Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

अध्यात्म विराम ९२

अध्यात्म विराम ९२ सख्य आणि भक्ती हे बऱ्याच प्रमाणात समान आहेत. सख्य म्हटलं की, सखा हा नेहमी बरोबरीचा असतो. एकमेकांच्या मनात, समान पातळीवरील भाव आणि भावना असतात. एकमेकांविषयी जिव्हाळा, स्नेह आणि ममत्व समान असतं. अनेकदा आपल्याला अश्या मत्रीच्या गोष्टी वाचायला मिळतात ज्यामधे, ये ह्रदयीचे ते हृदयी, न सांगताही कळले, असं घडतं. बरं असं घडणं, हा निव्वळ योगायोग नसतो, तर तो समान पातळीवरील, विचारांची, मनाची समसमान आंदोलनं, समान स्पंदनं आणि समान लहरींचं प्रसारित होणं, या गोष्टी सहजी घडतात. लहरींचं प्रसारित होणंच नव्हे तर, त्या लहरींचं दुसऱ्याच्या मनाने ऐकून, समान साद देणं, हेदेखील सहजी घडतं. म्हणजेच कोणतीही गोष्ट मुद्दाम कळवावी लागत नाही, एकमेकांना. सर्व काही आलबेल असेल असं नक्कीच नाही. पण काहीही गैर घडल्यास आपला सखा समजून आणि सांभाळून घेईल, हा विश्वास दृढ असतो किंवा असावा. किंबहुना विश्वासाच्या एका अदृश्य धाग्याने, हे सख्यत्वाचे संबंध, दृढ केलेले असतात. हा धागा खूप कोमल, पण त्या दोन्ही हृदयातील भावनांनी बांधलेला आणि मजबूत असतो.  सख्य खरं आणि मनातून असेल तर, प्रत्यक्ष बोलण्या शिवाय संवाद, प्रत...

अध्यात्म विराम ९१

अध्यात्म विराम ९१ मुळातच अध्यात्म हा व्यवहार नाही. म्हणजे तिथे इतकं केलं की तितकं प्राप्त होईल, अशी परिस्थिती नाही. कारण अध्यात्म,. साधना, भक्ती ही आपल्या याच नव्हे तर मागील आणि पुढील अनेक जन्मातील पापं व अहित कारक कर्माचा हिशोब, ईश्वरी नामाच्या पुण्य कर्माच्या आधारे, चुकता करण्यासाठी आहे. या ईश्वर चिंतनाच्या व स्मरणाच्या निरपेक्ष कर्माने, अनेक गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत, हे जाणणे जरुरी आहे. म्हणूनच त्या ईश्वर चिंतन व स्मरण यांना क्षुल्लक व्यवहार पातळीवर आणून आपण, आपल्याच हिताला बाधा पोचवतो.  म्हणून आत्ममार्गी साधक बनण्यासाठी किंवा बनण्या आधी आपल्या मनातून, व्यवहार या गोष्टीला काढून टाकले पाहिजे. आपण अध्यात्म मार्गात किंवा आपल्या नित्य जीवनात घेत असलेलं ईश्वराचं नाम, हे मी त्याला देत असलेलं दाम समजण्याची चूक कधीही करता कामा नये. असं अगदी दाम, या स्वरूपात आपण मनात योजून समजलो नाही, तरीही, आपल्या मनातील अपेक्षांमधे आपण मी इतकं करतो, तरी देवाचं माझ्याकडे लक्ष नाही, अश्या स्वरूपाचं मनात येणं, हेच मुळात आपल्या साधनेला कमी पणा आणण्यासारखं आहे. आपण करत असलेली साधना किंवा ईश्वराचं ...

अध्यात्म विराम ९०

अध्यात्म विराम ९०   खरतर लीनता आणि शरणागती हा भक्त, साधक यांचा परम धर्म आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. महाबली हनुमान आणि अर्जुन ही दोन उपयुक्त उदाहरणं आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण दास्यत्व भक्ती मार्गातून, ईश्वराच्या हृदयातील सखा या परम पदापर्यंत जाण्याचं गुह्य जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. हनुमंत हा दास्यत्वाच अजोड उदाहरण आहे. पण त्याचवेळी रामरायाच्या हृदया तील सखा सुद्धा आहे. स्वामीचरण, स्वामी स्मरण आणि स्वामीभक्ती या त्रयीचे सूत्रधार म्हणून हनुमंत या महारुद्र मूर्तीकडे पाहता येईल. त्यांच्याकडून हीच त्रयी आत्मसात करता येईल.  मुळात वाल्मिकिंच्या आद्य रामायणात सांगितल्याप्रमाणे, प्रत्यक्ष श्रीमहादेव हे, रामावतराच्या कित्येक युगे आधी पासून, राम नामाचा जाप आणि राम नामातच समाधी लावून, युगानुयुगे ध्यानस्थ बसतात. श्रीशंकर हे रामाचे आद्यभक्त आहेत. त्यांच्या साठी काहीतरी करण्याची अर्थात त्या श्रीरामांची सेवा करण्याची संधी साधण्या साठीच, प्रत्यक्ष श्रीराम अवतारात, श्रीशंकरांनी महारुद्र हनुमंत, हा अकरा रुद्रांपैकी एक असलेला, अवतार धारण करून, युगानुयुगे स्वतःला श्री रामसेवेत बांधून घेण्...

अध्यात्म विराम ८९

अध्यात्म विराम ८९   दास्य हे आपल्या मनाच्या अवस्थेतून समोरच्या पर्यंत पोचतं. किंबहुना, मनात जर दास्य वृत्तीची भावना नसेल, तर माणसाची कृती ही, एक उपचार होते. असा उपचार कोणत्याही कामाचा नाही. कारण त्या कर्मात मन गुंतलेलं नसतं ते कर्म इश्वरापाशी पोचू शकत नाही. प्रपंचातील कर्म, हे देह,बुद्धी, वाचा व मन यांपैकी कोणत्याही मार्गाने केलं तरी,त्याचं फल आपल्याला मिळतं किंवा प्राप्त होतं. पण परमार्थात मनाची गुंतवणूक ही जरुरीची आणि महत्वाची असते. म्हणजेच ईश्वराला खरी, भक्ती, खरी सेवा, खरी वृत्ती आणि दांभिकता यातील भेद त्वरित लक्षात येतो. याचं कारण ईश्वराने गीतेत सांगून ठेवलं आहे. इंद्रियांमधे मी मन आहे.  त्याचा जरा सखोल विचार करूया. मन ही ईश्वराने, मानवी देहात बसवलेली, स्वयंचलित, स्वयंप्रेरीत आणि स्वसंचालित असं इंद्रिय आहे,ज्याची तुलना, संगणक भ्रमणध्वनी किंवा इतर स्वचलित यंत्रांमधील 'चीप:शी करता येईल. संगणक किंवा भ्रमणध्वनी मधील जी छोटीशी चीप सर्व यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी सक्षम बनवली गेलेली असते. या चीप मधे काहीही बिघाड झाल्यास, संगणक व भ्रमणध्वनी यांच्या कार्यात बाधा येऊ शकते. त्याचप...

