Skip to main content

अध्यात्म विराम १२१

अध्यात्म विराम १२१

एखाद्या गोष्टीची जाण येऊन त्यावर आपण विचार व कृती करतो. पण यामागे ज्ञान, आकलन आणि त्याचं पृथक्करण अर्थात त्या अकलनाने मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून निर्णय आणि कृती घडते. ही प्रक्रिया सर्वसामान्यपणे मानसिक व बौद्धिक असते. त्यात प्राप्त ज्ञानाने निर्णय घ्यायला मदत मिळते. हे सर्वसामान्य मानसशास्त्र आहे. आता हे पृथक्करण प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे होतं. त्या त्या व्यक्तीला असलेल्या ज्ञान, मानसिक व बौद्धिक स्थिती यासोबत कर्माच्या संचिताचा तितकाच वाटा असतो. 

अन्यथा एखाद्या वेळी, एखादी साधी गोष्ट सुचत नाही. मात्र कधीकधी अवघड कल्पना सहज सुचून जाते.म्हणजे कुठेतरी या प्रक्रियेला संचित व प्रारब्ध यांचाही हातभार असतो. म्हणजे जर सर्व संचीता आधीन असेल, तर प्रत्येकाने प्रयत्न करूच नयेत का.असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यावर एक सहज उत्तर देता येईल की, जर प्रारब्धात भोग हे भोगुनच संपवायचे लिहिले असतील, तर ते संपेपर्यंत कोणताही उपाय सुचणार नाही किंवा केला तरी लाभणार नाही. पण मग करायचं काय. तर परिस्थितीशी लढता लढता, त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत राहायचे.

कारण १०० पूर्ण व्हायला ९९ होणं गरजेचं आहे, तरच १ का आकड्याने त्या ९९ चे १०० होऊ शकतात. त्यानुसार आपण आपल्या प्राप्त ज्ञानानुसार, आपल्याला प्राप्त माहितीनुसार बुद्धीच्या अकलनाप्रमाणे निर्णय घेत राहणं गरजेचं आहे. याचाच अर्थ आपण आपल्या जीवनात कुठल्याही पायरीवर आणि कोणत्याही परिस्थितीत असलो तरीही, या जगाच्या जंजाळात, मला ज्या मुख्य कार्यासाठी,या भूलोकी ईश्वराने पाठवले आहे व ज्यासाठी ईश्वराने, आपले अंश प्रतिनिधी सदगुरू या स्वरूपात पाठवून, आपल्याला सहाय्य करण्याचे योजले आहे, त्यासाठी, आपल्याकडून आपला सहभाग त्यामधे असायला पाहिजे.

यामधे ज्ञान, आकलन, बुद्धी यातील कोणतीही मर्यादा आड येत नाही. गरजेची असते ती इच्छा आणि त्या इच्छेमागे आपली मनःशक्ती व आत्मशक्ती. श्रवण ते दास्य या भक्ती मार्गाच्या आपण घेतलेल्या माहितीवरून व आपण केलेल्या अभ्यासावरुन ही गोष्ट नक्की लक्षात आली असेल की, आपण कोणत्याही स्थितीत असलो आणि आपली मनाची व बुद्धीची स्थिती, झेप व क्षमता काहीही असली तरीही, ईश्वराच्या प्रेरणेने श्रवणापासून आपण या भक्ती मार्गावर वाटचाल सुरू करून, पुढे पुढे जात राहू शकतो. 

अध्यात्म हे मुळातच सर्व करून झाल्यावर करायचे कार्य आहे आणि त्याचं सांसारिक व प्रापंचिक कार्यात व वाटचालीत काहीही प्रयोजन नाही, असा एक खूप मोठा गैरसमज,आपण जोपासला आहे.तशा प्रकारची शिकवण दिली जाते किंवा समज आपल्याला अनेक माध्यमातून करून दिला जातो. वास्तविक हे चूक आहे. कारण मुळात ईश्वराने फक्त माणूस व इतर प्राणिमात्र निर्माण करुन, जगताच्या या रंगमंचावर सोडून दिले. 

त्यातील मानवाला अनेक गोष्टींची सुलभता, देह, मन, बुद्धी इत्यादींच्या देणग्या, हालचाल, वावर या सर्वासाठी सिध्द इंद्रिय व्यवस्था प्रदान करून दिली.सृष्टीच्या या चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरणाऱ्या आत्मतत्वाला सरते शेवटी मानव देह प्रदान केला आहे तो यासाठी की, माणसाला प्राणी व आपण यामधे असलेला भेद दिसेल, जाणवेल आणि त्यातून इश्वराप्रती कृतज्ञता भाव यावा, असावा आणि त्या भावातून,आपल्याला देहाची मिळालेली सुलभता साधून, ईश्वराकडे त्याचा नैसर्गिक ओढा असावा, हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. 

यावर अजून चिंतन उद्याच्या भागात पुढे सुरू करूया. तोपर्यंत त्या करुणामय ईश्वरा प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...