Skip to main content

अध्यात्म विराम १३०

अध्यात्म विराम १३०

काल सांगितल्याप्रमाणे मूर्तीची कल्पना डोळ्यापुढे आणून, मन त्या स्वरूपात गुंतवण्याचा प्रयत्न करावा. यामधे सुरवातीला थोडा किंवा बराचसा गोंधळ होतो किंवा होऊ शकतो. याचं महत्वाचं कारण, मनाला असं ठरवून केलेलं चिंतन किंवा programmed thinking करायची सवय नसते. मुळातच ते मन त्याच्या मनात येईल तसं, चिंतन, विचार मंथन करतं आणि त्यानुसार दृश्य पाहून, त्यात रममाण होण्याची सवय लावून घेतलेलं एक अदृश्य तरीही अद्भुत इंद्रिय आहे. 

आता या नवीन आणि मार्गदर्शन केलेल्या किंवा guided thinking ला ते पटकन स्वीकारेल, ही शक्यता फारच कमी असते.आपण ठराविक चाकोरीत जगताना,ऑफिस मध्ये नेमून दिलेलं आणि आपल्या हुद्द्याला पात्र असलेलं काम करतो.त्यावेळी मनाला फार फिरण्यास किंवा स्वतःच्या मर्जीने विचार करण्यास,फार कमी वाव असतो. त्यामुळे थोडा मोकळा वेळ गाडीत, वाटेत, प्रवासात मिळाला किंवा कुठेही थोडी उसंत मिळताच, मर्जीने फिरण्यास सुरुवात करत. 

त्यामुळे त्याला मुद्दाम एखाद्या विचाराच्या किंवा कल्पनेच्या मागे जोडणं हे तसं कठीण कार्य आहे. विशेष करून, जेंव्हा आपल्याला एखादी गोष्ट वा विचार मुद्दाम करण्याची वेळ येते, तेंव्हा ते मन मुद्दाम नकार देणार किंवा असहकार करणार. यामधे सरसकट सर्वांना असाच अनुभव येईल असंही नाही. कारण मनाच्या सवयी, व्यक्ती, स्थळ, काळ परत्वे भिन्न असतात किंवा बदलतात. 

म्हणून आपण आपल्या आवडीच्या मूर्ती, चित्र जे शक्य आहे, ते आठवून, त्याची प्रतिमा डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करून सुरुवात करायला हरकत नाही. यामधे प्रतिमा यासाठी की, नादाची सवय जडायला कदाचित वेळ लागू शकतो. पण आपल्या विश्वास व श्रद्धा यानुसार जर आपल्याला एखाद्या नाम, स्वर, धून यांची आवड जास्त असेल आणि त्यावर मनाला एकाग्र करण्याबद्दल आपल्याला विश्वास वाटतं असेल तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही.

तरीही इथे एक सुचवता  येईल की नादाबरोबर जर त्याचं नादाची मूर्ती वा प्रतिमा डोळ्यापुढे आणून, त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास, आपला हेतू लवकर साध्य होऊ शकतो.मूळ उद्देश आपल्याला या नादातून मनाला एकाग्रता साधत, स्वेच्छा आणि अनिच्छा यातून योग्य निवडण्याच्या सवयी पाशी आणायचे आहे. कारण आपण जाणतो की ज्या गोष्टी स्वेच्छेने स्वीकारून भोगल्या जातात, त्या विधात्याचा कार्यभाग साध्य करतात. 

पण अनिच्छेने स्वीकारल्या तर, तर विपरीत कर्माच्या फलांची मालिका मागे लागू शकते. म्हणून मनाच्या या एकाग्र होण्याच्या maargaane गेल्यास, आपण मूळ उद्देशाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी निश्चित वातावरण तयार करू शकतो. या प्रयोगातून निश्चित अशी पार्श्वभूमी आणि पुढे जाण्यास निश्चित अशी मनःस्थिती तयार होते. 
तरीही उद्या पुन्हा एकदा थोडी उजळणी करू आणि अडचणी आल्याचं तर मार्ग कसा सोडू नये, यासाठी थोडंसं चिंतन करून, मग हा विषय पुढे नेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...