Skip to main content

अध्यात्म विराम ६९

अध्यात्म विराम ६९

अहं हा खरतर कधीही एकटा नसतो म्हणून तर काल म्हटल्या प्रमाणे तो क्रोध तर सोबत बाळगतोच, पण असूया,मत्सर,दभ व इतर दुर्जन बंधू सोबत बाळगतो. कदाचित शंभर कौरव हे अहं रूप दुर्योधन आणि इतर दुर्गुण यांचं व्यास कृत प्रतीकात्मक प्रकटी करण असू शकेल, असं माझं चिंतन आहे.म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी मधे सांगितलं आहे की आत्मा मन आणि अहंकार हे मृत्यु पश्चात सुद्धा एकत्रच असतात. इतका घट्ट हा अहं देहात आणि देहातीत दोन्ही अवस्थेत मनाला चिकटून असतो. याचमुळे मनाला घट्ट चिकटलेले हे अहं रुपातील अवगुण निघता निघत नाही.

म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की, माणसाने या जन्मात, आयुष्य भर जमा केलेले सर्व अवगुण, दुर्गुण इत्यादी, याचं जन्मी नाही तर जन्मोजन्मी अनेक रुपात, कर्म करायला लावून, त्याचे भोग मात्र, देहाला बुद्धीला आणि मनाला भोगायला लावतात. म्हणजेच भोग आणि ईश्वर या मालिकेत आपण कर्माची आणि कर्मकृत भोगांची एक बाजू पाहिली आता इथे आपण त्याची दुसरी बाजू पाहतो आहोत  

पण मग या अहंला घालवायचा आणि याच्या कचाट्यातून आत्मा, मन, बुद्धी व देह या चारहिंना मुक्त करण्याचा काही मार्ग आहे का, की हेच ओझं जन्मोजन्मी सोबत न्यायचं. ईश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक प्रश्नाला सहज साध्य उत्तरं आहेत, हे सर्वात प्रथम मनामधे पक्क करून ठेवा. कितीही क्लिष्ट प्रश्न आणि जटील समस्या असो, ईश्वराकडे त्याचं अत्यंत सुलभ आणि सहजी सध्या होऊ शकेल इतकं सोप्प उत्तर असतं. फक्त आपला ईश्वराच्या व्यवस्थे कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आणि भावपूर्ण असावा.

कित्येकदा आपल्या आयुष्यात द्विधा स्थिती, गुंता निर्माण करणारी परिस्थिती आणि मनाला निरुत्तर करणाऱ्या समस्या असतात किंवा गहनातील गहन प्रश्न असतात. पण मागे वळून पाहिले की,समजतं त्यांची समोर आलेली उत्तरं,इतकी सोपी आणि साध्य असतात की,आपण स्वतः चक्रावून जातो. याचं कारणच तसं आहे. त्या प्रश्नांना जटील आपलं मन, बुद्धी आणि भावनांची गुंतागुंत बनवते. पण ईश्वर त्यातून अत्यंत सोप्प उत्तर काढून समोर आणून ठेवतो.

म्हणजे मग यातून काय सिध्द झालं की, ज्या प्रश्नांना आपण फार गहन समजतो, ते ईश्वराच्या स्वाधीन करावेत. आता ईश्वराच्या चरणी समर्पित करायचे आणि त्याला मार्ग काढायला सांगायचा, म्हणजे काय. पण एखाद्याला इतक्या हककाने आपण तेंव्हाच सांगू शकतो, ज्यावेळी आपण त्याच्यावर त्याप्रमाणे प्रेम माया स्नेह करत असू. म्हणजे जर ईश्वराच्या चरणी आपण आपल्या गहन प्रश्नांना, जटील समस्याना मांडतो,त्यावेळी, आपण तितक्याच आपुलकीने, त्याच्यावर, निर्व्याज प्रेम करतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. 

आता अहं सारखी अत्यंत चिवट आणि अनेक समस्यांची जननी असलेल्या दुर्गुणाला, आपण जर जन्मोजन्मी टाकू शकत नाही तर मग, यावर उपाय काय करावा, असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो. कारण मृत्यू पश्चात पाठ न सोडणारा हा दुर्गुण,मृत्यू नंतरच्या चैतन्य अवस्थेत शिल्लक उरतो आणि देह प्राप्ती नंतर तात्काळ देहाच्या माध्यमातून मनाच्या इंद्रियाद्वारे सगुणत्व धारण करतो. मग करायचं काय.

पण वर आपण पाहिलं त्याप्रमाणे, आपण गहनातील गहन समस्या, प्रेमपूर्वक ईश्वर चरणी वाहिली की, आपण त्या समस्ये तून मुक्त होऊ शकतो. पण अहं हा इतका प्रभावी दुर्गुण आहे की, त्यासाठी ईश्वराची तितकीच अपार कृपा प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच साठी, शरण लीन व दास्य या त्रयीची नितांत आवश्यकता आहे. या त्रयीवर आपण उद्याच्या भागात पुढे चिंतन सुरू ठेवू. तोपर्यंत चिद घन आनंद स्वरूप ईश्वराच्या निर्गुण रूपाला साक्षी स्वरूप करण्याचा प्रयत्न त्याच्या स्मरणातुन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...