अध्यात्म विराम ८८

अध्यात्म विराम ८८   कर्मसिद्धांत श्रेष्ठ मानणारा आणि त्यानुसारच आपलं हे विश्व आणि त्यातील प्रत्येक कण आणि क्षण रचणारा ईश्वर, कधीही त्या सुत्राबाहेर आणि तत्वाबाहेर गेला नाही आणि जाणारही नाही. म्हणूनच विश्वातील प्रत्येक क्षणी होणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागें, निश्चित कारण सूत्र आहेच आहे. प्रत्येक जीवाची प्रत्येक क्षणी होणारी प्रत्येक क्रिया व प्रतिक्रिया,या कुठल्या ना कुठल्या कर्माचा फल स्वरूप परिणाम आहेत.आता तुम्ही विचार करत आहात त्या प्रमाणे घडणारी, इष्ट वा अनिष्ट अशी प्रत्येकच गोष्ट ही कर्माचा परिणाम आहे.  म्हणून याचं कर्मफल स्वरूप म्हणून, सद्गुरू तत्व, तिन्ही देवांच्या संयुक्त शक्तीतून, श्री दत्तगुरू रुपात, या भुवर अवतीर्ण झालं, जे या कलियुगात तारक आहे. त्याचसाठी ऋषिवर अत्री आणि माता अनुसया हा कथाभाग, घडून आला.अन्यथा,देवांच्या अर्धांगी असलेल्या तिन्ही शक्ति रुप देवीना, माता अनुसया यांच्या पासून असूया, असुरक्षितता वाटून त्यांनी त्रीदेवांना, मातेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी धाडलच नसतं. त्यानंतर घडलेली पूर्ण घटना आणि साक्षात त्रिदेवांच्या एकत्रित शक्तितून, श्रीदत्तात्रेय, सद्गुर...

अध्यात्म विराम ८७

अध्यात्म विराम ८७   सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला मुळातच सद्गुरू तत्वाची निर्मिती का करावीशी वाटली किंवा का करावी लागली, यावर जरा विचार करूया. आपल्या अनंत नेत्र, मन, बुद्धी आणि ध्यान या माध्यमातून,चराचरात सर्वत्र नजर ठेवूनही ध्यानस्थ वा समधिस्थ असलेल्या ईश्वराने,आपल्या प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्याच अंशातून,अनेक अंश निर्माण करून, एकप्रकारे कार्य विभागणी केली आहे. ज्याला आजच्या भाषेत खाते वाटप म्हणतात त्या प्रमाणे. यातून कार्याची सुसूत्रता येते आणि प्रत्येक कार्याला वाहिलेल्या त्या त्या स्वरूपाना, मर्यादित किंवा अमर्यादित अधिकार दिले की, त्या कार्यात, परम अंश ईश्वराला पुन्हा लक्ष घालायची आवश्यकता नाही. या, दिलेल्या मर्यादित अधिकारात, त्या त्या इष्ट देवतेने किंवा ईश्वर प्रतिनिधीने, जर काही आपल्या अधिकारा बाहेर अतिरिक्त प्रदान केले व त्यातून काही,गैर किंवा धर्म,जगत वा जनसामान्य यांच्याबाबत काही अहित कारक, अघटीत किंवा जगताला आघात करणारे काही घडताना दिसले तर, त्याचं परम अशाला, त्यात दखल देऊन, सर्व सुरळीत करून, पुन्हा आपल्या मूळ स्थानी जावे लागते. या प्रक्रियेसाठी सर्वसाधारण प्रत्येक य...

अध्यात्म विराम ८६

अध्यात्म विराम ८६ देह आणि रूप अनेक, परंतु अंतरी तत्व एकच, असं सद्गुरू तत्वाचं स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप यातील भेद समजून मग पुढे जाऊ. रूप म्हणजे जे सर्वात प्रथम डोळे अर्थात चर्म चक्षूना समोर दिसत आणि एखाद्या व्यक्तीची देहरूप प्रतिमा जी आपल्यात नजरेस येते, ते. पण स्वरूप म्हणजे अंतरी त्या व्यक्तीचं खरं व्यक्तित्व, मन बुद्धी या पलीकडे जे आत्मतत्त्व आहे, त्याचे प्रकट किंवा अप्रकट रूप.म्हणजे बाह्यांगी प्रकट दिसतं ते रूप आणि जे अंतरी अप्रकट आहे ते स्वरूप. मुळातच स्व या शब्दात त्याचा अर्थबोध होतो.  स्वरूप या शब्दातील हा स्व म्हणजे अहं रुपातील स्व असेल किंवा आत्मतत्त्व जागृत होऊन, आत्मज्ञान झाल्या नंतर शून्यात सापडलेलं गहन परब्रम्ह प्राप्ती पश्चात आलेलं आत्ममग्न आत्म स्वरूप असेल. म्हणजे स्वरूप आणि रूप यातील भेद हा भौतिक जगतातील, ग, अहं या अवगुणांपासून ते निर्गुण परब्रम्ह प्राप्तीच्या आनंदात रत असलेलं आत्मरुप असेल, इतकी विशाल खोलीतील असू शकतं.  एखादी व्यक्ती आपण बाह्यांगी पाहून, त्या व्यक्तीबद्दल, जे मत तयार करतो किंवा धारणा धरतो, ते मुख्यतः रुपा बद्दल असतं किंवा असू शकतं. पण त्या व्यक...

अध्यात्म विराम ८५

अध्यात्म विराम ८५ श्रद्धा आणि शंका यामधे श्रद्धा पूर्ण, अनन्य आणि दृढ असेल तर  नक्कीच शंका मनात आली तरी ती आपोआप विझून जाईल.आपण मात्र त्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवायचे असते. आता या श्रद्धेला धरून ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे, याचा विचार करूया. मनाला कोणत्यातरी धाग्यात किंवा किंवा स्थानी गुंतवले की, ते इतरत्र फिरत नाही.जरी इतर विचार मनात आले तरी,ते क्षणमात्र राहून, पुन्हा आपल्या वाटेने निघून जातात, असा अनुभव येतो. म्हणून त्या श्रद्धेला कुठेतरी गुंतवले की ती श्रद्धा आपली जागा सोडत नाही. पण ज्या जागी तिला गुंतवायचे, ती जागा तशीच श्रद्धेय व पूजनीय असावी.  मग अशी कोणती जागा आहे, जिथे त्या श्रद्धेला आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून मनातील शक्ती, ऊर्जा व ओज यांना एका स्थानी जुंपावे, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.मनात ओज असते हे नक्की. पण ते सात्विक व शुद्ध चित्तातून बहरून, आपल्या प्रभावाचा परिणाम दाखवते. यावर नंतर चिंतन करूया. मुळात खरी श्रद्धा व खोटी श्रद्धा असा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही. जी पूर्णपणे आणि दृढ असते तीच श्रद्धा आणि याव्यतिरिक्त जी असते ती अश्रद्धा. तर आता य...

