Skip to main content

अध्यात्म विराम १४०

अध्यात्म विराम १४०

भूतलावरील किंवा ब्रम्हांडातील अनेक गोष्टींचं ज्ञान डोळे, कान, बुद्धी, मन, यांच्यामुळे होतं. जे दृश्य, श्राव्य या भौतिक स्वरूपा तील गोष्टींचं ज्ञान आहे, ते देहाच्या इंद्रिये, स्पर्श, गंध, रस, इत्यादी माध्यमातून बुद्धीपर्यंत प्रवास करून, त्याचा अर्थ, रूप, स्वरूप आवाज या सर्वांचं आकलन देहाला होतं. हे सर्वश्रुत असलेलं वैश्विक पण सर्वसामान्य ज्ञान आहे. या ज्ञानाने, मनुष्याची, इह लोकातील सर्व जाणिवांची जागृती होऊन, अनेक गोष्टींचं आकलन होतं. आयुष्यभर ज्ञानेंद्रिय आहेत तोपर्यंत, हे ज्ञान प्राप्त होत असतं. याचं ज्ञानाच्या अनुभवातून मनुष्य समृद्ध जीवन जगतो किंवा जगू शकतो. या भूतलावर असलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून मनुष्य भौतिक जगता तील सर्व सुख, आपल्यासाठी सिद्ध करू शकतो आणि समृद्ध होऊ शकतो.

पण हा प्रवास फक्त या इहालोकातील असेल तर, सर्वच योग्य झालं असतं. पण तसं होताना दिसत नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे कर्म फल सिद्धांत. जो एखाद्या ऐन सुखाच्या क्षणी हातातून पेला हुसकावून घेतो आणि क्षणापूर्वी भरलेला हात रिक्त करून मोकळा होतो. एखादी घटना क्षणात डोंगरा वरून उतरवून, दरीच्या खोल गर्तेत आणून उभ करते. या क्षणी मन विचारात पडतं की, असा काय प्रमाद, गुन्हा हातून घडला की, ज्यामुळे सारं चित्र पालटून गेलं. या क्षणी विषण्णता, विषाद, मनात घर करून, मनाला खिन्नता व निराशा यांच्या खोल सागरात लोटून देतो. 

मनाच्या या स्थितीत खरंतर मनाने अंतर्मुख व्हावं,अशी ईश्वराची सुद्धा इच्छा असणार. कारण एरव्ही सुद्धा व्यावहारिक जगतात आपण नुकसान, तोटा आला की, घडलेल्या व्यवहाराचं पुन रावलोकान करतो. त्यातून हे शोधण्याचा प्रयत्न करतो की, आपल्या व्यवहारात, व्यवसायात काय न्यूनता आहे,ज्यामुळे आपलं व्याव सायिक गणित जुळू शकलं नाही. या प्रक्रियेत आपण मनाने हे मानून पुढे जातो की, माझा व्यवहार, व्यापार यातील कर्म, कर्तव्य यात काय कसूर झाली किंवा आजू बाजूची परिस्थिती यात काय बदल झाला, जो आपण अपेक्षित केला नव्हता किंवा मोजला नव्हता. या प्रक्रियेत आपण सर्व प्रथम हे गृहितक मांडलेलं असतं की चूक झाली हे नक्की. त्याचप्रमाणे त्यात हे देखील ध्यानात घेऊन, विचार सुरू केलेला असतो की, सर्वप्रथम माझी काय चूक झाली, त्याचा शोध घेऊया.

भौतिक जगताबाबत आपण इतके डोळे, मन उघडे ठेऊन, चुकांचा शोध घेतो. कारण आपल्याला माहीत असतं की, ते अनेक कारणांमधील एक कारण आपली चूक हे देखील, निश्चितच असू शकेल. कारण आपण तिथे जाणून आहोत की, चूक कोणत्याही एका किंवा अनेक घटकामुळे होऊ शकते याचं ज्ञान व जाणीव आपल्याला असते.किंवा त्या प्रकारच्या तज्ञ मंडळींची आपण नेमणूक करतो किंवा त्यांचा तसा सल्ला घेतो. परंतु, अध्यात्मिक जगतात याच्या उलट कार्य आपण करतो. 

ज्यावेळी आपल्याला एखादा भोग, दुःख, त्रास, चिंता व काळजी लागते, त्यावेळी आपण सर्वात प्रथम त्याच्या कारणांचा शोध बाहेर घेतो. व्यवहारातील नुकसान आणि आत्मिक मार्गाच्या प्रवासातील सांसारिक दुःखामुळे आलेली आपत्ती, आपल्याला अध्यात्मिक मार्गात सुद्धा खूप मागे नेऊ शकते याची जाणीव वा ज्ञान आपल्याला नसतं किंवा जर त्याचा आपण पूर्णपणे, साकल्याने आणि सर्वंकष विचार केला नाही. कारण आपण सांसारिक, प्रापंचिक मार्गातून अध्यात्मिक उन्नती साधण्याची तारे वरची कसरत प्रत्येक जन्मात करतो आहोत आणि त्याची आपली गणितं ही कायम चुकता असतात. त्यामुळे आपल्यासाठी या दोन गोष्टींची संगती आहेच,हे आपल्या गावीसुद्धा नसतं. ती म्संगती, हटलं तरी टाळता येणार नाही. 

ही संगती जाणून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले, ऋषीमुनी, संत सज्जन या ईश्वरीय प्रतिनिधी असलेल्या तज्ञांनी, हा दोन्हींचा तोल सांभाळून, आपला सांसारिक आणि पारमार्थिक प्रपंच यशस्वी केलेला असतो. यातील काहीनी आपला फक्त पारमार्थिक प्रपंच सांभाळलेला असतो. आपण त्यात फक्त सांसारिक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतो किंवा करू शकतो. कारण, भौतिक जगताच्या पलीकडे पाहण्याची विशाल दृष्टीची जाणीव, आपल्या मनाला लाभलेली नसते.याचं खूप महत्वाचं कारण, आपण प्रापंचिक लाभ-हानी, सुख-दुःख यातून आपला आत्मिक मार्गाचा आलेख जोखु शकत नाही किंवा तिथपर्यंत आपल्या मनाची झेप जाऊ शकत नाही. 

याची कारणं आणि त्याचं निराकरण याचा पुढील लेखात आपण अभ्यास करूया. तोपर्यंत आपण आपल्या मनाच्या दृष्टीला, जाणिवांना विशाल करण्यासाठी सद्गुरू कृपेची याचना नक्कीच करू शकतो. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...