या अनेक रुपात उभ्या असतात. माणूस आपल्या आयुष्यात, त्यांना आकार देऊन, त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यासाठी आवश्यक कष्ट, त्रास, प्रयत्न व कर्म करत राहतो.

तरीही अशा कितीतरी अपेक्षा अर्धवट किंवा अपूर्ण अवस्थेत राहतात आणि या देहातील आयुष्य संपून, आत्मा देह सोडून निघून जातो. कारण त्याचा, प्रत्येक देहात थांबण्याचा कालावधी ठरलेला असतो आणि तो काळ संपला की, आत्म्याला तिथून निघावं लागतं. पण मूळ अपेक्षा इच्छा शिल्लक राहून, आत्मा त्यांच्या पूर्णते साठी पुन्हा नवीन देहाच्या शोधार्थ फिरायला जातो. पण ही अतृप्त भावना आत्म्यातील मनोमय कोषाला पुढील जन्मात देहाला, बुद्धीला, मनाला कार्याला लावते. 

पण तरीही या सर्व त्रासात, कुशल आणि क्षेम ही व्यक्तीपरत्वे आणि समयानुसार बदलणारी संकल्पना आणि संज्ञा आहे. म्हणजे, या अतृप्ती मुळे, खरी क्षेम व कुशल भावना, कधीही पूर्ण स्वरूपात व कायम स्वरूपी, माणसाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे सर्वसाधारण प्रापंचिक जीवनात, जीव कधीही पूर्ण तृप्त वा पूर्ण समाधानी असू शकत नाही, असं साधारण चित्र बघायला मिळतं. कारण काही प्राप्त झालं तरी, काहीतरी राहिल्याची आणि काहीतरी सुटल्याची खंत, रुखरुख राहून जाते म्हणजे प्राप्त झालेली गोष्ट सुद्धा समाधान देऊ शकत नाही. 

हा हव्यास व प्राप्तीचा ओढा, माणसाला, आयुष्यभर, झुलवत ठेवून, अंती त्याच अतृप्त मनिषेत, देह सोडायला भाग पाडतो. क्षेम व कुशल या संज्ञा प्रातिनिधिक न राहता विशिष्ट काळी, स्थळी व वेळी मनाला भासणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे खरं समाधान व खरी तृप्तीची भावना, माणूस क्षणिक अनुभवू शकतो. पण मग, ईश्वराला अभिप्रेत क्षेम कुशल नक्की काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. या सर्वातून एक बोध नक्की होतो की, आपल्याला अपेक्षित असलेले क्षेम व कुशल हे भाव, जर ईश्वराच्या मनात असतील तर, ईश्वराला स्वतः भूवर उतरून, प्रत्येक माणसाची निर्माण होईल, ती इच्छा पूर्ण करत बसावं लागेल. 

याचाच अर्थ क्षेमकुशल करीन किंवा योगक्षेम वाहिन असं ज्यावेळी ईश्वर म्हणतो, त्याला त्याचं श्लोकातील आधीच्या भागाची पार्श्वभूमी आहे. फक्त ईश्वर हा एकच आधार मानून, त्याच्या नित्य स्मरणात, चिंतनात राहून, त्याची पूर्णतेने उपासना करणारा जीव, जीवनाकडून फार अपेक्षा न ठेवणारा, अल्पसंतुष्ट अल्प समाधानी असतो. त्याला मिळेल त्यात, प्राप्त होईल त्यात कोणतीही तक्रार असतं नाही. कारण हे घडेल ते ईश्वराच्या इच्छेने आणि जे मिळणार नाही, घडणार नाही तेसुद्धा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे, हा भाव त्या नित्याभियुक्त जीवाच्या ठायी दृढ असतो. 

ईश्वराच्या संकल्पनेतील योगक्षेम या विषयावर आपण उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया. पण हे चिंतन करताना, त्याचं ईश्वराचं चिंतन करायला विसरता कामा नये.
 
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...