Skip to main content

अध्यात्म विराम २५

अध्यात्म विराम २५

श्रवणात आलेल्या सर्वच ध्वनीच्या लहरी कानावाटे मेंदू पर्यंत घेऊन जाणं, हे देह आणि देहातील यंत्रणा यांचं कामच आहे. पण त्यातील सर्वांना प्रतिसाद देणं, हे एका ठराविक काळापर्यंत आपल्या देहाच्या नित्य कर्माचा भाग असतो. जसं एखादं लहान मूल,कानावर आलेल्या प्रत्येक सादाला प्रतिसाद देतं. कारण ते अज्ञानी असतं आणि ज्ञान ग्रहण प्रक्रियेत असल्यामुळे, ते प्रत्येक आवाजाला प्रतिसाद देणार, हे नैसर्गिक आहे.

परंतु जसजसं ते मूल मोठं होत जातं, तसतसं त्याला कळत जातं की, कोणता आवाज आला की काय प्रतिसाद द्यायचा. सर्वात प्रथम कोणतंही मुल आपल्या आईच्या आवाजाला, ओळखून, त्याला सर्वात आधी प्रतिसाद देतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ज्ञानाने, त्या मुलाला, एक पूर्ण माणूस होईपर्यंत, किती कधी, का, कसा प्रतिसाद द्यायचा, हे समजतं. 

म्हणजे जाणीवा जसजश्या जागृत होतात, उमलत जातात किंवा व्याप्त होतात, त्याप्रमाणे माणूस त्या त्या सादाला प्रतिसाद देतो.यात शांत राहून,मूकपणे न दिलेला प्रतिसाद हा सुद्धा प्रतिसाद आहे, हे ध्यानात असू द्या. हा साद प्रतिसाद खेळ माणूस अज्ञानी ते ज्ञानी व प्रगल्भ या सर्व पायऱ्यांवर वेगवेगळा असतो. 

उथळ प्रतिसाद ते विचारपूर्वक व विवेकाने दिलेला किंवा शांत राहून, न दिलेला प्रतिसाद या अनेक पातळीवर तो असू शकतो. पण या पायऱ्या ज्ञानाने चढाव्या लागतात. म्हणजे ज्ञान माणसाला त्याचा प्रतिसाद मोजका, नियंत्रित आवश्यकतेनुसार देण्यास, शिकवतं. म्हणजेच श्रवणात कानामार्गे ऐकण्यात आलेल्या प्रत्येक ध्वनीचा वेध घेऊन, त्याला प्रतिसाद देण्यापासून, तो प्रतिसाद न देण्यासाठी कानावर आलेल्या ध्वनीला ऐकून न ऐकल्या सारखं करणं, हे देखील मनुष्य साधू शकतो. 

सांसारिक, व्यावहारिक पातळीवर या सर्व गोष्टी घडत असतात आणि घडत राहणार. यातील ज्ञान म्हणजे सांसारिक, प्रापंचिक व व्यावहारिक पातळीवरील ज्ञान असं आपण गृहीत धरलं, तरीही याचा पारमार्थिक बाबींसाठी उपयोग कश्याप्रकारे होऊ शकतो, हे आपण पुढील भागात पाहूया. 

आपण सध्या श्रवण या पहिल्या भक्तीमार्गाचा सखोल अभ्यास करत आहोत. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...