Skip to main content

अध्यात्म विराम १३४

अध्यात्म विराम १३४

ज्ञान व संस्कार यांनी आत्मा घडतं जातो आणि तो प्रत्येक देहात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यामधे, मनाची साथ ही अत्यंत महत्वाची आहे. कारण देह व आत्मा याना सांधणारा दुवा किंवा लिंक ही मन आहे. पण मन हे फक्त दुवा किंवा लिंकच नाही तर ते कळ म्हणजे बटण, बल म्हणजे force, power, ऊर्जा म्हणजे energy आहे. त्यामुळे मनाला जपणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या मनाला इतकं महत्व आहे म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचून आपल्याला, त्यांचा नित्य अभ्यास करण्यास सांगितलं आहे. 

आपण त्याला फक्त अध्यात्मिक महत्व देऊन, देवघरात स्थान देऊन, स्थापित करून मोकळे झालो किंवा त्यांचं नित्य पठण करणं आपलं कर्तव्य समजतो. वास्तविक त्यांचं महत्व माणूस म्हणून माणसाला घडवून, नंतर त्याला परम ईश्वराच्या मार्गाकडे वळवावं हा त्यामागे उद्देश आहे. तसं पाहिलं तर आपल्या नित्य अभ्यासात असलेल्या किंवा आपल्याला माहीत असणाऱ्या अथवा माहीत नसलेल्या अनेक मंत्र, श्लोक, स्तोत्र इत्यादी मागे गूढ आणि गहन वैज्ञानिक अर्थ आणि प्रक्रिया दडलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास त्याचं दृष्टीने व उद्देशाने व्हावा, यासाठी त्या स्तोत्र, मंत्र श्लोक इत्यादीना देवस्थानात, देवघरात आणून बसवलं. 

कारण संस्कृतीच्या विशिष्ट संकल्पना आणि त्यांचं पालन हे यामुळे शक्य होईल आणि केलं जाईल आणि जन सामान्य एक वैज्ञानिक व शास्त्रीय दृष्टीने परिपूर्ण जीवन जगतील. अश्या जगण्यात, मार्गात आलेले अवास्तव, नको असलेले व अनिष्ट परिणाम घडवणारे मोह, लोभ, क्रोध, राग इत्यादींचा धोका जीवाला अर्थात देह बुद्धी व मन या द्वारे उद्भवणार नाहीत आणि आले तरी मन त्यात गुंतणार नाही. यासाठी विशिष्ट जीवनपद्धती आणि त्या साठी उपयुक्त विचारसरणी सुलभतेने साध्य करण्या साठी अनेक उत्तम संस्कार घडवण्यात आले. 

ते अनेकानेक वर्ष नव्हे तर युग पाळले गेले. जनमानसा तील पापभीरूता टिकून होती. त्यामागे, हे संस्कार ही संस्कृती सर्वस्वी कारणीभूत होती. स्तोत्र, मंत्र, श्लोक, जप जाप्य याने मन सशक्त, सुदृढ, आरोग्यसंपन्न होतं. शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न यामुळे शुद्ध विचारांची निर्मिती सुदृढ देहातील मनात होत असे. कदाचित आताची परिस्थिती ही एखाद्या वादळासमान आहे. किंवा एका बदलाचा हा फेरा आहे.असो याबद्दल नंतर चिंतन करूया. 

मनाची ही पापाभिरुता आता कशी काय मिळवायची. यावर सर्वात उत्तम उपाय आहे, श्रद्धेने.मुळात श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवरील, व्यक्तिवरील, पद्धतीवरील दृढ विश्वास, ठाम आणि सार्थ भाव. असा भाव जो, आपल्याला,त्या वस्तू,व्यक्ती,पद्धती याबद्दल कोणत्याही विपरीत परिस्थितीत वेगळा किंवा वेडावाकडा विचार करू देत नाही. म्हणजेच त्या गोष्टीवर आपले एकदा जडलेले भाव, आपल्याही नियंत्रणा पलीकडे असतात. त्या भावात मन पूर्ण बुडून गेलेलं असतं. 

अशी गोष्ट, व्यक्ती किंवा पद्धती ही या जगतातील असेल तर, आपण त्याला पडताळून पाहू शकतो आणि मग हा भाव हा विश्वास श्रद्धेचं स्वरूप प्राप्त करतो. पण ती गोष्ट, व्यक्ती किंवा पद्धती ही या जगताबाहेरील असेल, तर मात्र पडताळणी थोडी जिकिरीची होते. मग ती काही तार्किक, काल्पनिक किंवा अनुभवावरून करता येते. म्हणजे जगता बाहेरील गोष्टींवर श्रद्धा ही काही तत्व किंवा तर्क अथवा अनुभव यावर ठरते किंवा ठरवता येते.

याचं विषयाला धरून उद्या चिंतन करूया. पण तोपर्यंत आपल्या साधनेच्या स्मरणात रममाण होत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...