Skip to main content

मुरली  - ३०

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ३०

अत्यन्त मनोवेधक, चित्ताकर्षक, मनोहारी,  अद्भुत आणि मायावी भासणाऱ्या अश्या त्या रम्य द्वारकानगरीच हे दर्शनी रूप पाहता, मनोमन सर्वांनी कृष्णबलराम या बंधूंना नकळत प्रणिपात केला खरा आणि सर्वांचे हात नकळत कधी जोडले गेले ते त्यांना देखील समजलं नाही. ते देखील विस्मय व चमत्कृतीपूर्ण भावाने. एका आश्चर्यचकित करणाऱ्या नवीन नगराला सामोरे जाणारे ते सर्व प्रजाजन , या प्राथमिक दर्शनाने मोहित आणि रोमांचित झाले होते. 

जस जसे ते नगरात प्रवेश करत पुढे पुढे जात होते, तस तसे ते अजूनच आश्चर्यमग्न होऊन दंग होत होते. प्रत्येकालाच आता आपापल्या गृहाची आणि त्याच्या अलौकिकपणाची   उत्सुकता लागून राहिली होती. पण जे समोर येणार होते ते नक्कीच सुखद धक्का देणारे असेल, हे सुनिश्चित या निष्कर्षाला सर्व आले होते. कारण नगराची सुरवात इतकी सुंदर मनोहारी होती तर बाकीची नगरी नक्कीच देखणी असणार हे सर्व जाणूनच पुढे पुढे जात होते.

सर्व प्रकारच्या सुखसोयी , सुविधा, उत्तम मार्ग मार्गिका, उद्याने , उपवने, ह्या सर्वांचं अवलोकन करत कर्मचाऱ्यानी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या घराचा ताबा घेऊ लागला. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या सामानाच्या गाड्या पोहोचत्या करण्यात येत होत्या. सर्व प्रजानन राजाने पुरवलेल्या यां सोयीसुविधेमुळे जन्मस्थान बदलाचं दुःख विसरून गेले.

इकडे सर्व व्यवस्था ठरवून दिल्याप्रमाणे होत आहे हे बघितल्यानंतर मगच कृष्ण , बलरामदादा देवी रेवती सह सर्व राण्या यांनी पुढे प्रस्थान ठेवलं. सर्व नगरी फिरून द्वारकेची अवर्णनीय शोभा पाहून समस्तास अचंबा वाटला आणि कौतुक सुद्धा. द्वारका जणू प्रत्यक्ष देवेंद्राच्या अलकापुरीला लाजवेल अशी देखणी आणि मनमोहक दिसत होती. सर्व नगरी संपल्यानंतर राजप्रसादाचा भव्य परिसर सुरू होत होता. कित्येक मैल त्याचा विस्तार होता.

आधीपासून योजना करून नगराची रचना करण्यात आल्यामुळे राजप्रासाद चारही बाजूनी सुंदर वनांनी वेढलेला होता. त्यात उत्तमातले उत्तम विस्तीर्ण व डेरेदार  वृक्ष, सुंदर लता, वेली, अनेक सुंदर फुलांची अगणित झाडं, त्या वनांच्या परिघानंतर, उत्तम सजावट व कारंजे यांनी युक्त उद्याने व उपवने होती. उत्तम कारागिरी असलेली बाके, यांची आकर्षक मांडणी, यामुळे ती उद्याने एक उत्तम शिल्पकलेचे नमुने होते. त्यानंतर  सेवकवर्गासाठी उत्तम निवास व्यवस्था व अन्य सुविधा यांची वसाहत होती. ज्याला सेवकग्राम अस नाव देण्यात आलं होतं.  याच ग्रामात अतिथीग्रामातील सेवकवर्गाची घरे होती.

सेवकग्रामानंतर अतिथीग्राम होत. जिथे एकाच वेळी काहीशे अतिथी उतरण्यासाठी उत्तम गृहव्यवस्था होती. यातील घरे ही उत्तम वास्तुकला योजनेतून साकारण्यात आली होती. आलेल्या अतिथींना विश्राम आणि मनःशांतीचा आनंद मिळावा या उदात्त हेतूने त्यातील खोल्या ह्या हवेशीर आणि मुबलक पाणी व्यवस्था यांनी युक्त होत्या. अतिथीगृहे ही श्रेणीनुसार बांधण्यात आली होती.

जशी राजदूतासाठी एक श्रेणी  , आलेल्या  अतिथीच्या सेवकांसाठी गृहव्यवस्था , अतिथी हा राजाचा कर्मचारी असल्यास थोड्या वरच्या श्रेणीची घरे, राजाचे मंत्रीगण व अन्य मान्यवर अतिथी असल्यास त्याहून वरच्या श्रेणीतील घरे, राजाचे सेनाप्रमुख व प्रधान यांसाठी अजूनच वरच्या श्रेणीतील गृहरचना व अंतर्गत सजावट आणि प्रत्यक्ष राजासाठी सर्वात उत्तम व्यवस्था असलेली गृहरचना व उत्तम कारागिरीची अंतर्गत व्यवस्था करण्यात आली होती.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...