अध्यात्म विराम ८५

अध्यात्म विराम ८५ श्रद्धा आणि शंका यामधे श्रद्धा पूर्ण, अनन्य आणि दृढ असेल तर  नक्कीच शंका मनात आली तरी ती आपोआप विझून जाईल.आपण मात्र त्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवायचे असते. आता या श्रद्धेला धरून ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे, याचा विचार करूया. मनाला कोणत्यातरी धाग्यात किंवा किंवा स्थानी गुंतवले की, ते इतरत्र फिरत नाही.जरी इतर विचार मनात आले तरी,ते क्षणमात्र राहून, पुन्हा आपल्या वाटेने निघून जातात, असा अनुभव येतो. म्हणून त्या श्रद्धेला कुठेतरी गुंतवले की ती श्रद्धा आपली जागा सोडत नाही. पण ज्या जागी तिला गुंतवायचे, ती जागा तशीच श्रद्धेय व पूजनीय असावी.  मग अशी कोणती जागा आहे, जिथे त्या श्रद्धेला आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून मनातील शक्ती, ऊर्जा व ओज यांना एका स्थानी जुंपावे, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.मनात ओज असते हे नक्की. पण ते सात्विक व शुद्ध चित्तातून बहरून, आपल्या प्रभावाचा परिणाम दाखवते. यावर नंतर चिंतन करूया. मुळात खरी श्रद्धा व खोटी श्रद्धा असा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही. जी पूर्णपणे आणि दृढ असते तीच श्रद्धा आणि याव्यतिरिक्त जी असते ती अश्रद्धा. तर आता य...

अध्यात्म विराम ८४

अध्यात्म विराम ८४ शंका आणि इतर तत्सम दुर्गुण हे तमोगुण व रजोगुण युक्त असल्याचं आपण पाहिलं.त्यामुळे त्यांचं लक्षण अतिघाई, अती शीघ्र विचार आणि अशांत वृत्ती हे आहे. या उलट  सद्गुण व सत्वगुण हे वैराग्य आणि विरक्ती युक्त असल्या मुळे, शांत, सुशील स्वभावी असतात. म्हणजे श्रद्धावान व्यक्ती नेहमी शांत असतात. त्यांचे विचार सखोल आणि कृती संयत असते. याउलट शंका असलेल्या व्यक्ती अवखळ असतात. त्यांचे विचार उथळ असतात. त्यामुळे कृती सुद्धा तशीच असते.  श्रद्धा माणसाला धीर, उदात्तता आणि कर्मरत राहण्यास किंवा कर्म करण्यास शिकवते. शंका माणसाला कर्मा पासून परावृत्त करते. म्हणजेच श्रद्धा माणसाला कर्म करण्यास बाध्य करते. ही बद्धता कर्म करण्याचं स्वातंत्र्य असताना सुद्धा, श्रद्धावान माणसाला कर्माशी बांधून ठेवते. खरा श्रद्धा युक्त माणूस फक्त कर्मातील आपला सहभाग जाणतो. म्हणजे घडून गेलेलं, घडतं असलेलं आणि पुढे घडणारं यापैकी कशातही गुंतत नाही.भूत वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही ईश्वरी इच्छेचा परिपाक असतो. कारण त्याची श्रद्धा ही त्याच्या आराध्या वर असते आणि ती श्रद्धा त्या माणसाला नेहमी सकारात्मक विचार करण्यास ...

अध्यात्म विराम ८३

अध्यात्म विराम ८३   प्रपंचात असताना किंवा प्रपंचात राहून साधना करताना, आपण नेहमी एक विचार करतो की, हे सर्व करतो ते व्यर्थ आहे का किंवा याचा काहीतरी उपयोग होतो का. हा प्रश्न व्यावहारिक अर्थाने योग्य आहे. पण परणार्थिक अर्थाने वा साधनेत असणाऱ्या साधकाने हा प्रश्न मनात आणणं अयोग्य आहे. कारण श्रद्धा आणि शंका ही दोन उर्जायुक्त खड्ग आहेत आणि मनरुपी एकाच म्यानात ही दोन खड्ग एकत्र राहू शकत नाहीत. म्हणजे एक असेल तर ते दुसऱ्या खडगाला बाहेर काढणार, हे नक्की.  किंबहुना अगदी स्पष्ट सांगायचं तर शंका असेल तर त्याची नकारात्मक ऊर्जा श्रद्धा रूप ऊर्जेला टिकू देत नाही किंवा टिकू देणार नाही. आता यावर आज चिंतन करून, मगच भक्ती मार्गाचा विचार करूया. शंका ही मोह, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहं, न्यून, अशांतता अश्या अनेक दुर्गुणातून जन्म घेते. अर्थात ती तमोगुणी किंवा रजोगुणी असते. श्रद्धा ही सात्विक अर्थात सत्वगुणी असते. अर्थातच रज व तम या दोन्ही गुणात, सत्व गुणा वर मात करण्याची अभूतपूर्व ऊर्जा व शक्ती असते. ही शक्ती नकारात्मक व आसक्ती युक्त असते. त्यामुळे ती श्रद्धा, भक्ती, विश्वास इत्यादी गुणांना स्थान घ...

अध्यात्म विराम ८२

अध्यात्म विराम ८२   यामध्ये अजून एक मुद्दा जो जाणवतो तो म्हणजे, त्या वडिलांनी त्या मुलाकडून पैसे मागूनही,स्वतःसाठी त्यातून काहीही विनियोग केला नाही. म्हणजेच त्यांना त्या मुलाकडून स्वतःसाठी काहीही अपेक्षा नव्हती. पण मग त्यांनी त्या मुलाकडून दर महिना ठराविक रक्कम का मागितली असेल, याचा बोध पूर्ण सत्य जाणल्या नंतर लक्षात येतो. त्यांना स्वतःला त्यातील काहीही नको होतं. म्हणजेच ते स्वतः तृप्त आणि कृतकृत्य होते, परिपूर्ण होते.पण या सवयीतून त्या मुलाला या गुंतवणुकीचं महत्व समजावं आणि त्यात त्याचंच हित आहे,हे त्याच्या ध्यानात यावं यासाठी वडिलांनी हा सर्व खटाटोप केला.  म्हणजे आपल्याला जे भक्तिमार्ग सांगितले आहेत व त्यावर चालून,ईश्वर चिंतन, स्मरण, पूजन, अर्चन करणे अपेक्षित आहे, त्यामागे,ईश्वराला स्वतःला काहीही अपेक्षा नाही. तर त्यातून आपल्याच सर्वोपरी हिताचं काही करणं, ईश्वराच्या मनात आहे. त्यामुळे भक्तीच्या मार्गावर राहून,भक्तांना स्मरण,पूजन,अर्चन या मार्गाने चालायला सांगून, ईश्वर स्वतः निरपेक्ष आहे, हे नक्कीच मनात पूर्ण ठसलं असेल. म्हणूनच आपल्या कडून, सेवा, भक्ती, यज्ञ, याग, योग, का कर...

अध्यात्म विराम ८१

अध्यात्म विराम ८१   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।    भक्तांच्या हिताचं वहन करणारा ईश्वर, वचनांकित आहे, हे तर स्पष्ट आहे. आपण त्याने आखून दिलेल्या भजन, अर्चन, पूजन, उपासना, स्मरण, शरण यामधे, परिपूर्णता योजली, तर निश्चित त्या भक्ताचं क्षेम कुशल पाहण्याचा, नव्हे वाहण्याचा योग ईश्वर पार पाडेल, यामधे कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. काल चिंतनात आपण एक शब्द वापरला,ज्यावर आपण म्हटलं की,उद्या सखोल चिंतन करूया. घेऊन जाणे, म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करणे.  आज यावर विचार करूया. अपेक्षा या शब्दात एक अर्थ ध्वनित होतो. आपण एखाद कार्य, कर्म या बदल्यात काही अपेक्षित करतो, म्हणजे बदल्यात कशाची तरी इच्छा करतो, त्याला अपेक्षा करणे म्हणता येईल. एखादं काम, नोकरी नाकारताना, आपण कारण सुद्धा देतो की, मला अपेक्षित मोबदला किंवा इतर सुविधा अथवा सोयी सवलती व इतर सुविधा यांचं वचन न देण्यात आल्यामुळे, मी ती नोकरी किंवा जबाबदारी नाकारली किंवा स्वीकृत केली नाही किंवा सोडली. अपेक्षा ही नेहमी, शारीरिक, भौतिकच असेल असं नाही. ...

