Skip to main content

अध्यात्म विराम ८४

अध्यात्म विराम ८४

शंका आणि इतर तत्सम दुर्गुण हे तमोगुण व रजोगुण युक्त असल्याचं आपण पाहिलं.त्यामुळे त्यांचं लक्षण अतिघाई, अती शीघ्र विचार आणि अशांत वृत्ती हे आहे. या उलट 
सद्गुण व सत्वगुण हे वैराग्य आणि विरक्ती युक्त असल्या मुळे, शांत, सुशील स्वभावी असतात. म्हणजे श्रद्धावान व्यक्ती नेहमी शांत असतात. त्यांचे विचार सखोल आणि कृती संयत असते. याउलट शंका असलेल्या व्यक्ती अवखळ असतात. त्यांचे विचार उथळ असतात. त्यामुळे कृती सुद्धा तशीच असते. 

श्रद्धा माणसाला धीर, उदात्तता आणि कर्मरत राहण्यास किंवा कर्म करण्यास शिकवते. शंका माणसाला कर्मा पासून परावृत्त करते. म्हणजेच श्रद्धा माणसाला कर्म करण्यास बाध्य करते. ही बद्धता कर्म करण्याचं स्वातंत्र्य असताना सुद्धा, श्रद्धावान माणसाला कर्माशी बांधून ठेवते. खरा श्रद्धा युक्त माणूस फक्त कर्मातील आपला सहभाग जाणतो. म्हणजे घडून गेलेलं, घडतं असलेलं आणि पुढे घडणारं यापैकी कशातही गुंतत नाही.भूत वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही ईश्वरी इच्छेचा परिपाक असतो. कारण त्याची श्रद्धा ही त्याच्या आराध्या वर असते आणि ती श्रद्धा त्या माणसाला नेहमी सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करते.

शंका माणसाला प्रत्येक कर्मात आधी नकारात्मक विचार करायला लावते. शंका ही व्यवहारात उपयोगी पडत असेल. कारण माणसाला ती सावध करते. चुका करण्या पासून परावृत्त करते आणि योग्य की अयोग्य याचा विचार करून, पाऊल टाकण्यास शिकवते.त्यामुळे शंका बऱ्याच प्रमाणात माणसाला व्यवहारी व व्यवहारात चतुर बनवते. हे चातुर्य व्यवहारात आणि प्रपंचात बऱ्याच प्रमाणात गरजेचं असते. 

पण आध्यात्मिकदृष्ट्या शंका ही अनावश्यक व अहित कारक असते. कारण या जगताच्या पालकाने सांगितल्या प्रमाणे, अनन्य होऊन, त्याचं नित्य चिंतन करायला, श्रद्धा ही पूर्णपणे व ठाम असावी. कारण परिपूर्णता अंगी बाणवून जो भक्त त्याची उपासना करेल, अश्या भक्ताचं क्षेम ईश्वर पाहणार, हा ठाम विश्वास मनात असेल तर, श्रद्धा पूर्ण असते आणि अश्या दृढ मनात शंकेला वाव नसतो. शंका ही त्याचं ठिकाणी उत्पन्न होते, जिथे श्रद्धा परिपूर्ण अर्थात शंभर टक्के नसते. खरी श्रद्धाच खऱ्या भक्तीला जन्म देते आणि खरी भक्ती, ईश्वराला भक्ताकडे खेचून आणते. 

मनातील कोणत्याही दुबळ्या, अशक्त आणि कमजोर विचारांवर सकारात्मक इमारत उभी राहू शकत नाही. कारण सत्वगुण हे तयार व्हायला, रुजायला आणि कायम व्हायला वेळही लागतो आणि जास्त ऊर्जा व शक्ती लागते. कारण नकारात्मक विचारात स्वतःची शक्ती व ऊर्जा असते. त्यांच्यात इतर दुर्गुणांना खेचून आणण्याची चुंबकीय शक्ती असते. 

त्यामुळे एका दुर्गुणाने इतर अनेक दुर्गुण खेचून आणले जातात. पण सकारात्मक, सत्वयुक्त आणि सात्विक विचार यांना, बाहेरून ऊर्जा व ताकद लागते. दुपारच्या उन्हात सर्वकाही तापवून सोडायची शक्ती व ऊर्जा असते. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात ती शक्ती व ऊर्जा नसते. पण खरी शांती,समाधान, आनंद व सत्व हे या सकाळच्या उन्हातच असते. श्रद्धा. आणि भक्ती या पूर्ण असल्या की ईश्वरा पर्यंत आपल्या मनातील शुद्ध व सत्वगुण युक्त लहरी पोचतात. 

याच विचारावर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत त्याचं ईश्वराच्या स्मरणात, सकारात्मकता प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...