सेना - ठाकरे संघर्ष, सुप्रीम कोर्ट आणि हरिश साळवे ! भाग ३
साळवे यांनी एक सुंदर वाक्य म्हटल,त्या दिवशी आपल्या युक्तिवादात, जे माझ्या मनाला भावलं आणि त्याचा impact, जर निकाल विरुद्ध गेला आणि जर, reference application करावी लागली, तर त्याचा नक्की उपयोग होईल. त्याचा खरा मतितार्थ खूप गहन आहे. ते वाक्य आहे.
Mr Kaul has addressed, Your lordships,on the issus, which perhaps don't arise, if your lordship, sit, back and consider.
म्हणजे कौल यांनी त्या सर्व मुद्द्यावर युक्तिवाद केलेला आहे, न्यायाधीश महाराज, जे मुद्दे कदाचित गैरलागू आहेत, किंवा उपस्थित होऊ शकत नाहीत, किंवा जे मुद्दे उपस्थित होण्याची, शक्यताच नाही.
म्हणजे असे अनेक मुद्दे चर्चे दरम्यान उपस्थित करण्यात आलेत, ज्यांना या खटल्याचा भाग बनवण्यात आलंय. आणि तरीही ते सर्व युक्तिवादात कौल यांनी खोडून काढले आहेत, जे या केस संदर्भात लागू सुद्धा होत नाहीत.
याचा दूरगामी अर्थ असा होतो की, काही गैरलागू मुद्द्यांवर या केसला न्यायालयाने तोलण्याचा प्रयत्न करून, निकाल दिलाच, तर त्याही मुद्द्यांना आम्ही युक्तिवादात उत्तर दिलीत, खरतर ते मुद्दे या केसच्या संदर्भात, गैर आहेत आणि आपण त्यांना विचारात घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण यदाकदाचित न्यायालय त्यांना ग्राह्य मानत असेल, तर तेही मुद्दे आम्ही विचारात घेतले आहेत आणि उत्तरित केले आहेत.
इतक्या खोलात जाऊन, विचार करून, आपली प्रत्येक वाक्य तोलून वापरणारा साळवे यांच्यासारखा दूरदृष्टी व्यक्ती सुद्धा कुठल्याही, अशक्य निकालाची शक्यता मनात ठेवून, पुढील कायदेशीर लढाईचा विचार करून आपला एक एक शब्द उच्चारतो.
यातील दुसरा भाग मला अत्यंत महत्वाचा वाटतो, की न्यायालयाने शांतपणे जर त्या मुद्द्यांचा व कौल यांच्या युक्तिवादाचा साकल्याने, सर्वार्थाने व गांभीर्याने विचार केला तर, न्यायालयाच्या हे लक्षात येईल की, असे अनेक गैरलागू मुद्दे आहेत, ज्यांना या केसच्या संदर्भात काहीही अर्थ नसणार आहे. त्यामुळे ते गैरलागू आहेत याचा न्यायालयाने, गांभीर्याने विचार करावा.
बघुया पुढे, घोडा मैदान फार लांब नाही.
© संकल्पना व लेखन प्रसन्न आठवले
०६/०३/२०२३
Comments
Post a Comment