Skip to main content

अध्यात्म विराम १३८

अध्यात्म विराम १३८
 
आपल्या आयुष्यात अनेकदा अश्या काही सांकेतिक घटना घडतात. त्यांचा गूढार्थ आपल्याला उमगत नाही. कदाचित त्यांचा संबंध या जन्मातील मागील किंवा मागील जन्मातील एखाद्या घटनेशी निगडित असूही शकतो. पण आपल्याला त्याचा अर्थ सापडत नाही. बरेचदा आपण स्वप्नात सुद्धा अश्या काही गूढ गोष्टी बघतो, ज्यांचा वास्तविक संबंध आपल्या जीवनात, निदान या जन्मात आणि आपल्याला स्मरणात असलेल्या कोणत्याही गोष्टीशी, प्रसंगाशी वा घटनेशी नसतो. त्यांचे गूढार्थ उमगावेत असं आपल्याला वाटतं. काहींना ते स्वप्न म्हणून फार लक्ष देण्यासारखं वाटतं नाही. तर काही जणांना त्यांचा अर्थ समजावा असं वाटतं.

मानसशास्त्र असं सांगतं की, आपल्या आयुष्यात कुठेतरी घडलेली, आपण पाहिलेली पण त्यावेळच्या व्यस्ततेमुळे जागृत मनाने नोंद न घेतलेली एखादी गोष्ट, छोटीशी घटना सुद्धा, सुप्त मनात नोंदवली जाते. अशी घाईत आपल्या जागृत मनाने नोंद न घेतलेली घटना वा एखादा प्रसंग सुप्तमन, जागृत मनाच्या पटला वर मांडून, ते नोंदवून देण्याचा प्रयत्न करतं. पण परमानसशास्त्र म्हणून एक जन्माला आलेली विज्ञानापलीकडील एक संशोधन करणारी शाखा आहे. त्यांचा उद्देश या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं हा आहे. पण विज्ञानाच्या भाषेत या शाखेला तसा अर्थ नाही. परमानसशास्त्र या शाखेच्या अभ्यासात काही निष्कर्ष निघतील किंवा त्या अज्ञाताचे गूढ उकलेल किंवा नाही, हे ईश्वराला ज्ञात.

पण भारतीय तत्ववेत्यांनी या अज्ञाताचा गुढाचा अभ्यास करोडो वर्षांपूर्वी करून,ज्योतिष,स्वप्नांचेअर्थ विधात्याच्या ब्रम्हांडाची रचना, ईश्वरीय लहरी, कंपनं,संदेश यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी या जगाबाहेरील अनेक गोष्टी जाणण्या साठी योग, ध्यान धारणा, समाधी यामधून अनेक गोष्टी सिद्धांत स्वरूपात मांडल्या आहेत. त्या अनेकानेक शतकं मानव जातील,उपयुक्त आहेत. त्याच्याच आधाराने,ईश्वराकडे जाण्यासाठी,त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी, मनाच्या अमर्याद शक्ती व ऊर्जा यांचा सुयोग्य वापर करण्याची अनेक तंत्रं, साधनं स्वतः त्यावर कार्य करून, यशस्वी होऊन, अखिल जगतासाठी मांडली आहेत.

वास्तविक त्याचं महत्व आपण, काळाच्या ओघात विसरून गेलो आहोत. अनेक युगं प्रत्यक्ष आचरणात असलेलं हे शास्त्र, गेल्या हजार दोन हजार वर्षात, कर्म कांड या स्वरूपात अस्तित्वात राहून, त्याचा खरा वापर, उपयोग व सिद्धता लुप्त होत आहे. आपल्या या शास्त्रात मनाच्या सहाय्याने, ईश्वरीय लहरी, संदेश प्राप्त करून, त्याद्वारे, ईश्वराच्या निकट जाण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वर्षांच्या अभ्यासाने,या गोष्टी साध्य होतात.सद्गुरू माध्यम यातून पुढे जाण्यासाठी, नक्कीच मार्गदर्शक आणि सहाय्य कारक आहे किंवा काही काही ठिकाणी अत्यावश्यक आहे. 

मुळात सद्गुरू, हे या मार्गात अग्रेसर असलेले, अनेक गूढ गुह्य व गहन गोष्टींचे अर्थ सापडलेले असे तज्ञ असतात. आपण सध्याच्या काळात, अनेक क्षेत्रात तज्ञ व्यक्तीचं सहाय्य घेतो. त्याच प्रकारे, अध्यात्मिक क्षेत्रात सद्गुरू या तज्ञ मार्गदर्शक शक्तींच सहाय्य अपरिहार्य आहे. कारण ही वाट अज्ञाताची आहे, गुढाची आहे, आपल्याला काहीच माहीत नसलेल्या मार्गाचा हा प्रवास आहे. इथे अनेक मोहाचे, लोभाचे, लाभाचे, यश किंवा अपयश यांची निसरडी वळणं, खाचा व दऱ्या आहेत. वाट चुकली, मार्ग भ्रष्ट झालो तर, कुणाचं सहाय्य घ्यायचं, हे आपल्याला ज्ञात नसल्यामुळे, आपण मार्गदर्शक सद्गुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. 

या गूढ अज्ञात मार्गाबद्दल आपण पुढील भागात चिंतन करूया. पण तोपर्यंत आपण ईश्वराच्या चिंतनात आपलं मन रममाण करण्याचा प्रयत्न करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...