शिंदे ठाकरे खटला, युक्तिवादाचा शेवटचा दिवस !!
काल १६/०३/२०२३ ला, ठाकरे शिंदे खटल्यात, सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रचूड आणि ठाकरे यांचे वकील श्री अभिषेक मनु सिंघवी यांच्यातील संवादाचा भाग जसाच्या तसा.
While the questions yesterday were addressed to Solicitor General Tushar Mehta, the Court today addressed its queries to the lawyers appearing for the Thackeray camp.
*"What happens if we come to the conclusion and say that exercise of power by the Governor was not correct? What happens - does Uddhav Thackeray becomes CM? But he resigned no? It is like the Court being told that reinstate a government which has resigned."*
*Justice Shah weighed in saying,*
*"How can this Court reinstate a Chief Minister who did not face the floor test only?"*
*Senior Advocate Abhishek Manu Singhvi responded saying that only the status quo ante has to be restored.*
*To this the CJI said,*
*"The correct thing to do was you (Uddhav Thackeray) should have faced the trust vote and then say you lost since Governor should not have called it (floor test). But look at the intellectual conundrum. Trust vote was not faced."*
परवा माननीय चंद्रचूड आणि महामहीम राज्यपाल यांच्यातर्फे युक्तिवाद करणारे अधिवक्ता श्री तुषार मेहता यांच्यातील, लंच आधीचा संवाद हा न्यायमूर्तींच्या मनात महामहीम राज्यपाल यांच्या floor test घेण्यास सांगण्याच्या कृतीवर असलेला राग व्यक्त करणारा होता. त्यावेळची चंद्रचूड यांची देहबोली आणि शब्दांची सरबत्ती ही, त्यांचा राग व्यक्त करणारी होती. मेहता यांनी वारंवार सांगूनही, चंद्रचूड बोलतच होते.
अर्थात सुरवातीला मेहता थोडे गोंधळलेले आहेत असं वाटलं. त्यामुळे चंद्रचूड यांनी अजूनच प्रश्नांचा व शब्दांचा भडिमार करत, मेहता यांना आपण निष्प्रभ करत आहोत, ह्याचा एक मानसिक आनंद चंद्रचूड यांना मिळत असल्याचं जाणवलं. किंवा प्रत्यक्ष राज्यपाल महोदय याना आपण सुनावत आहोत, याच मनोभूमिकेने चंद्रचूड बोलत आहेत, असच भास होत होता.
कुठेतरी ते आपला राग व्यक्त करताना दिसत होते. अर्थातच लंच ब्रेक मुळे, मेहता यांना जी उसंत आणि कदाचित काही उपयुक्त सल्ले प्राप्त झाले असतील, त्याचा परिणाम lunch brek नतर जेंव्हा पुन्हा तुषार मेहता, युक्तिवाद करायला उभे राहिले, तेंव्हा त्यांनी सुरवातीलाच राज्यपाल महोदय याना आलेल्या, ४७ आमदारांच्या पत्राचा उल्लेख करून, चंद्रचूड यांना पूर्ण निष्प्रभ केलं. कारण त्या नंतरच्या सत्रात सत्र संपेपर्यंत एकदाही चंद्रचूड यांनी कोणताही प्रतिप्रश्न, मेहता यांना केला नाही.
कालच्या सत्रातील ठाकरे गटाचे वकील सिंघवी आणि चंद्रचूड यांच्या वर इंग्रजीतील जश्याच्या तश्या उधृत् केलेल्या संवादात चंद्रचूड यांची देहबोली आणि आवाजातील नैराश्य, यातून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे, आज सर्वोच्च न्यायालय, या खटल्यात कोणताही ऐतिहासिक निर्णय देऊ शकत नाही.
अन्यथा, जरी त्या दिवशी म्हणजे ३० जून, २०२२ ला सदनात ठाकरे सरकार, विश्वास मत हरलं असतं तरी, सर्वोच्च न्यायालयाने, पुन्हा आधीची स्थिती पुनर्स्थापित केली सुद्धा असती. इतकी न्यायालयाची भूमिका राज्यपालांच्या घाईघाईत घेतलेल्या कृतीमुळे संतापाची वाटत होती. पण निव्वळ राजीनाम्यामुळे आज चंद्रचूड मुख्य न्यायाधीश म्हणून व व्यक्तिशः हतबल व हताश वाटले.
त्यामुळे माझ्या मते, राज्यपालांच्या कृतिवर नापसंती व्यक्त करून, या खटल्यात मूळ स्थिती पुनर्स्थापित करण्याचा अर्ज फेटाळून लावण्याशिवाय, न्यायालयाला अन्य पर्याय नाही. याचं महत्वाचं कारण, वरील संवादात चंद्रचूड यांनी खूप महत्वाचा शब्द वापरला आहे. ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या कृतीवर नापसंती व्यक्त करताना, या एकूण घटना क्रमाला, एका सुंदर शब्दात चंद्रचूड यांनी मांडलं आहे "Intellectual conundrum" अर्थात अत्यंत धूर्तपणे, चतुराईने व बुद्धीने निर्माण करण्यात आलेला, अवघड पेच.
पण यातील reading between the lines शोधलं तर, हे जाणवतं की, या बुद्धिमान खेळीत, फक्त आणि फक्त राजीनाम्या मुळे न्यायालयाला काहीही करता येत नाही. अन्यथा राज्यपालांच्या कृतीला न्यायालय फिरवून, २७ जून, २०२२ ची स्थिती पुनर्स्थापित करू शकले असते. निदान तेवढं धाडस चंद्रचूड दाखवू शकले असते. हे त्यांच्या खालील शब्दात स्पष्टपणे जाणवतं.
The correct thing to do was you (Uddhav Thackeray) should have faced the trust vote and then say you lost since Governor should not have called it (floor test).
म्हणजे यात काय कृती अपेक्षित होती, काय कारणाने व मुद्द्यावर अर्ज करता आला असता, त्याचं कारण आणि काय निर्णय होऊ शकला असता, हे चंद्रचूड यांनी स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.
त्यामुळे निकाल या संवादात स्पष्ट केला आहे आणि तो तसाच लागू शकतो. कारण एका राजीनाम्याने, वेगळा निकाल देऊ शकणाऱ्या न्यायालयाचे हात पूर्ण बांधले गेले. आता ते इच्छा असूनही काहीही करू शकत नाहीत, हे नैराश्य किंवा frustration स्पष्टपणे चंद्रचूड यांनी मांडलं. अन्यथा न्यायालय, इतक्या स्पष्टपणे काय करायला पाहिजे होतं, हे सांगूच शकलं नसतं. कारण काय करायला हवं होतं, हे न्यायालय कसं काय सांगू शकत. ते तेंव्हाच सांगू शकतं, जेंव्हा त्याची हतबलता युक्तिवाद संपताना, चरणसीमेवर पोचली होती.
बघुया, निकाल लवकरच लागेल !!
© संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२३
Comments
Post a Comment