अध्यात्म विराम १२२
जाणिवांचा विचार करताना आपण असं म्हटल होतं की, प्रगल्भ जाणीवा व्यक्तीला अनेक बाबतीत इतरांपासून वेगळं करतात किंवा दर्शवतात. यातील वेगळेपण हे, शड्रीपू आणि इतर प्रलोभन यांपासून अलिप्त आणि त्यामुळे मनाने शांत, शीतल आणि गंभीर असणं. यातील शांत शीतल याचा अर्थ असा की, ज्या गोष्टींचं आकर्षण सर्वसामान्य व्यक्तींना असतं, त्यातील कोणत्याही गोष्टी अश्या व्यक्तींना आकर्षित वा पथ भ्रष्ट करू शकत नाहीत.
याच महत्वाचं कारण म्हणजे अश्या गोष्टींचे, आकर्षणाचे तरंग व लहरी, या व्यक्तीच्या मनात किंवा मनातील अश्या प्रकारच्या भाव केंद्रांवर आघात करू शकत नाहीत. यातील आघात न करण्याची कृती की हळूहळू घडतं जाते. अध्यात्मिक किंवा कोणत्याही मार्गात प्रगल्भता प्राप्त करताना, मार्गात अनेक अडथळे, प्रलोभने, माया मोह यांचे पाश व इतर अनेक बंध आकर्षित करतात किंवा सुरवातीच्या काळात काही तरंग निर्माण करतात. त्यात कोणतीही गैर बाब नाही.
पण मोहाच्या किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मनात आलेले असे तरंग, भाव केंद्रांवर आघात केल्यानंतर उठणारे भाव तरंग हाताळण्यासाठी लागणारं मनाचं सामर्थ्य, अश्या व्यक्तींना, त्यांचं तप, साधना व मनःशक्ती या द्वारे प्राप्त झालेलं असतं. ही सर्व प्रक्रिया मानसिक, बौद्धिक व आत्मिक अश्या तीनही स्तरांवर होत असते. म्हणजेच एखादी व्यक्ती साधना, भक्ती यांच्या मार्गात जसजशी वर चढत जाते, तसतशी ही प्रक्रिया सुप्तपणे घडत गेलेली असते.
उदाहरणार्थ आपण आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाल्ल्यानंतर, सुरवातीच्या काळात संकटं आल्यानंतर होणारी घालमेल व भीती किंवा त्रस्तता ही, अनेक अनुभवानंतर रहात नाही. अनेक वर्षानंतर अशा प्रकारच्या संकटांना सहज, मनात कोणतीही चलबिचल न होता आणि कोणतेही गैर तरंग न उठता, माणूस शांतपणे सामोरा जातो.
ही एक प्रकारची प्रगल्भता म्हणावी लागेल. कारण माणसाच्या मनात फार मोठे तरंग न उठता, एखादा असामान्य प्रसंग हाताळणं किंवा त्याला सामोरं जाणं, हे ती व्यक्ती आपसूक आणि विनासायास करत जाते. म्हणजेच यातून एक नक्की लक्षात येतं की, प्रगल्भता माणसाच्या मनात कोणतेही अतिरिक्त व मनाला दोलाय मान करणारे किंवा करू शकणारे तरंग, लहरी किंवा भाव तयार होऊ देत नाही आणि झालेच तर, ते हाताळ ण्याची क्षमता व मानसिक शक्ती, प्राप्त झालेली असते.
प्रगल्भता या विषयावर दीर्घ चिंतन केल्यानंतर उद्या प्रगल्भते मुळे प्राप्त लाभ काय काय आहेत, यावर उद्या चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
जाणिवांचा विचार करताना आपण असं म्हटल होतं की, प्रगल्भ जाणीवा व्यक्तीला अनेक बाबतीत इतरांपासून वेगळं करतात किंवा दर्शवतात. यातील वेगळेपण हे, शड्रीपू आणि इतर प्रलोभन यांपासून अलिप्त आणि त्यामुळे मनाने शांत, शीतल आणि गंभीर असणं. यातील शांत शीतल याचा अर्थ असा की, ज्या गोष्टींचं आकर्षण सर्वसामान्य व्यक्तींना असतं, त्यातील कोणत्याही गोष्टी अश्या व्यक्तींना आकर्षित वा पथ भ्रष्ट करू शकत नाहीत.
याच महत्वाचं कारण म्हणजे अश्या गोष्टींचे, आकर्षणाचे तरंग व लहरी, या व्यक्तीच्या मनात किंवा मनातील अश्या प्रकारच्या भाव केंद्रांवर आघात करू शकत नाहीत. यातील आघात न करण्याची कृती की हळूहळू घडतं जाते. अध्यात्मिक किंवा कोणत्याही मार्गात प्रगल्भता प्राप्त करताना, मार्गात अनेक अडथळे, प्रलोभने, माया मोह यांचे पाश व इतर अनेक बंध आकर्षित करतात किंवा सुरवातीच्या काळात काही तरंग निर्माण करतात. त्यात कोणतीही गैर बाब नाही.
पण मोहाच्या किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मनात आलेले असे तरंग, भाव केंद्रांवर आघात केल्यानंतर उठणारे भाव तरंग हाताळण्यासाठी लागणारं मनाचं सामर्थ्य, अश्या व्यक्तींना, त्यांचं तप, साधना व मनःशक्ती या द्वारे प्राप्त झालेलं असतं. ही सर्व प्रक्रिया मानसिक, बौद्धिक व आत्मिक अश्या तीनही स्तरांवर होत असते. म्हणजेच एखादी व्यक्ती साधना, भक्ती यांच्या मार्गात जसजशी वर चढत जाते, तसतशी ही प्रक्रिया सुप्तपणे घडत गेलेली असते.
उदाहरणार्थ आपण आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाल्ल्यानंतर, सुरवातीच्या काळात संकटं आल्यानंतर होणारी घालमेल व भीती किंवा त्रस्तता ही, अनेक अनुभवानंतर रहात नाही. अनेक वर्षानंतर अशा प्रकारच्या संकटांना सहज, मनात कोणतीही चलबिचल न होता आणि कोणतेही गैर तरंग न उठता, माणूस शांतपणे सामोरा जातो.
ही एक प्रकारची प्रगल्भता म्हणावी लागेल. कारण माणसाच्या मनात फार मोठे तरंग न उठता, एखादा असामान्य प्रसंग हाताळणं किंवा त्याला सामोरं जाणं, हे ती व्यक्ती आपसूक आणि विनासायास करत जाते. म्हणजेच यातून एक नक्की लक्षात येतं की, प्रगल्भता माणसाच्या मनात कोणतेही अतिरिक्त व मनाला दोलाय मान करणारे किंवा करू शकणारे तरंग, लहरी किंवा भाव तयार होऊ देत नाही आणि झालेच तर, ते हाताळ ण्याची क्षमता व मानसिक शक्ती, प्राप्त झालेली असते.
प्रगल्भता या विषयावर दीर्घ चिंतन केल्यानंतर उद्या प्रगल्भते मुळे प्राप्त लाभ काय काय आहेत, यावर उद्या चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment