Skip to main content

अध्यात्म विराम ३०

अध्यात्म विराम ३०

कालच्या लेखात आपण पाहिलं की, ईश्वरी नामाच्या लहरी, या दुधारी असतात. याला शास्त्रीय कारण आहे. प्रत्येक लहरींच्या मागे, त्या लहरींचा कर्ता जो असेल, त्याच्या शक्ती आणि उर्जेच तेज पाठीशी असतं. ज्याला driving force म्हणता येईल. हे सर्वश्रुत शास्त्रीय सत्य आहे. श्रीमद् भागवतगीतेतील सिद्धांता नुसार, प्रत्येक कर्म, अर्थात त्या कर्माच्या लहरी, आपल्या लक्षापर्यंत पोचून, पुन्हा कर्त्यापर्यंत तितक्याच वेगाने माघारी येतात, आणि आपलं फलरुप कार्य पूर्ण करतात. 

यालाच न्यूटन या पाश्चात्य वैज्ञानिकाने, 3रां सिद्धांत या स्वरूपात मांडलं आणि जगाने त्याला मान्यता दिली. सिद्धांत असा होता, Every action has equal and opposite reaction. हा सिद्धांत, पूर्णपणे श्रीमद भगवद्गीतेतील याचं कर्मासिद्धंतावर आधारित आहे. 

असो आता मुद्द्यावर येऊया. सर्वसामान्य पणें आपण कर्म करतो, त्यावेळी, त्या कर्म लहरींची शक्ती व ऊर्जा त्या कर्माला लक्षप्रत नेऊन, पुन्हा कर्त्याकडे त्याचं वेगात परत येतात. हे सर्वसामान्य कर्म, त्याचं लक्ष आणि त्या कर्माचा प्राप्त फलरुप प्रतिसाद याबद्दल झालं. 

पण जर तेच कर्म शुद्ध सात्विक व सकारात्मक ईश्वरी असेल आणि लक्ष, म्हणजेच स्वतः ईश्वर असेल, जो स्वयंसिद्ध व ब्रम्हांडातील किंवा भुलोकीच्या नियमांबाहेर आहे, तर तो स्वयंसिद्ध परमात्मा, त्याचं लहरींना आपल्या ऊर्जेच व शक्तीच बल प्रदान करून त्या लहरी परत कर्त्याकडे दुप्पट शक्ती व ऊर्जा प्रदान करून पाठवतो. 

भूलोकीच्या नियमाबाहेरील म्हणजे त्रिगुणा पलिकडे (गुणत्रयात्तीता- सत्व रज तम), तीन देहा पलीकडे (देहत्रयातीता- स्थूल, सूक्ष्म आणि कारण), तीन अवस्थां पालिकडे (अवस्थात्रयातीता- जागृती, स्वप्नं आणि सुषुप्ती), तिन्ही काळापलीकडे (कालत्रयातीता - भूत, वर्तमान आणि भविष्य) असा जो परम ईश्वर आहे तो, नक्कीच, त्याच्यासाठी आणि त्याच्या पर्यंत पोचलेल्या लहरींना, आपल्या ऊर्जेने व शक्तीने यथायोग्य प्रतिसाद देईल. 

साधारणतः नकारात्मक लहरी या जास्त शक्ती शाली असतात, हे आपण मागेच, भोग आणि ईश्वर मधे अभ्यासल आहे. पण सकारात्मक आणि सत्शील लहरी या, त्यामानाने दुबळ्या असतात. म्हणूनच जास्त प्रमाणात प्रसारित कराव्या लागतात. पण हा सिद्धांत व नियम, विश्वातील आणि ब्रम्हांडातील शक्तीला लागू होतो. 

यावर अजूनही सखोल चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत श्रवणातून नित्य सात्विक लहरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहूया 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...