अध्यात्म विराम ८०

अध्यात्म विराम ८०   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।    अनन्यतेने ईश्वराचं नित्य स्मरण, पूजन, अर्चन करत परि पूर्णतेने उपासना करतो, अश्या नित्याभियुक्त भक्ताचं सर्व क्षेम पाहण्याचा योग मी नित्य साधतो. अर्थात त्याचं क्षेम मी वाहतो. आता वाहतो किंवा वहाम्यहम म्हणजे नक्की काय याचा अर्थ नीट समजून घेऊ. वाहणे म्हणजे एखादी, वस्तू, व्यक्ती यांना आपल्या खांद्यावर घेऊन, एका स्थाना हून दुसऱ्या स्थानी घेऊन जाणे. यात नेणे आणि घेऊन जाणे असे दोन्ही शब्द वापरता आले असते. पण घेऊन जाणे हेच योग्य आहे. कसे त्याचा विचार करूया.  शब्दाच्या अर्थाने दोन्ही मधे फार भेद नसला तरीही, सखोल चिंतन केल्यावर हा भेद लक्षात येईल. नेणे म्हणजे एखादं कार्य जे आपण मोबदला घेऊन, एखाद्या करारा अन्वये, केलेलं एखादं निश्चित स्वरूपाचं कार्य म्हणता येईल. म्हणजे ज्यासाठी आपण सांसारिक व प्रापंचिक जबाबदारी यासाठी किंवा स्वतःच्या उदर निर्वाहासाठी करत असलेल्या नोकरी, धंदा, व्यवसाय इत्यादी मधील एखादं कार्य, जे लिखित किंवा अलिखित स्वरूपातील करारानुसार, काही निश...

अध्यात्म विराम ७९

अध्यात्म विराम ७९   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।   योगक्षेम या शब्दातच एक योग आहे. म्हणजे क्षेम कुशल हे नित्य आणि नियमात बांधलेलं सूत्र आहे असा बोध यातून होतो.सूत्र काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट यातून स्पष्ट होते की, ईश्वराचं वचन हे एका सूत्रबद्ध नियमाने बांधलेल्या वचन पूर्तीची ग्वाही आहे. म्हणजेच मी तुमचं क्षेम पाहिन, तुमची काळजी वाहींन, हा योग मी वचनांकित करतो, अशी एक प्रकारे मुद्राच या श्लोकातील आपल्या भाष्यावर किंवा आपल्या भक्तां कडून आपल्या असलेल्या अपेक्षा पूर्ती पश्चात भगवंत स्वतः कडून मुद्रित करतात, असं माझं मत आहे.  ज्यावेळी एखाद्या शब्दाला, कर्माला, कृतीलां, कार्याला योग हा शब्द जोडला जातो, त्यावेळी त्याचा गर्भित अर्थ अनेक पटींनी दृढ होतो. मी सांगितलेल्या नियमात किंवा सूत्रात बद्ध असलेला नित्याभियुक्त जो कोणी असेल, त्याचं क्षेम, कुशल पाहण्याचं माझं वचन, हा माझा एक योग आहे आणि तो सांभाळणं हे माझं ब्रीद आहे. ते सांभाळणं हा माझ्यासाठी योग अर्थात नियम आहे. म्हणजेच माझ्याशी चिंतनातून, ...

अध्यात्म विराम ७८

अध्यात्म विराम ७८   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। योगक्षेम म्हणजे सर्वसाधारण अर्थाने, उदरनिर्वाह, चरितार्थ, आयुष्याचा मार्ग असा अर्थ निघतो. म्हणजे आपल्या जीवनाची गाडी सुरळीत सुरू आहे, आयुष्यातील खाचखळगे फारसे नाहीत अशी स्थिती म्हणजे क्षेम कुशल. सर्व काही सामान्य स्थितीत आहे म्हणजे कुशल आहे असा अर्थ आपण काढतो. आयुष्यात अपेक्षा, आकांक्षा, इच्छा कामना या अनेक रुपात उभ्या असतात. माणूस आपल्या आयुष्यात, त्यांना आकार देऊन, त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यासाठी आवश्यक कष्ट, त्रास, प्रयत्न व कर्म करत राहतो. तरीही अशा कितीतरी अपेक्षा अर्धवट किंवा अपूर्ण अवस्थेत राहतात आणि या देहातील आयुष्य संपून, आत्मा देह सोडून निघून जातो. कारण त्याचा, प्रत्येक देहात थांबण्याचा कालावधी ठरलेला असतो आणि तो काळ संपला की, आत्म्याला तिथून निघावं लागतं. पण मूळ अपेक्षा इच्छा शिल्लक राहून, आत्मा त्यांच्या पूर्णते साठी पुन्हा नवीन देहाच्या शोधार्थ फिरायला जातो. पण ही अतृप्त भावना आत्म्यातील मनोमय कोषाला पुढील जन्मात देहाला, बुद्धीला, मना...

अध्यात्म विराम ७७

अध्यात्म विराम ७७   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। जो भक्त अनन्य भावाने नित्य त्या एकस्वरुप ईश्वराच्या चिंतनात आपलं देहाचं आणि बुद्धीचं दुःख, दैन्य, भोग, सुख,उपभोग हे सर्व विसरून, त्याच्या उपासनेत नितनित रममाण असतो, त्याबद्दल भगवंत वचन देतात आणि सांगतात की,असे जे नित्याभियुक्त आहेत, त्यांच्या विषयी अत्यंत प्रेमपूर्वक पुढील वचन देतात. पण त्या आधी नित्याभियुक्त म्हणजे काय हे जाणून घेऊ.  या शब्दाचा निश्चित अर्थ असा आहे की,पहिल्या श्लोकात सांगितलेल्या गुणांनी युक्त असे जे आहेत त्यांना म्हणतात नित्याभियुक्त.म्हणजे जे फक्त ईश्वराला अनन्य भावे शरण जाऊन, त्या एकाच स्थानी आपली निष्ठा अखंड राखून, त्या चरणी आपली चित्तवृत्ती वाहून,त्यांनाच आपलं सर्वस्व मानतात आणि आपल्या सर्व चिंता आणि सुख दोन्हींच्या पार जातात, आणि नित्य भगवत चिंतनाची उपासना करतात, ते असतात नित्याभियुक्त.  अश्या नित्याभियुक्त भक्तांपैकी एक म्हणजे स्वतः अर्जुन. जो ईश्वराचा सखा होता आणि ईश्वर त्याचा सखा. ही सख्य भक्ती या अनन्यतेनेच साध्य होते. ती अनन्यता अ...

