Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग ३०

श्रीकृष्णनीती भाग ३०
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

गीतेच्या तत्वज्ञानात एक तत्व सांगताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक श्लोक सांगितला

अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च ll

या संवादाचा विस्तृत अर्थ आपण पाहू. जेणेकरून भगवंतांना काय म्हणायचं आहे, ते आपल्या आकलनात येईल. खरतर ज्यावेळी भगवंतानी वैदिक तत्वज्ञान, पुराण, यांची निर्मिती केली, त्यावेळी अपेक्षित हेतू हा होता की, सर्व प्राणीमात्र सद्हेतुने वर्तन करून, एकमेकांच्या नैसर्गिक कर्तव्याआड न येता, सर्वांचं अस्तित्व मान्य करून, त्यानुसार आपलं आचरण ठरवतील आणि वर्तन करतील. हाच हेतू मनात धरून हे तत्वज्ञान धर्माच्या माध्यमातून मांडून, जनसामान्यांना सुखी आणि शांत जीवन व्यतीत करता येऊन, त्याद्वारे परम ईश्वराच्या कृपेने मोक्षाप्रत पोचून आत्मसंयोग यात्रा पूर्ण व्हावी. 

या धारणेतून व या प्रेरणेने मानवी उन्नत्तीसाठी हा सर्व प्रपंच भगवंतानी आरंभला. पंचमहाभूत देहात, मनात असलेल्या सहा शत्रूच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे नऊ मार्ग सिद्ध करून भगवंतानी मानवाच्या हाती सुपूर्द केले. तरीही मानवाला या सर्वाचा पडत असलेला विसर गृहीत धरून, स्वये पंचमहाभूत रुपी देह धारण करून, ऋषी मुनी, संत, साधू, सज्जन यांच्या माध्यमातून पुनः पुनः मानवाला त्यांची नित्य आठवण करून देण्याचं कार्य देखील अविरत केलं. या सर्व काळात जनमानसा वर आणि सृष्टीवर सात्विकतेचा प्रभाव विशेषत्वाने होता. 

सृष्टीच्या या चक्राला छेद देणारे काही घटक असुर , दानव या तामसी शक्ती या मूलतः देव व सुरगण यांच्या अधिपत्याने नियंत्रणात होत्या. त्यांच्याशी युद्ध करून, त्यांना परास्त करून, पुनः सृष्टीवर सात्विक शक्तीचा प्रभाव रहावा हे कार्य भगवंत स्वतः विविध मार्गांनी करत होते. कधी देवरूपात प्रकट होऊन वा कधी अवतार रुपात येऊन. यात विविध सुरवर शक्ती देहरूपात येऊन, भगवंतांना या कार्यात सहाय्य करत होत्या. जसं वानर हे दुसरे तिसरे कोणी नसून सुरवर स्वतः जन्म घेऊन प्रभूंच्या कार्याला हातभार लावून,ते सिद्धीस नेण्यास तत्पर झाले आणि असुर मर्दनाचं कार्य पार पडलं. व्यवस्था पूर्ववत झाली. 

कालौघात हजारो वर्षांच्या फेऱ्यात पुन्हा द्वापारयुगामध्ये तीच परिस्थिती उद्भवली. कंस , जरासंध ,नरकासुर यासारख्या उन्मत्त शक्ती पुनः माजल्या आणि भगवंतांना अवतार घेण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. प्रत्यक्ष जग नियंता पृथ्वीवर येण्याची परिस्थिती ही अत्यंत अपवादात्मक व शेवटच्या उपायाचीच असते. परंतु श्रीकृष्ण अवतारांनंतर येणाऱ्या युगातील परिस्थिती, आधीच्या युगातील, पुढे येणाऱ्या काळापेक्षा भिन्न असणार होती. श्रीकृष्ण हे जाणून होते. 

म्हणूनच त्यांनी एकाच जन्मात माणसाला पुढे येणाऱ्या काळाशी सुसंगत भूमिका घेऊन, कशाप्रकारे या दुष्ट शक्तींचा सामना करावा, याचं उत्तम उदाहरण त्याच जन्मात घालून दिलं. महाभारताच्या युद्धापर्यंत निर्माण झालेली परिस्थिती, ही आधीच्या परिस्थितीपेक्षा खूप टोकाची व अनेक अर्थांनी अपूर्व अशी होती. त्यामुळे जिथे अर्जुनासारखा वीर पुरुष संभ्रमात पडून, गलितगात्र होऊ शकतो, तिथे सामान्य माणसाची काय कथा. याच जाणिवेने भगवद्गीतेसारखे अलौकिक ज्ञान, जे सर्व वेदांचे साररूप ज्ञान होतं, ते अर्जुनाला सामान्य कल्पून जन सामान्यांपर्यंत पोचते केले. जे कृष्ण द्वैपायन अर्थात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथ मांडून आपल्यापर्यंत पोहोचवले. 

त्यामुळे गीता वाचताना वा जाणून घेताना हा मुद्दा कायम लक्षात ठेवावा की, हे ज्ञान युद्धभूमीवर उभं राहून, त्या क्षणी वेळ काढून, युद्ध लांबवून सांगण्याचं मुख्य प्रयोजन हेच आहे की, कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत चित्त शांत ठेवून योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. नव्हे तर, जेंव्हा जेंव्हा मन द्विधा स्थितीत जाईल त्यावेळी चांगलं वाईट, सत्य असत्य, योग्य अयोग्य याची परिभाषा, त्या स्थितीला समोर ठेवून मगच ठरवावी. अर्थातच सर्व साधारण परिस्थितीला लागू होणारे नियम इथे लागू न करता व तत्व , न्याय, निती यांची वेगळी परिमाणं व निकष लावून धर्म श्रेष्ठ मानून निर्णयाप्रत यायला हवं. 

याच न्यायाने अपवादात्मक परिस्थिती उद्भवली आणि धर्मरक्षण ही श्रेष्ठ जबाबदारी आली की, त्या आड येणारी गोष्ट, व्यक्ती, व्यक्तित्व आणि तत्व, यांना त्याज्य समजून त्या आड येणाऱ्याना योग्य जागी पोचवायला हवं. इतर वेळी अहिंसा हा परम धर्म आहे आणि असेलच. परंतु अपवादात्मक कार्यात धर्माच्या व न्यायाच्या जनहितांच्या रक्षणार्थ, धर्मस्थापनार्थ प्रसंगोपात हिंसा करावी लागली तरी तोच धर्म मानावा.अन्यथा भगवंत स्वतः तिथे उपस्थित असताना, शस्त्र हाती घेऊन अर्जुनाला स्व बांधवांना मारण्याचा आदेशवजा सल्ला वा मार्ग भगवंतानी दिलाच नसता. पण त्याक्षणी अर्जुनाचं निजकर्तव्य तेच होतं आणि तोच अंतिम मार्ग शिल्लक होता. तिथे अहिंसेचं तत्व लावणं हे सर्वार्थाने चूक होतं आणि तोच विशाद अर्जुनाला झाला. म्हणूनच ज्याप्रमाणे शांतीच्या वेळी अहिंसा हा धर्म , त्याचप्रमाणे अश्या वेळी धर्मरक्षण हाच धर्म मानावा. 

याच संदर्भात पुढे उद्या..........  

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०५/०६/२०२०
भाग तिसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...