अध्यात्म विराम १५२ मनातील ईश्वरी भक्तीचा भाव स्मरणातून सुरू होतो. स्मरणातून, उच्चारण, त्यातून श्रुती श्रवण, त्याची आवर्तनं, आवर्तनातून अर्चन, अर्चनातून अर्पण, अर्पणा तून शरण, शरणातून दास्यत्व, दस्यत्वातून सख्य असा हा भक्तीचा मनोमय प्रवास, देहाकडून अंतरात्मा आणि त्यातून परमात्मा या स्थानी समाप्त होतो. आता यातील एकेक मुद्द्यावर विचार करूया. एक गोष्ट ध्यानात असूद्या की, ईश्वर देह आणि देहाची स्थिती याबद्दल अनभिज्ञ असतो. किंबहुना कोणाही प्राण्याबद्दल ईश्वर देही न पाहता, मनाच्या स्थितीला पाहतो आणि त्यातून प्राण्याची परीक्षा करतो. अर्थातच मानवाच्या देहात मनाची स्थापना करून, बुद्धीच्या माध्यमातून त्याला उच्च अधिष्ठान दिलेलं असल्यामुळे, मुख्यत्वे हे सर्व मानवाच्या मनाबाबत आपण बोलत आहोत हे गृहीत धरावं. आपण देहाने केलेले कोणतेही उपचार ईश्वराकडे पोचत नाहीत. कारण ते देहाचे उपचार आहेत आणि मनाचा त्यात सहभाग नसेल तर, ते केवळ एक कर्म आहे. अर्थात त्या कर्माच जे फल, उपाचारपूर्वक प्राप्त होणं गरजेचं आहे, ते नक्की मिळेल. पण कोणत्याही स्वरूपाचं ईश्वरी आराधन हे मनाने आणि मुखतः आत्म्याने घडलेलं असेल तर त...