Skip to main content

अध्यात्म विराम ४३

अध्यात्म विराम ४३

ईश्वरी नामाच्या स्मरणाचा अजून एक लाभ आणि स्मरणाच्या या प्रदीर्घ अभ्यासाचं सार म्हणजे ईश्वराच्या अर्थात ईश्वरी नामाच्या लहरी नित्य श्रुतीवाटे, कीर्तन, प्रवचन, भजन या मार्गाने,मेंदू, मन यातून, हृदयी पोचल्या तर त्या नित्य चिंतनात राहतात. नित्य चिंतनात राहिल्या तर, त्यांचा नित्य अभ्यास होतो आणि नित्य अभ्यासल्या जातात.

नित्य अभ्यासल्या गेल्या तरच, अंतसमयी त्या स्मृतीतून, मनाच्या पृष्ठ पटलावर येऊन, अंत समय साधला जाऊ शकतो. म्हणून नित्य ईश्वरी नामाचा अभ्यास, जागर करत जाणं हेच प्रत्येक आत्म्याच्या हिताचं आहे आणि तोच ईश्वराचा,आत्म्याला,मानवी देह देण्याचा,अंतिम उद्देश सुद्धा आहे. तो साध्य करावा. अजून एक कारण यामधे ध्यानात घ्यायला हवं, ते म्हणजे ईश्वरी नामाच्या लहरी, या समस्त विश्वात शुद्ध, सकारात्मक, गुणातीत, वृत्तिरहित आणि मायेच्या पार असतात.

याचा मतितार्थ असा की, ईश्वरी नामाच्या स्मरणात उत्पन्न लहरी या, कोणत्याही गुणांनी बद्ध होत नाहीत. त्यांना वृत्ती,विकार,वासना,मनातील, कलह, इत्यादी कोणत्याही गुणांनी किंवा अवगुणांनी बाधा किंवा बद्धता येऊ शकत नाहीत. म्हणजेच आपण जर एखादा विचार करत असू तर, इतर कोणताही विचार, विकार इत्यादी त्या विचारांना छेद देऊन, आपलं विचारचक्र थांबू शकत नाही. इतकं बल त्या ईश्वर स्मरणात असतं. 

या उलट इतर वेळी, सुरळीत चाललेले आपले विचार सहज भरकटात. मुळात हे विचारांचं भरकटून जाणं, अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. पण यामधे एक समान धागा असतो,तो म्हणजे, काही कारणाने, आपण करत असलेल्या विचारांची जागा, एखादा नवीन विचार घेतो आणि मग मूळ मुद्दा वा विचार बाजूला राहतो. म्हणजे ज्यावेळी आपण सकारात्मक राहण्यासाठी, प्रयत्न पूर्वक उत्तम विचार जोपासतो, त्यावेळी इतर अनेक विचार आपली मान वर काढतात.

पण हे सर्व तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा, या मर्त्य जगातील कोणताही विचार आपण करत असू. जर हाच विचार ईश्वराच्या नामाच्या स्मरणातून आलेला असतो, तेंव्हा त्या लहरींना ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालेलं असतं. अश्या उच्च पातळीवरील विचार लहरी, अत्यंत सात्विक, शुद्ध तर असतातच. पण पूर्ण सक्षम व शक्तिमान असतात. 

असो, स्मरणाबद्दल आपण हेच चिंतन उद्याच्या भागात सुरू ठेवूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...