अध्यात्म विराम ७६

अध्यात्म विराम ७६   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। अनन्य भावाने चिंतन करून, जे जन माझी उपासना करतील, अश्या शब्दात वचन देताना श्रीकृष्ण भगवान इथे पर्युपासते असा विशेष शब्द वापरतात. पर्युपासते या शब्दाचा अर्थ आहे, पूर्णपणे उपासना करतात. आता पूर्णपणे उपासना करणे म्हणजे काय,तर अखंड, क्षणो क्षणी, नित्य, नितांत आवश्यक कर्म जाणून, किंवा याच साठी आपला जन्म झाला आहे आणि हे एकच कर्म आता शेष आहे असे जाणून उपासना करणे.  आता उपासना करणे म्हणजे नक्की काय याचा विचार करूया. उपासना हा उप अधिक आसन या दोन शब्दा पासून तयार झालेला शब्द आहे. उपासना ही क्रिया आहे. उप म्हणजे विशिष्ट प्रकारचे व आसन म्हणजे बैठक आणि असे विशिष्ट आसन घालून मनाला एकाग्र करणे. त्याद्वारे संयोग साधणे. मुळात ही बैठक मनाला विशिष्ट प्रकारे, एकाग्र चित्त करून, त्याला ईश्वरी चिंतनाच्या लहरी,मनातून प्रसारित करून, त्याद्वारे तश्याच प्रकारच्या समान विश्व लहरींशी,त्यांचा संयोग घडवून आणून त्याद्वारे त्या लहरींद्वारे ऊर्जा व शक्ती प्राप्त करून, त्यांचे बल वाढवत नेणे. एका ...

अध्यात्म विराम ७५

अध्यात्म विराम ७५   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। अनन्य असा भाव मनात जागृत होण्यासाठी, जीवनातून मनाने निवृत्त होऊन, आत्मज्ञान प्राप्तीसाठी सिद्ध व्हावं लागतं, हा खूप मोठा गुह्य भाग आपण गेल्या काही भागा तील चिंतनातून जाणला. म्हणजे माझा,अर्थात या देहाचा व बुद्धीचा नव्हे तर, मन व आत्मा यांचा एकमेव आधार ईश्वर हाच आहे. तो एकच असा आहे, जो एकदा बोट धरल्या नंतर, कधीही आपलं बोट, हात आणि साथ सोडणार नाही.  पण ही अनन्यता सर्वसाधारण नसावी, तर आत्मयोग सिद्धी साधण्याची असावी. आधार हवा असेल तर, तो जगातून देह धारण शृंखला भेदण्यासाठी आणि आत्म तेजाला स्वप्रकशित करून, संपूर्ण शुद्ध स्वरूपातील आत्मप्रकाश रूप तेजाप्रत नेऊन, समिल्लित करण्या साठी असावा. ही अनन्यता मला या जगतात कोणी नाही, या भावनेने असावी. हा भाव एकवार धरला की तो कायमस्वरूपी दृढ असावा. त्यात क्षणमात्र व तिळमात्र बदल होता काम नये.  या अनन्य भावाला एकदा मनात दृढ केले की, याच भावात त्या ईश्वराची उपासना करावी, हा गुह्य मंत्र या श्लोकात पुढे भगवंत सांगतात. आता उपासना म्ह...

अध्यात्म विराम ७४

अध्यात्म विराम ७४   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। अनन्य भाव म्हणजे या विश्वात, एका इश्वराशिवाय माझा अन्य कोणीही नाही. पण माझा म्हणजे कोणाचा, याची गफलत होऊ शकते. म्हणूनच आधी त्या मी चा विचार करूया. हा मी म्हणजे देह की मन की बुद्धी की आत्मा हा एक युगानुयुगे शोधला जाणारा आणि शोधला गेलेला प्रश्न आहे. जर तो मी, देह बुद्धी यांपैकी असेल तर, ते अशुद्ध आणि अज्ञान स्वरूप असतात.काळ परिस्थिती याप्रमाणे, हे ज्ञान वाढतं वा अज्ञान तसच राहतं. पण तरीही ते स्थळ काळ परत्वे बदलत असतं. त्यामुळे देह व बुद्धी हे अनित्य आहेत.ते देहा पश्चात नष्ट होत असल्यामुळे, विनाशी आहेत.  मन हे देह असेपर्यंत देह व बुद्धी यांच्या संगतीत असतं. पण देह गेल्यानंतर, तोच मनोमय कोष आत्म्याशी संलग्न होऊन आत्म्यासह, नवीन देह धारणा करून, पुढील भोग व उपभोग प्राप्त करून घेण्यासाठी, चैतन्य स्वरूपात पुढे जातात. म्हणजे ते नित्य आणि अविनाशी आहेत. याचा अर्थ देह व बुद्धी यांच्या जाणीवा व भाव हे नाशवंत आणि अशाश्वत स्वरूपाचे असतात. अर्थात ते अनन्य आहेत किंवा असतात असं म्ह...

अध्यात्म विराम ७३

अध्यात्म विराम ७३   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।  देहाला, मनाला आणि भौतिक जगतात काही क्षण जाणवणारी अनन्यता, ही खरी, पूर्ण आणि कायम स्वरूपी अनन्यता नाही. म्हणजे तिला फक्त उणीव, गरज किंवा तात्पुरता भाव म्हणता येईल. प्रभू जर या अनन्यते बद्दल बोलत असते तर,त्या अनन्यतेच्या स्थितीत अनेकांना भक्तीयोग, आत्मज्ञानयोग साधला गेला असता. किंबहुना इतक्या सहज साधता येणाऱ्या गोष्टी विषयी, भगवंतांना येऊन ज्ञान देण्याची आवश्यकताच नव्हती. अनेकानेक ऋषी मुनी, साधुसंत यांनी आपला जन्मच्या जन्म यासाठी खर्ची घातला नसता.  मग ही अनन्यता कोणती आणि ही स्थिती कशी प्राप्त होते, यावर विचार करूया. अनेकांचा असा समज असतो की, साधू संत, सद्गुरू, ईश्वर हे सर्व, माझ्या भौतिक जगतातील समस्या, अडचणी, प्रश्न व अडथळे दूर करण्यासाठी आलेले आहेत. वास्तविक हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य या अर्थाने की,या प्रपंचा तील समस्यांनी सामान्य जन, साधक व भक्त, हे निराश होऊ नयेत आणि त्यांनी आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत राहावे, तसेच आपल्या आत्म ध्येयापासू...

अध्यात्म विराम ७२

अध्यात्म विराम ७२   अनन्य होऊन चिंतन करणे म्हणजे काय हे आधी जाणून घेऊ. अनन्य या शब्दात अनेक अर्थ प्रकट होतात. अन् अन्य कोणी नाही अशी स्थिती म्हणजे अनन्यता. ही स्थिती दोन प्रकारे प्रस्थापित होते. भौतिक जगतात, तीन स्वरूपात जल, घन वा वायू या रुपात, त्रीगुण स्वरूपात किंवा त्रिमितीय स्वरूपात सिद्ध झालं किंवा सिद्ध करता आलं किंवा सिद्ध होऊन, अस्तित्वात असेल तर ते आहे आणि नाही असं सिद्ध करता आलं की अन्य कोणी नाही अश्या निष्कर्षाला सहजी येता येतं.  पण भौतिक जगतातील ही स्थिती सांसारिक परिभाषेत भिन्न प्रकारे मोजली जाते. संसाराच्या जंजाळात आणि जग रहाटीत आपल्याला उपयोगी येणारं कोणी आहे किंवा नाही यावर मोजली जाते. म्हणजे माझ्या संकट काळात माझ्या सहाय्यार्थ कोणी आहे की या संकटांना मला एकट्याला सामोरे जायचे आहे, अशी स्थिती. पण करोडो वर्षांच्या जगताच्या इतिहासात आणि पुराणातील महाभारत आदी कथांमधून या गोष्टीची स्पष्टता होते आणि आपला सुद्धा अनुभव आहेच, की खऱ्या संकटात कित्येकदा, आपले म्हणणारे त्या संकटात उपयोगी येतीलच अस नाही.  संसाराची कथा ही अशी आहे की, संकटात ज्यावेळी कोणीही उपयोगाला येत...

