Skip to main content

अध्यात्म विराम १४८

अध्यात्म विराम १४८

खरतर साधना ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणतीही केली तरी, तीच फल हे प्राप्त होतं. फरक फक्त लागणाऱ्या वेळेचा असतो. तरीही बऱ्याच साधनांमध्ये शुचिर्भूतता, ym नियम इत्यादी बंधनं असल्यामुळे, कलियुगात विशेषतः बदललेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात, ते सर्व साधणं सर्वानाच शक्य नाही. पण परमार्थाचा मार्ग, साधताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे का. तसं नक्कीच नाही. कारण आपण फक्त देश काल आणि सद्य स्थिती इतकचं बघू शकत असलो तरीही, विश्वाचा निर्माता हा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं, त्याने चारही युगात होऊ शकणारी परिस्थिती समजून, जाणून त्याची सोय सुद्धा करूनच नवविधा भक्तीची रचना केली आहे. 

आपण या लेखमालेत, त्यातील श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य हे भक्तीचे सात प्रकार विस्ताराने पाहिले.सख्य भक्ती हा आठवा प्रकार पाहताना आपण त्यातील अनेक विषयांना स्पर्श करत इथपर्यंत आलो आहोत. काल. नामस्मरण अर्थात भक्तीचा तिसरा प्रकार किंवा तिसरी पायरी यावर आपण थोडं चिंतन केलं. वास्तविक श्रवण ते दास्य हे भिन्न पणे बघायचे किंवा जाणून घ्यायचे वा आत्मसात करायचे प्रकार नाहीत. तर त्या भक्तिमार्गातील पायऱ्या आहेत.म्हणजे प्रथम आपण ठराविक वयात येईपर्यंत अर्थात बोलायला लागे पर्यंत श्रवण ज्ञानाने आपली बुद्धी, मन यांची भूक भागवण्याचा प्रयत्न करतो. 

यातून जाणीवा जागृत होणं, ज्ञानेंद्रिय कार्यरत होऊन, त्यांची आकलन शक्ती वाढून, क्षमता आणि भूक वाढते. या एकमार्गी श्रवण क्रियेने, प्राप्त ज्ञानाचा उपयोग आपण जीवन जगण्या साठी करतो. त्याचप्रमाणे श्रवण भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंता बद्दल ज्ञान ग्रहण करून, ते ज्ञान अजून वृद्धिंगत करण्या साठी त्या विषयातील तज्ञ असलेल्या ज्ञानवंतांकडून कीर्तन, प्रवचन रुपात मार्गदर्शन घेऊन, जाणीवा आणि ईश्वराबद्दल ज्ञान वाढवत जातो.या दोन पायऱ्यांवर जे प्राप्त केलं त्याच्या सहाय्याने, त्याचं ईश्वराचं स्मरण करून, त्याला आपला मानण्याचा प्रयत्न करावा. 

म्हणजे स्मरणातून आपण इश्वराबद्दल मनात आस्था, प्रेमभाव आणि स्नेह निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. स्मरणाचा अर्थ आणि उद्देश हा ईश्वरा बद्दल मनात स्नेह निर्माण करून, भक्ति मार्गात पुढील पायरीवर जाण्याचा प्रयत्न करणं हा आहे. मुळात आपण त्याला आपलाच मानला तर हा स्नेहभाव उत्पन्न होऊ शकेल. या पद्धतीने जाणून घेतलेल्या आणि मनात प्रेमभाव उत्पन्न झालेल्या ईश्वराला स्मरण्यासाठी काही विशेष करायची गरज नाही. कारण हे श्वास ज्याच्यावर हे हृदय, मेंदू आणि संपूर्ण देहच, ज्याने निर्माण करून दिला, तो आपल्या श्वासा सोबत आपल्यासह आहे, ही धारणा मनात रुजवून कायम केली की, आपोआप प्रत्येक श्वासात, त्याचाच सहवास जाणवेल.

जिथे त्याचा नित्य सहवास आपल्याला जाणवेल, तिथे या देहाच्या सर्व जाणीवा,ऊर्जा, शक्ती व कार्य हे, त्याच्या मुळेच आहे, याची प्रचिती येईल. एकदा ही प्रचिती आली की, त्याच्याविषयी मनात अपार श्रद्धा निर्माण होईल. एकदा ही श्रद्धा आपल्याला गवसली की, मग त्याला मुद्दाम आठवायचा किंवा स्मरायचा प्रश्नच उरणार नाही. कारण आठवण त्याची काढायची, ज्याला आपण विसरतो. पण इथे तर तोच आपला सांगाती आहे, हे आपण जाणल आहे. जे जाणलय, ते नित्य निरंतर आपण मनाला समजावत राहूया. त्यासाठी, त्या ईश्वराला कृतज्ञता पूर्वक वंदन केलं की, झालं त्याचं नित्य स्मरण.बाकी कोणतं नाम आणि कश्याप्रकारे स्मरण हा प्रश्न गौण ठरतो. 

याचं विषयात आपण अजून पुढे चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत त्याच्या कृतज्ञतेसाठी, त्याला स्मरत राहूया.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...