Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

अध्यात्म विराम १५२

अध्यात्म विराम १५२ मनातील ईश्वरी भक्तीचा भाव स्मरणातून सुरू होतो. स्मरणातून, उच्चारण, त्यातून श्रुती श्रवण, त्याची आवर्तनं, आवर्तनातून अर्चन, अर्चनातून अर्पण, अर्पणा तून शरण, शरणातून दास्यत्व, दस्यत्वातून सख्य असा हा भक्तीचा मनोमय प्रवास, देहाकडून अंतरात्मा आणि त्यातून परमात्मा या स्थानी समाप्त होतो. आता यातील एकेक मुद्द्यावर विचार करूया. एक गोष्ट ध्यानात असूद्या की, ईश्वर देह आणि देहाची स्थिती याबद्दल अनभिज्ञ असतो. किंबहुना कोणाही प्राण्याबद्दल ईश्वर देही न पाहता, मनाच्या स्थितीला पाहतो आणि त्यातून प्राण्याची परीक्षा करतो.  अर्थातच मानवाच्या देहात मनाची स्थापना करून, बुद्धीच्या माध्यमातून त्याला उच्च अधिष्ठान दिलेलं असल्यामुळे, मुख्यत्वे हे सर्व मानवाच्या मनाबाबत आपण बोलत आहोत हे गृहीत धरावं. आपण देहाने केलेले कोणतेही उपचार ईश्वराकडे पोचत नाहीत. कारण ते देहाचे उपचार आहेत आणि मनाचा त्यात सहभाग नसेल तर, ते केवळ एक कर्म आहे. अर्थात त्या कर्माच जे फल, उपाचारपूर्वक प्राप्त होणं गरजेचं आहे, ते नक्की मिळेल. पण कोणत्याही स्वरूपाचं ईश्वरी आराधन हे मनाने आणि मुखतः आत्म्याने घडलेलं असेल तर त...

अध्यात्म विराम १४९

अध्यात्म विराम १४९ सर्वसामान्य मानवी मनाचा हा गुणधर्म आहे की, एखाद्याचे ऋण असतील आणि त्यावर आपल्या जीवनाचा डोलारा उभा असतो, त्या ऋणकर्त्याचे ऋण आपण सहसा विसरत नाही. कृतज्ञ माणसाचं ते लक्षण आहे. आयुष्यात कितीही वर गेला तरीही, कोणताही माणूस, आयुष्यातील अश्या मदतीचे ऋण विसरत नाही, ज्याच्या आधारावर आपण पुढे जातो. आता या आपल्या कृतज्ञता पूर्ण स्वभावाच्या पार्श्वभूमीवर आपणच स्वतः बद्दल हा विचार करावा की, आपल्याला हा देह,मुळात हे श्वासाचं गणितं पुरवून, ज्याने आपल्याला या पृथ्वीतला वर पाठवलं आहे, त्याचे ऋण आपण कधीतरी फेडू शकतो का. तर नाही. बरं तो ईश्वर आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, अश्या अनंत प्रकारचे उपकार करून, आपलं जीवन समृद्ध करतो. पण तरीही जर काही न्यून असेल तर ते आपल्या कर्मातुन आलेलं न्यून आहे. असं असताना सुद्धा आपण, आपल्या कर्माच्या भोगांचा हिस्सा, ज्याचे आपल्यावर आधीच ऋण आहेत, अश्या ईश्वराच्या नावावर टाकून, आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करतो.  ईश्वराला सुद्धा हे पाहून खेद वाटतं असेल की, करणार माणसं स्वतः, उपभोग सुख आलं की, आपल्याकडे त्य...

अध्यात्म विराम १५१

अध्यात्म विराम १५१ कालची बोधकथा आपण वाचली. आता त्या अनुषंगाने चिंतन करूया. धर्म, शास्त्र आणि भगवंत स्वतः सांगतात की,नाम कोणत्याही प्रकारे घेतले तरीही,त्याचा परिणाम हा प्राप्त होतो. पण तो इष्ट परिणाम होतो. जरी पोपट पंची म्हणून नाम घेतले तरी, असा याचा अर्थ घ्यायचा का, यावर आता विचार करू. एक मुद्दा स्पष्ट आहे की, कर्म अवधान राखून केलं किंवा अनावधानाने केलं तरीही, ते आपलं फल देणार हा सिद्धांत आहे. पण त्या फळाचा परिणाम आपल्याला कधी प्राप्त होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे ते आपल्या कर्माच्या धर्मानुसार प्राप्त होईल.  आता कर्माचा धर्म म्हणजे काय. तर त्यामागील भाव भावना किंवा intensions असा याचा अर्थ आहे. म्हणजेच ज्या भावनेने कर्म घडेल, ती भावना हा त्या नामाचा धर्म झाला. त्या धर्माला आपलं फल जोडलं गेेलं. अर्थात त्याची फलप्राप्ती त्या धर्मानुसार होणार. आता विचार करा की, ईश्वराने जे म्हटलंय की, कोणत्याही भावाने नाम घेतलं तरी त्याची प्राप्ती होते. हे भगवत वचन असल्यामुळे, फल प्राप्ती होणार.पण त्या कर्माच्या धर्मानुसार. म्हणजेच आपण चुकून अथवा अनावधानाने एखाद्या व्यक्तीला वाटेत जाताना साद घातली...

