Skip to main content

अध्यात्म विराम ९

आध्यात्म विराम ९
 
पाचव्या प्रकारात, अजून काही प्रमाणात प्रगत असलेला जीवात्मा, कर्माचा फेरा जाणतोच, पण त्यातील इष्ट आणि अनिष्ट कर्म, यांच्यामुळे भविष्यात प्राप्त होऊ शकणारे इष्ट व अनिष्ट फल सुद्धा जाणतो. यांना अनिच्छेने केलेले अनिष्ट कर्म त्रास देत राहते. ते कर्म टाळण्याची त्यांची इच्छा अनिवार असते. पण अनिवार्य परिस्थितीत, अत्यंत अगतिकतेने घडलेली किंवा करावे लागलेली कर्म, यांना एक प्रकारचा गंड देतात आणि मनाला क्लेश देत राहतात. 

यांचा आत्मिक ओढा, असे अनिष्ट कर्म, न करण्याकडे असतो. पण अत्यंत अपवादात्मक स्थितीत, यांच्या कडून असे कर्म घडू शकते. अन्यथा, अश्या व्यक्तींच्या हातून, इष्ट कर्मेच प्रामुख्याने होतात. भोगांचं प्राप्त होणं हे आपल्या कर्मानुसार आहे, हे ते जाणून असतात. याच प्रमाणे, उपभोग हे मर्यादित स्वरूपात उपभोगासाठी आहेत, याची जाणीव त्यांच्या ठाई नित्य असते. असे जीव मायेच्या प्रभावात क्वचितच येतात. 

सहाव्या प्रकारातील आत्मे हे, अनेक रूपांने, अर्थाने आणि बऱ्याच प्रमाणात प्रगत असतात. त्यांना आत्म प्रवासातील, त्यांचा टप्पा समजलेला असतो. ज्या मार्गाने जायचे आहे, तो मार्ग सापडलेला असतो.अनेक जन्माच्या पुण्याईचे फलरूप, त्यांना जाणिवेचा, एक विशिष्ट टप्पा गाठता आलेला असतो. त्या योगे त्यांना काय योग्य केल्याने आपण या जन्मात पुढील टप्प्याकडे किंवा पुढील पायरीवर जाऊ शकतो, ते ज्ञात झालेले असते. 

अनेक पुण्यकारक गोष्टी यांच्या हातून घडलेल्या असतात आणि घडणार असतात. काही अद्भुत अगम्य आणि अलौकिक प्रकारचं सहाय्य, त्यांना ईश्वरीभूत शक्तिकडून प्राप्त होत असतं आणि होणार असतं. सद्गुरू यांच्यावर विशेष कृपादृष्टी ठेवून असतात. जनहिताची व जन सामान्यांना पुढील टप्प्याकडे नेण्यासाठी किंवा ईश्वरी इच्छा व संदेश सर्वसामान्य जीवांना प्राप्त होण्यासाठी संत सज्जन व ईश्वर, या अश्या लोकांचा उपयोग सत्कार्य करतात. 

यांच्या पूर्व संचितातील काही शिल्लक कर्मामुळे, यांना आपल्या हातून घडणाऱ्या अश्या पुण्यकारक गोष्टींची माहिती होत नाही, किंवा तशी ती न व्हावी, या ईश्वरी इच्छेने असेल, पण यांच्या हातून घडणारे कार्य, हे जाणत नाहीत किंवा त्यांना तसं जाणवू दिलं जातं नाही. यांची मती, वासना, इच्छा, आकांक्षा क्षणिक मायेने ग्रासलेल्या भासतात, पण गुरुकृपेने त्यांना त्याची बाधा होत नाही किंवा कर्म बद्धता येत नाही. 

अजूनही काही प्रकार आपण पाहणार आहोत, पण ते उद्याच्या भागात. तोपर्यंत आपण सद्गुरूंच्या आणि ईश्वराच्या अलौकिक संनिध्याचा आनंद घेऊ आणि त्यांच्या नामात रत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...