Skip to main content

अध्यात्म विराम १५०

अध्यात्म विराम १५०

आज या लेखमालेला सलग १५० दिवस पूर्ण होत आहेत. याबद्दल श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि माझे समस्त वाचक यांचा मी ऋणी आहे. 

सर्वात प्रथम सर्वांना, प्रभू श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩 श्रीराम जयराम जय जयराम, सियावर रामचंद्र की जय !!.

आपल्या विषयात कालच्या भागापासून पुढे जाताना, एक बोधकथा आठवली, आधी ती सांगतो. मग विषयाकडे येऊ. 

एका गावात एक कीर्तनकार कीर्तन करत असतं. त्यांचा तो नित्य नेम असे. अश्याच एका कीर्तनानंतर एक सद्गृहस्थ त्यांना शंका विचारायला आले आणि म्हणाले की, महाराज मी कशा प्रकारे नाम घेऊ, ज्यामुळे, ते फळेल आणि मला माझ्या भोग व उपभोग यातून योग्य मार्ग मिळेल. त्यावर बुवांनी त्यांना सांगितल की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या शंकेबाबत आपल्याला सविस्तर बोलता येईल. सद्गृहस्थ हो चालेल म्हणताच, बुवांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. 

एका गावात एक विप्रवर रहात होता आणि त्याने एक पोपट पाळला होता. त्या पोपटाला त्याने जय श्रीराम म्हणायला शिकवलं होतं. तो पोपट दिवसभर त्याला पढवल होतं त्यानुसार, रामनामाचा जाप करायचा. एके दिवशी त्या गावात एक फकीर आला. त्याने त्या पोपटाची बडबड ऐकली आणि त्याला तो पोपट आवडला. त्याने त्या विप्राकडे पोपटाची माहिती विचारली आणि तो पोपट विकण्याची विनंती केली. हेदेखील सांगितल की मी या पोपटाची हवी ती किंमत द्यायला तयार आहे. 

विप्राने विचार केला आपण एक पोपट शिकवून तयार केला, तसा अजून एक आणून त्याला शिकवून तयार करू शकतो. त्यामुळे हा पोपट जास्त किंमत सांगून, विकायला हरकत नाही. असा विचार करून तो विप्रवर म्हणाला की, यात एक अडचण आहे. याला मी रामनाम शिकवलं आहे, त्यामुळे हा तुम्हाला कसा काय चालेल. त्यावर फकीर म्हणाला की, ते तुम्ही माझ्यावर सोड आणि जर तुम्ही हा पोपट मला विकत द्यायला तयार झाला असाल तर, मी जरा या पोपटाशी बोलू का. एक क्षणभर विचार करून वीप्राने हो म्हणताच, तो फकीर त्या पोपटाच्या पिंजऱ्या जवळ जाऊन, आपल्याला हव्या असलेल्या, त्यांचा नित्य शब्द म्हणू लागला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही क्षणातच तो पोपट, त्या फकिराने सांगितलेले शब्द, अस्खलितपणे म्हणू लागला. त्या विप्राला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. नंतर त्यांच्यातील व्यवहार पूर्ण होऊन, तो फकीर त्या पोपटाच्या पिंजऱ्यासह रवाना झाला. जाताना तोच पोपट त्या फकिराने शिकवलेले बोल मोठ्याने उच्चारत.होता. ही. गोष्ट सांगून झाल्यावर बुवांनी त्या सद्गृहस्थांना प्रश्न केला की आता तुम्हीच सांगा यातून काय बोध मिळतो. सद्गृहस्थ हात जोडून म्हणाले, आपल्याच मुखातून, तो बोध ऐकायची माझी इच्छा आहे. त्यामुळे आपणच कथन केल्यास उत्तम. आपण तो बोध उत्तमप्रकारे विषद करू शकाल.

स्मित करून, ते बुवा म्हणाले की, तो पोपट जप करतो असा विप्राचा समज होता. अर्थातच सकृतदर्शनी, तसं दिसतही होतं. पण ज्यावेळी त्या फकिराने त्याचे बोल त्या पोपटाला शिकावल्यावर त्या पोपटाने ते म्हणायला सुरुवात करताच, विप्र आश्चर्यचकित झाला. याचाच अर्थ तो पोपट जप करत नव्हता तर फक्त पोपटपंची करत होता. मालक बदलला आणि लगेच त्या पोपटाने आपली वटवट त्यानुसार बदलली. म्हणजेच त्या पोपटाचे बोल हे आतून, मनाने किंवा पूर्ण जाणीवेने नव्हते. फक्त गळ्यात थोडी वाचा आणि सुर आहेत म्हणून तो उच्चारण करत होता. 

याचाच दुसरा अर्थ जे तुझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे, ते म्हणजे जप किंवा नाम हे पोपटाप्रमाणे न रटता आतून असावे. म्हणजे परिस्थितीत कोणताही फरक झाला तरीही वृत्तीत आणि नामात फरक होणार नाही आणि जपावर निष्ठा व श्रद्धा राहील. कारण मनापासून केलेली गोष्ट, जप, नाम, पूजन इत्यादी देवापाशी रुजू होतं. त्यामुळे हे सद्गृहस्था तू जर मला विचारशील की, मी जप कसा करू, तर माझं उत्तर असेल, नित्य कर किंवा अनित्य कर, दीर्घ कर किंवा लघु कर, पण जितका वेळ करशील तितका वेळ ते मनापासून, हृदयातून आणि आत्मा ओतून कर. तरच त्याचा खरा लाभ, संचित भार कमी करून, कर्माची पोतडी कमी करण्यासाठी होईल. कारण जे सदकर्म किंवा सतकार्य मन व आत्मा एक करून केलं जातं, ते आंतरिक समाधान देऊन जातं आणि हे समाधान हेच सर्व आध्यात्माचं सार आहे. 

ही कथा आणि त्याचं शास्त्रोक्त सार ऐकून, त्या भल्या गृहस्थाने त्या बुवांचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले, त्यांचा निरोप घेऊन, आनंदमय मन:स्थितीत आपल्या घराकडे निघाला. आता यातील बोधावर आणि आंतरिक समाधान यावर, उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...