अध्यात्म विराम ७१

अध्यात्म विराम ७१    कालच्या विषयात पुढे जाताना एक लक्षात घ्या की, कर्म आणि कर्मफल हा या भौतिक विश्वाचा आधार आहे. म्हणजे कर्म करणे आणि त्याचं फल प्राप्त झालं की, त्याचा भोग किंवा उपभोग घेणे, हे एकच मानवाच्या हातात आहे. हा नियम, अगतिकता, अपरिहार्यता, पराधीनता या पैकी जे म्हणाल ते आहे. पण आहे हे मात्र नक्की. या बाहेर कोणालाही जाता येत नाही. अगदी ईश्वरसुद्धा, या नियमातून वर्ज्य होऊ शकत नाही किंवा स्वतःला वर्ज्य करत नाही. मग या सर्व सत्याच्या पार्श्व भूमीवर भक्तीच्या नऊ मार्गातील दास्य भक्ती काय महत्व दर्शवते, यावर जरा विचार करूया. एखादं उदाहरण घेऊया, म्हणजे हा मुद्दा समजून घ्यायला मदत होईल. असं बघा, एखादा अनेक वर्ष सेवानिष्ठ असलेला सेवक आणि त्याचा स्वामी आहे.त्या सेवकाला आणि त्याच्या कुटुंबाला या स्वामी शिवाय कोणताही दुसरा आधार माहीत नाही. समजा त्या सेवकाच्या आयुष्यात काही अडचण आली किंवा एखादं कार्य उभं राहिलं, तर त्याला खात्री आहे की, त्याचा स्वामी त्याला, त्या अडचणीतून बाहेर काढेल किंवा काही सहाय्य जरूर करेल. या एका ठाम विश्वासावर तो आहे. त्याच्या या विश्वासा प्रमाणे त्याचा स्...

अध्यात्म विराम ७०

अध्यात्म विराम ७०   शरण, लीन आणि दास्यत्व या त्रयी बद्दल आज विचार करूया. दास्यत्व ही सहज साध्य होणारी स्थिती नाही, हे ध्यानात ठेवा. याचं कारण, गेले काही भाग, मी सांगत असलेल्या अहं या दुर्गुणात दडलेले सर्व बंधू, मनाला, देहाला व बुद्धीला बांधून ठेवतात.हा बांध एखाद्या रस्सिने बांधलेला नसूनही, देह बुद्धी व मन या दूर्गुणात जखडले जातात. इतका हा बांध, अतूट असतो की, उत्तर दिसत असूनही मन, बुद्धी व देह त्या उत्तराकडे जात नाही, जाऊ शकत नाही. मग यावर उपाय काय.  मनाला एखादा अधिकारी किंवा आपल्याहून श्रेष्ठ वा आपल्या पेक्षा उच्च पातळीवरील व्यक्तित्व किंवा तत्व आढळलं, पटल तर मन त्या ठिकाणी आपला अहं, दंभ आणि गर्व सोडून देतो आणि त्या व्यक्ती वा तत्वाला शरण जाऊन, मन त्या चरणी लीन राहू शकतं. ही शरणागती त्या तत्वातील त्या मर्माला असते, जे मर्म त्या तत्वाला आपल्याहून श्रेष्ठ ठरवतं. हे श्रेष्ठत्व एकदा स्वीकारल्या नंतरच मन त्या ठिकाणी शरण जातं आणि ते श्रेष्ठत्व चुकीचं ठरत नाही तोपर्यंत ही शरणागती राहते.  उदाहरणार्थ एखादा गावगुंड, त्या गावातील सर्वात शक्तिवान पुरुष असेल, तर त्याच्या ताकदीमुळे, धा...

अध्यात्म विराम ६९

अध्यात्म विराम ६९ अहं हा खरतर कधीही एकटा नसतो म्हणून तर काल म्हटल्या प्रमाणे तो क्रोध तर सोबत बाळगतोच, पण असूया,मत्सर,दभ व इतर दुर्जन बंधू सोबत बाळगतो. कदाचित शंभर कौरव हे अहं रूप दुर्योधन आणि इतर दुर्गुण यांचं व्यास कृत प्रतीकात्मक प्रकटी करण असू शकेल, असं माझं चिंतन आहे.म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी मधे सांगितलं आहे की आत्मा मन आणि अहंकार हे मृत्यु पश्चात सुद्धा एकत्रच असतात. इतका घट्ट हा अहं देहात आणि देहातीत दोन्ही अवस्थेत मनाला चिकटून असतो. याचमुळे मनाला घट्ट चिकटलेले हे अहं रुपातील अवगुण निघता निघत नाही. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की, माणसाने या जन्मात, आयुष्य भर जमा केलेले सर्व अवगुण, दुर्गुण इत्यादी, याचं जन्मी नाही तर जन्मोजन्मी अनेक रुपात, कर्म करायला लावून, त्याचे भोग मात्र, देहाला बुद्धीला आणि मनाला भोगायला लावतात. म्हणजेच भोग आणि ईश्वर या मालिकेत आपण कर्माची आणि कर्मकृत भोगांची एक बाजू पाहिली आता इथे आपण त्याची दुसरी बाजू पाहतो आहोत   पण मग या अहंला घालवायचा आणि याच्या कचाट्यातून आत्मा, मन, बुद्धी व देह या चारहिंना मुक्त करण्याचा काही मार्ग आहे का, की हेच ओझं जन्मोज...

अध्यात्म विराम ६८

अध्यात्म विराम ६८ अहं हा जेंव्हा सूक्ष्मातून स्थुलात आकाराला येतो, तेंव्हा त्याचा आकार प्रकट होऊन येतो आणि त्याला आपलं अस्तित्व सापडत. या अहं ला हा आकार आत्मा देहात आल्यावर मन,बुद्धी आणि देह यात प्रकट होतो. म्हणजे आत्मा देह धारण करण्यासाठी जेंव्हा चैतन्यावस्थेत असतो, तेंव्हा हा अप्रकट स्वरूपात अर्थात निर्गुण रुपात असतो. देह धरणे नंतर त्या आत्म्याला त्या देहाची ओळख प्राप्त होते. ही ओळख प्राधान्याने देहाची असते, त्यामुळे देहरूपात, मन व बुद्धी स्वरूपात तो कर्म मार्गातून प्रकटतो.  या प्रकटण्यातून त्याला आकार प्राप्त होतो आणि तो अहं आकार घेऊन अहंकार होतो. हा आत्म्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत सर्वात शेवटी बाहेर जाणारा अवगुण आहे. तो सगुण रुपात दृढ असतोच. पण चैतन्य रुपात निर्गुण समाधीत असतो आणि नष्ट होत नाही. कित्येक साधू पुरुष, महायोगी, तपस्वी, साधक सिद्धी प्राप्त झाल्यावर देखील, त्यांच्या ठायी, हा अहं सुक्ष्मरुपात अस्तित्वात असतो.याला प्रकट व्हायला मनाच्या व बुद्धीच्या अग्नीची आवश्यकता असते. पण हा अग्नी कोणत्याही लहानशा ठिणगीच्या रुपात मनातील केंद्रांना, सूक्ष्म स्पर्श करून, हा अहंकार रूप...

