Skip to main content

अध्यात्म विराम १७

अध्यात्म विराम १७
 
गर्भातील श्रवण ज्ञान, विधात्याने किती उच्च दर्जाचं आणि श्रेणीचं दिलं आहे. याचं अजून एक उदाहरण देता येईल. मधे एक क्लिप पाहण्यात आली. ज्यामधे, एका तान्ह्या बाळाची आई त्याच्या जन्मा पश्चात मृत्यू पावली. मरणांती, अवयवदानाने तीचं हृदय, एका हृदय रोग्याला बसवण्यात आलं. नंतर त्या रडत असलेल्या तान्ह्या बाळाला, वेगवेगळ्या लोकांनी, शांत करण्यासाठी घेतलं. 

पण ते शांत होईना. नंतर ज्या व्यक्तीला, त्याच्या आईचं हृदय बसवण्यात आलं होतं, त्या व्यक्तीने उचलून छाती जवळ धरताच, ते रडणारं बाळं, एकदम शांत झालं आणि हसायला लागलं. तात्पर्य, त्याने त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके ओळखले. जे त्याने, गर्भात असताना ऐकले होते. याचाच अर्थ, गर्भात ऐकलेलं, नंतर काही काळ तरी नक्कीच आठवू शकतं. 

माझ्या एका मैत्रिणीच्या नातवाबाबत, असाच काहीसा प्रकार आहे. त्याने गर्भात असताना, त्याच्या आईकडून, रामरक्षा ऐकली होती. आज एक वर्षाचा झाला तरीही, ज्या ज्या वेळी तो रडतो किंवा झोपत नाही, त्या त्यावेळी त्याला रामरक्षा म्हटल्यावर, आराम पडतो आणि झोप पण लागते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, श्रवण ज्ञान हे विधात्याने, गर्भातच प्रगत अवस्थेप्रत निर्माण करून, समस्त मानव जातीला, याचा लाभ जन्मा आधीपासून घेण्याची सवलत किंवा सोय करून दिलेली आहे. 

आता श्रवणाच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. यात फक्त मेंदू कार्य करतो असा अर्थ घेतला तर, तोच मेंदू पूर्ण विकसित होत जाताना, या आधीचे गर्भात असताना ऐकलेले आवाज इत्यादी, का लक्षात रहात नाही. खरंतर मेंदू हा अत्यंत प्रगत संगणक आहे. त्यातील पेशी अर्थात चिप्स मधे, अत्यंत अमर्यादित क्षमता आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी किंवा याबद्दल माहिती काढली की वाचायला मिळेल. 

पण तरीही, गर्भातील ते श्रवण ज्ञान, क्वचित एखाद्या बाबतीत, अभिमन्यू सम लक्षात राहू शकतं. अन्यथा, बऱ्याचवेळा मुल मोठं होताना, ते ज्ञान पुसलं जातं. म्हणजे नक्की काय होतं. तर मेंदूत साठवलेल्या या गोष्टी मागे पडतात. किंवा त्यांच्यावर इतर अनेक आठवणींचा पडदा पडत जातो. पण याकडे आपण वेगळ्या प्रकारे बघुया.

गर्भात असताना आणि लगेच काही दिवसात वा महिन्यात (आदमासे २ ते ३), त्या आठवणी ताज्या असतात. त्या पूर्ण शुद्ध स्वरूपात असतात. त्या जाणीवेच्या सर्वात वरच्या थरावर असतात. कारण त्यावेळी आत्मा आणि शुद्ध स्वरूपातील मन, देहाला चालवत असतात. त्यामुळे श्रवण या एकमेव क्रियेने प्राप्त ज्ञान, मूळ स्वरूपात मन आणि आत्मा यांच्याकडे पाठवलं जातं. 

म्हणून ते मन, आत्मा शुद्ध असेपर्यंत, मनात, आत्म्या जवळ तसच्या तसं टिकून ठेवतं. जसजशी हि शुद्धता, प्रापंचिक, भौतिक ज्ञानाने गडद होत जाते, तसतशी या शुद्ध ज्ञानावर, अशुद्धीची पुटं चढत जातात. यावर उपाय काय किंवा कश्याप्रकारे ही शुद्धता पुन्हा प्राप्त करता येऊ शकते, यावर उद्या, चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...