Skip to main content

अध्यात्म विराम ८

आध्यात्म विराम ८

कालच्या भागात सांगितलेला मार्ग कोणता, यावर विचार करण्या आधी, या संदर्भात काही गोष्टींचा विचार करून मग पुढे जाऊया. या विश्वातील जीवांची गणना, काही ठळक विभागात मांडण्याचा प्रयत्न आपण करूया. अशी गणना याआधी कोणी मांडली असेल तर त्याची मला कल्पना नाही. पण आपण प्रयत्न करून बघुया.

कर्म मार्गात रत जीव, जे चांगलं वाईट असा भेद न करता, समोर येईल त्या परिस्थितीत प्राप्त आणि योग्य वाटलेलं कर्म करून, मोकळे होतात. जे जीव बऱ्याच प्रमाणात असण्याची शक्यता असावी. यांचा उद्देश आयुष्याच्या वाटेवर, ज्या स्थितीत आहोत, तिथे परिस्थितीवश जे योग्य वाटतं, ते कर्म करत राहणे आणि आपलं या देहातील जीवन समाप्त झाल्यावर, गमन करणे. हा पहिला आणि प्राथमिक जीव प्रकार. 

दुसऱ्या प्रकारातील जीव हे मायेने, षडरिपूनी ग्रस्त आणि त्या प्रभावात मस्त होऊन, जे आपल्या लाभासाठी उत्तम वाटेल तेच कर्म करत राहणे. या जीवांना भ्रष्ट आचार, विचार व उच्चार यांची फिकीर नसते आणि आपल्या हिताच्या आड येणाऱ्या गोष्टी न करता, फक्त आपल्या स्वार्थी हितासाठी आणि स्वार्थासाठी काही करण्यास हरकत नाही, अशी वृत्ती, यांनी बाळगलेली असते. कदाचित प्राण्यातील हिंस्त्र श्वापद श्रेणीतून, मनुष्य योनीत आलेले जीव अश्या वृत्तीचे असू शकतात, असं माझं मत आहे. 

तिसऱ्या प्रकारात, कर्माची, संचीताची आणि प्रारब्धाची अगतिकता यांना जाणवते, त्रास देते. पण त्याला डावलून पुढे जाण्याची हिंमत व आत्मविश्वास नसल्या कारणाने, हे जीव परिस्थिती स्वीकारून आपलं नित्य कर्म करत राहतात. हे जीव परिस्थिती ग्रस्त असले तरी कोणतीही योग्य वा अयोग्य गोष्ट किंवा कर्म अज्ञानापोटी करत नाहीत. हे थोड्या प्रमाणात प्रगत जीव असतात. 

चवथ्या प्रकारात जीवात्मा काहीसा प्रगत असतो. त्याला प्राप्त परिस्थिती, त्याची गतकर्माशी असलेली सांगड वा संबंध यांबद्दल एकवेळ ज्ञान नसेल. पण आपल्याला जे प्राप्त झालं, होतंय, वा होईल हे आपलं विधिलिखित आहे किंवा जे आपल्याला प्राप्त होणं योग्य आहे, तेच आपल्या पर्यंत आलं, येतय व येईल, हे ज्ञान वा जाणीव त्यांना असते. कर्मगतीच्या मार्गात, आपल्या उत्तम कर्मांनी, पुढे पुढे जाणारे हे जीव असतात. ज्ञानाची शिदोरी यांना नसेल, पण कर्माची जाण यांच्याकडे उपजत असते. हा त्यांच्या पूर्वकर्माचा लाभ असतो. 

अजूनही काही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. जे जाणल्यावर, ईश्वरी मार्गाचा बोध लवकर होईल. पण तोपर्यंत आपण कर्म, धर्म यांसह ईश्वराच्या नामाचे मर्म जाणून, त्याचे अनुसंधान करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...