अध्यात्म विराम ६७

अध्यात्म विराम ६७ दासांचा दास हनुमंत हा श्रेष्ठ यासाठी नाही की तो लीन आणि शरणागत आहे, तर यासाठी आहे की,तो आपल्या स्वामींना सर्वश्रेष्ठ मानतो. यात त्या हनुमंताच्या श्रेष्ठत्वाचं यश दडलेलं आहे. खरा भक्त तोच, जो ईश्वराला पूर्ण व श्रेष्ठ मानतो आणि स्वतःला शून्यवत वा तृणवत मानतो. स्वामी त्या शून्याला कोणत्या संख्येसमोर नेऊन ठेवायचं ते ठरवेल,हा सार्थ आणि पूर्ण विश्वास भक्ताच्या मनात दृढ असावा.  हा भाव इतका दृढ व घट्ट असावा की, या तिन्ही लोका तील कोणतीही शक्ती, या विश्वासाला तडा देऊ शकणार नाही. म्हणजे मग भोग आणि उपभोग या दोन्ही स्थिती मनावर आणि मनाच्या विश्वासावर कसलाही आघात करू शकणार नाहीत. भोग आणि ईश्वर या लेखमालेच्या पुढे अध्यात्म विराम सुरू करण्यामागचा उद्देश आणि मर्म कदाचित यातून लक्षात आलं असेल.कारण ती लेखमाला आलेले भोग व उपभोग यांची कारण मीमांसा ही कर्मात व कर्मगतीत आहे, हे ठसवते.  या कर्माच्या फेऱ्याला, त्याच्या सर्व परिणामांना आपण स्वतः जबाबदार असतो, ईश्वर त्यात दखल देत नाही. ईश्वर फक्त साक्षीरूप असतो. त्याची आपल्याला सहाय्य करण्याची इच्छा जरूर असते. पण आपण जोपर्यंत या कर्मग...

अध्यात्म विराम ६६

अध्यात्म विराम ६६ आम्ही दासांचेही दास हा भाव, खरी भक्ती आणि खरं आत्मज्ञान झालेल्या भक्ताच्या हृदयात दृढ असतो. किंबहुना खरा भक्त तोच असतो, ज्याच्या मनातील स्व आणि ग पूर्ण नष्ट होऊन, त्या मनात लीनता, विनम्रता आणि शरणागत भाव वास करून असतात. मुळात मी कोण हा शोध जिथे संपतो, तिथेच खरी दास्य भक्ती सुरू होऊ शकतो. कोहम अर्थात मी कोण, हा शोध श्रवण भक्तीच्या पायरी पाशी सुरू होऊन, दास्यभक्तीच्या पायरीला तो शोध पूर्ण होतो. दास झालेला भक्त हा आपलं हित अहित, लाभ हानी, चांगलं वाईट, या संकल्पना पार करून, पुढे आलेला असतो. त्या भावभावना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत. श्रवण भक्तीच्या सुरुवातीला, माझा, मी हा पूर्ण जागा असतो. पण जसजसं ईश्वराबद्दल ज्ञान प्राप्त होत जाते, तसतसा हा अज्ञान रूप धुक्याचा पडदा दूर होत जातो. तो पडदा दूर होण्यासाठी भक्ती मार्गाच्या या नऊ पायऱ्या,नेमून देण्यात आल्या आहेत. कदाचित आत्मज्ञानाची सुरुवात मी कोण हे आधी न जाणता, मला या जगतात आणणारा कोण हे जाणण्या तून सुरू व्हावी, हीच योग्य मार्गक्रमणा आहे. कारण मी कोण हे जाणण्याआधी, ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान हा खरा आत्...

अध्यात्म विराम ६५

अध्यात्म विराम ६५ दास आणि दास्यत्व म्हणजे स्वामी आणि स्वामीसेवक हे नातं नसतं, तर हा ऋणानुबंध असतो. याचं कारण सुद्धा तसच आहे. दास म्हंटल्यावर काल सांगितलं त्याप्रमाणे, श्रीहनुमंत ज्याप्रमाणे स्मरणात येतो. त्याचप्रमाणे दुसरं नाव स्मरणात येतं ते म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी. दास्य भक्तीची या दोन अलौकिक आणि अद्वितीय मूर्ती आहेत. श्रीसमर्थ रामदास स्वामी हे हनुमंताचे अंशावतार मानले जातात.  त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र यांनी, हनुमंताला कलियुग अंतापर्यंत चिरंजीवीत्व बहाल केलं, तेंव्हा अवतार समाप्तीला प्रभूंनी हनुमंताला कर्तव्य दिलं की, सृष्टीत ज्या ज्यावेळी भगवत भक्तीचा दुष्काळ येईल, धर्मावर आरिष्ट येईल व ज्या ज्यावेळी अधर्माची सावली, धर्माला ग्रासण्यास सिद्ध होईल, त्या त्यावेळी तू त्या भक्तीची पुनर्स्थापना करून, भक्ती मार्गी जनांना अभय प्रदान करून आणि सन्मार्गा वर चालण्यासाठी आदर्श घालून देशील. यासाठीच ज्या ज्यावेळी भुलोकी देहधारणा आवश्यक आहे, त्या त्यावेळी देह धारण करून ते कार्य तू पार पाडशील. म्हणून अधर्म बलवान होताना दिसेल आणि त्यावेळी त्याला नामोहरम करून, धर्...

अध्यात्म विराम ६४

अध्यात्म विराम ६४ ईश्वराने भक्तिरसाच्या नऊ मार्गाची निर्मिती करून, सर्व साधारण जडजीव विशेषतः मानवाचं, अनंत उपकार करून, सहाय्य केलं आहे. त्याबद्दलची कृतज्ञता कोणत्या आपण अनन्य भावात व्यक्त करू शकतो, तर निव्वळ त्या मार्गांचा अवलंब करून आणि नित्य त्या मार्गावर मार्ग क्रमण करून.या नऊ मार्गावरील कोणतीही पायरी ही आधीच्या आणि नंतरच्या मार्गाहून भिन्न व विभक्त नाही. तर प्रत्येक पायरी एकमेकांना पूरक, सहाय्यक व भक्ताला पुढील पायरीवर घेऊन जाणारी आहे. आपण त्या मार्गावर चालत राहण्याची पराकाष्ठा करून, आपल कर्तव्य करत राहिलं पाहिजे. श्रवण भक्तीने सुरू केलेला हा चिंतन पर लेख प्रपंच आज दास्य भक्ती या सातव्या पायरीवर आलेला आहे. आध्यात्मिक मार्गात सात हा अत्यंत शुभ क्रमांक समजला जातो. सप्तस्वर्ग, सत्पलोक, सप्तपाताळ सप्तपदी, सत्पनद्या इत्यादी अनेक उदाहरणं देता येतील.  म्हणून या सातव्या पायरीबद्दल विशेष स्नेह वाटतो, याचं कारण सुद्धा तसच आहे. दास्य भक्ती हे नामोच्चारण केल्यानंतर सर्वात प्रथम जे दिव्य व्यक्तित्व डोळ्यासमोर येत असेल तर ते हनुमंताचं. दास्यत्वाची अत्युच्च परिसीमा म्हणजे श्री हनुमंत. आपले ...

