Skip to main content

अध्यात्म विराम १३२

अध्यात्म विराम १३२

विचारांची मशागत पक्की होण्यासाठी त्यांचं बीज मनात रुजलं पाहिजे.विचार ज्याप्रकारचे असतील त्याप्रकारचं पीक येणार. अर्थात जसे विचार रुजवले जातील, तसेच विचार परावर्तित होऊन मनातून बाहेर येणार. जसे विचार येणार,तशीच कृती घडणार.सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार मनात रुजू शकतात. जे विचार रुजतील, तेच कर्म रुपात बुद्धी वाचा व मन यातून बाहेर येतील.

अर्थात ज्या लहरींची बीजं आपण मनात पेरत जाणार, त्याचं लहरी विचार रूपातून प्रकट होऊन, बुद्धी, वाचा व देह यांचा उपयोग करून, आपल्याला कर्मरुपात समोर आलेली दिसणारं. कारण मन हे उत्पादनशील जमिनी प्रमाणे आहे. ती कधीही कोणत्याही विचारांना निराश करत नाही, जोपर्यंत आतील विचारांची बैठक पक्की असतं नाही. म्हणजे बी जमिनीत नीट रुजत नाही तो पर्यंत चांगल्या पिकाची शाश्वती देता येणार नाही.

म्हणजे तुमचे विचार ठाम आणि स्थिर असतील तर बाहेरून येणारे कोणतेही दुसरे विचार, त्यात बदल करू शकत नाहीत. याकडे दोन प्रकारे पाहता येईल. जर मना तील वाईट, दुष्ट, कु व दुर्विचार ठाम असतील तर बाहेरून आलेले चांगले विचार,त्याजागी रुजणार नाहीत. याउलट, जर मनातील, सकारात्मक,चांगले, सुष्ट सुविचार ठाम आणि स्थिर असतील तर बाहेरून हल्ला करणारे, कोणतेही विचार, आपल्या मनात रुजू शकणार नाहीत. 

म्हणूनच कायम दोलायमान स्थितीत असणाऱ्या मनांवर, दोन्ही प्रकारच्या विचारांचा हल्ला सतत होत असल्या मुळे,अश्या मनात कायम निरुत्साह,भीती, मनाचा अशक्त पणा ही लक्षणं आढळतात. जे ठाम असतात, त्यांना कधीही कुठेही, कसलीही भीती वाटत नाही. माणसाने आयुष्यात एक विचार मनात कायम सतत स्वतःला विचारात राहिलं की, मनात इतर विचार येणार नाहीत. 

तो विचार म्हणजे मी करतोय ते योग्य की अयोग्य. योग्य अयोग्य हे त्या कर्माच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. कर्माची शुद्धता ही त्याच्या अंतिम परिणामावर अवलंबून आहे. म्हणजे मी या कर्मातून वाईट घडवणार आहे की चांगलं. म्हणजे मी एखादं असं काम करत आहे की ज्यामधे माझा स्वतःचा स्वार्थ, स्वहित आणि अर्थातच स्व समाधान साध्य करत आहे. पण हे करत असतानाच, मी इतर कोणाचं अहित साधून त्याला असमाधानी करत नाही किंवा मनाने दुखवत नाही ना, हे ध्यानात आणावं

यामधे संसार अर्थात प्रापंचिक आणि पारमार्थिक अश्या दोन्ही प्रकारच्या कर्मांचा समावेश करता येईल.कारण दोन्ही कर्म ही काही विशिष्ट फलांना जन्म देणारी असतात. योग्य कर्म, योग्य फल आणि अयोग्य कर्म अयोग्य फल, हा नियम सर्वश्रुत आहे.पण प्रारब्ध आणि संचित यांचाही यामधे विचार होतोच. तरीही प्रापंचिक कार्य हे प्रापंचिक भोग व उपभोग यांचे जन्मदाता असतात आणि पारमार्थिक कर्म ही पारमार्थिक मार्गावरील बीजं असतात. 

याचा पुढील भागात सविस्तर विचार करूया. तोपर्यंत सद्गुरू कृपा प्राप्त करून देणारी साधना करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...