अध्यात्म विराम ६३

अध्यात्म विराम ६३ वंदन म्हणजे ईश्वरचरणी पूर्ण शरणागत होणं. वास्तविक हा भाव एक क्षण दृढ झाल्यावर, पुन्हा दुसरा कोणताही दोष त्या शुद्ध भावाची जागा घेऊ शकत नाही.पण आपण पंचमहाभूत रूप लोकात रहात असल्यामुळे, अनेक कारणां मुळे इथे नित्य अशुद्धता येतच असते. ही अशुद्धता भौतिक,ऋणभाराची, विकारांची, अज्ञानाची असू शकते. अशी बाह्य अशुद्धता, अंतरात चित्त अशुद्ध करते.  ही चित्ताची अशुद्धता, मन, आत्मा, व परम आत्मा यांच्या क्षण एक झालेल्या मनोमिलनात नित्य बाधा उत्पन्न करते. म्हणूनच, एकदा प्राप्त झालेली आनंदाची ती अनुभूती, नित्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला, नित्य त्या ईश्वर चरणी, नत होऊन शरणागत भावात, वंदन करणं, हे प्रत्येक जिवाचं नित्य कर्म ठरतं. हा वंदन भाव नित्य जागृत राहून, नित्य त्या आनंदाची अनुभूती कशी करू शकतो, हा प्रश्न नक्कीच मनात येतो. पण तसा तो भाव नित्य प्राप्त करण्याचा मार्ग काय आहे, याचा आता सखोल अभ्यास करूया.  वंदन करताना साधता आलेली एकतानता ही, एक प्रकारे समाधी किंवा ध्यान यांचा क्षणैक अनुभव देते. ज्याने हा योग साधला, त्याला याची कल्पना नक्की येईल. पण ज्याला हा योग साधता आला नाह...

अध्यात्म विराम ६२

अध्यात्म विराम ६२ वंदन याचा तात्विक अर्थ त्यामागचं उद्देश समजल्यानंतर, वंदन करण्यासाठी विशिष्ट स्थळ काळ असावं का आणि का असावं. यावर आज चिंतन करूया. आपल्या लक्षात आलं आहे की, वंदन हे ईश्वर, आत्मा आणि मन यांच्या संगामाच तंत्र आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने साधल्यास, देह, बुद्धी मन यांची सुद्धा एकतानता साधली जाते. किंबहुना, तशी एकतानता साधणं हीच वंदन भक्ती आहे.  पण अशी एकात्मता प्रत्येक वेळी साधेलच असं नसतं. याचं कारण म्हणजे मन हे प्रत्येक वेळी त्याला सांगितलेली गोष्ट आज्ञा, इच्छा, विनंती मानेलच असं नाही. कारण ते चंचल आहे आणि ते वातावरण, स्थळ, काळ, स्थिती यानुसार बदलत असतं किंवा अस्थिर असतं. अगदी एकाच स्थळी सुद्धा ते प्रत्येक वेळी एकाच स्थितीत असेल, याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे वंदन भक्तीसाठी आवश्यक मनःशांती अश्या मनाला लाभण्यासाठी काय करता येईल किंवा काय केल्यास हे साधेल यावर विचार करूया.  वंदन हे ईश्वराशी मनाचं आणि आत्म्याचं मिलन असल्या मुळे, या वंदन करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण हे साधण्यासाठी ईश्वराच्या मूर्तीसमोर, मंदिरात किंवा आपल्या देवघरातच ही एका...

अध्यात्म विराम ६१

अध्यात्म विराम ६१ निर्गुण आत्मा, निराकार मन आणि या दोन्हीनी युक्त परम आत्मा,यांच्या काही क्षण एकरुपतेचा साक्षात्कार, म्हणजे काही क्षण केलेलं वंदन. हे वंदन कसं करावं आणि ते तसं का करावं, याचसुद्धा शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये विज्ञान आहे. विज्ञान यासाठी की, आत्मा, मन आणि देह यांचं एकत्रित अस्तित्व याच भूतलावर आहे, त्यामागे, सर्वोत्तम वैज्ञानिक, ईश्वर याने निर्माण केलेली शास्त्रीय, वैज्ञानिक व्यवस्था हे कारण आहे. म्हणूनच विज्ञान जितकं सखोल संशोधन करत जाईल, तितकीच,त्या विज्ञानाला ईश्वराच्या अमानवीय शक्तीच्या कल्पक पण वैज्ञानिक निर्मितीची ओळख पटत जाईल, हे निर्विवाद. याच शास्त्रीय संशोधनातून, सिद्ध केलेलं ज्ञान,शास्त्र, मंत्र, स्तोत्र, संस्कार, यांच्या माध्यमातून, माणसाला, देह बुद्धी, मन आणि आत्मा यांचा चौकोन साधून, या भुलोकीच्या भूमितीच्या प्रमेयाला सोडवून, आत्मा पुन्हा स्वस्थानी अर्थात विधात्याच्या हृदयापर्यंत पोचावा, याच उद्देशाने माणसाच्या समोर मांडून ठेवलं. हेतू हा की माणूस याचा जास्तीतजास्त सदुपयोग करून घेईल आणि अध्यात्मिक प्रगती साधत पुढे जाईल.  या सर्व शास्त्र,मंत्र, स्तोत्र ...

अध्यात्म विराम ६०

अध्यात्म विराम ६० आपण देवाला हात जोडून वंदन करतो, त्या क्षणासाठी आपण आणि या ब्रम्हांडाचा नायक, ईश्वर, यांच्या मधे कोणतीही दुसरी शक्ती येऊ शकत नाही. मन बुध्दी देह यांना क्षणासाठी पूर्ण शांतता, मिळण्याचं ठिकाण आणि क्षण फक्त आणि फक्त तोच असतो. पण यामधे सर्वात अडचण कसली येत असेल तर ती आपल्याच मनाची. मुळात हे मन, त्या वंदन क्षणी, पूर्ण स्थिर होऊन, त्या श्री चरणांवर लीन व शरणागत झालं तरच, वंदन हे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातं. मुळात वंदन हा एक उपचार वा आचार नसून, ते भगवंत आणि भक्त यांचं मनोमिलन आहे. ही एकच वेळ व एकच स्थळ असं आहे, जिथे निर्गुण निराकार ब्रम्ह आणि निर्गुण निराकार मन यांचं अद्भुत मिलन होतं किंवा होऊ शकतं. पण त्यासाठी या भक्त व भगवंत मिलनाच्या अलौकिक दिव्य क्षणी, त्या अलौकिक कार्याचं महत्व आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे.  या वंदन क्षणाला निर्गुण निराकार ब्रम्ह स्वरूप ईश्वर व त्याचं अंशात्मक प्रातिनिधिक रूप असलेलं आत्मस्वरूप तत्व, यांनी एकमेकांसमोर येण्याचा हा क्षण आहे. याच क्षणाला साक्षी ठेवून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की, "देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्...