अध्यात्म विराम १५०

अध्यात्म विराम १५० आज या लेखमालेला सलग १५० दिवस पूर्ण होत आहेत. याबद्दल श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि माझे समस्त वाचक यांचा मी ऋणी आहे.  सर्वात प्रथम सर्वांना, प्रभू श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩 श्रीराम जयराम जय जयराम, सियावर रामचंद्र की जय !!. आपल्या विषयात कालच्या भागापासून पुढे जाताना, एक बोधकथा आठवली, आधी ती सांगतो. मग विषयाकडे येऊ.  एका गावात एक कीर्तनकार कीर्तन करत असतं. त्यांचा तो नित्य नेम असे. अश्याच एका कीर्तनानंतर एक सद्गृहस्थ त्यांना शंका विचारायला आले आणि म्हणाले की, महाराज मी कशा प्रकारे नाम घेऊ, ज्यामुळे, ते फळेल आणि मला माझ्या भोग व उपभोग यातून योग्य मार्ग मिळेल. त्यावर बुवांनी त्यांना सांगितल की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या शंकेबाबत आपल्याला सविस्तर बोलता येईल. सद्गृहस्थ हो चालेल म्हणताच, बुवांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.  एका गावात एक विप्रवर रहात होता आणि त्याने एक पोपट पाळला होता. त्या पोपटाला त्याने जय श्रीराम म्हणायला शिकवलं होतं. तो पोपट दिवसभर त्याला पढवल होतं त्यानुसार, रामनामाचा जाप करायचा. एके दिवशी त्या गाव...

अध्यात्म विराम १४८

अध्यात्म विराम १४८ खरतर साधना ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणतीही केली तरी, तीच फल हे प्राप्त होतं. फरक फक्त लागणाऱ्या वेळेचा असतो. तरीही बऱ्याच साधनांमध्ये शुचिर्भूतता, ym नियम इत्यादी बंधनं असल्यामुळे, कलियुगात विशेषतः बदललेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात, ते सर्व साधणं सर्वानाच शक्य नाही. पण परमार्थाचा मार्ग, साधताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे का. तसं नक्कीच नाही. कारण आपण फक्त देश काल आणि सद्य स्थिती इतकचं बघू शकत असलो तरीही, विश्वाचा निर्माता हा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं, त्याने चारही युगात होऊ शकणारी परिस्थिती समजून, जाणून त्याची सोय सुद्धा करूनच नवविधा भक्तीची रचना केली आहे.  आपण या लेखमालेत, त्यातील श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य हे भक्तीचे सात प्रकार विस्ताराने पाहिले.सख्य भक्ती हा आठवा प्रकार पाहताना आपण त्यातील अनेक विषयांना स्पर्श करत इथपर्यंत आलो आहोत. काल. नामस्मरण अर्थात भक्तीचा तिसरा प्रकार किंवा तिसरी पायरी यावर आपण थोडं चिंतन केलं. वास्तविक श्रवण ते दास्य हे भिन्न पणे बघायचे किंवा जाणून घ्यायचे वा आत्मसात करायचे प्रकार नाहीत. तर त्या भक्...

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!!

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!!  सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वेळोवेळी काढलेल्या अपमानजनक विधानांबद्दलचा आक्रोश सध्या गाजतो आहे. वास्तविक ही काही पहिलीच वेळ नाही, राहुल गांधी यांनी असे उद्गार काढण्याची. गेल्या तीन वर्षात, विशेषतः महा आघाडीच्या काळात, अनेकदा राहुल गांधी यांनी मुद्दामहून तात्यारावांचा अपमान केला आहे. (मधला विकास हा मुद्दाम गाळलाय. कारण अडीच वर्षात राज्याला अधोगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं शासन राज्याने पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या नावात विकास शब्द लिहायचं धैर्यच होत नाहीये 😃. म्हणून महा आघाडी).  स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी, विधानसभेत आणि बाहेर सुद्धा, आपल्या भाषणात वेळोवेळी ही अगतिकता बोलून दाखवली आहे.कारण ज्यावेळी आघाडी सरकारच्या काळात असे प्रसंग जाणून बुजून गांधी यांच्याकडून, रचले गेले, त्या त्यावेळी, आपली कुचंबणा झाली, हे मुख्यमंत्री यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले आहे. कदाचित हे त्यावेळी मुद्दामहून सेनेची गोची करण्यासाठी घडवण्यात आलं असावं. पण त्यावेळी सेनेला सत्ता टिकवायची असल्यामुळे, त्यांना मूग ग...

अध्यात्म विराम १४८

अध्यात्म विराम १४८ खरतर साधना ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणतीही केली तरी, तीच फल हे प्राप्त होतं. फरक फक्त लागणाऱ्या वेळेचा असतो. तरीही बऱ्याच साधनांमध्ये शुचिर्भूतता, ym नियम इत्यादी बंधनं असल्यामुळे, कलियुगात विशेषतः बदललेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात, ते सर्व साधणं सर्वानाच शक्य नाही. पण परमार्थाचा मार्ग, साधताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे का. तसं नक्कीच नाही. कारण आपण फक्त देश काल आणि सद्य स्थिती इतकचं बघू शकत असलो तरीही, विश्वाचा निर्माता हा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं, त्याने चारही युगात होऊ शकणारी परिस्थिती समजून, जाणून त्याची सोय सुद्धा करूनच नवविधा भक्तीची रचना केली आहे.  आपण या लेखमालेत, त्यातील श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य हे भक्तीचे सात प्रकार विस्ताराने पाहिले.सख्य भक्ती हा आठवा प्रकार पाहताना आपण त्यातील अनेक विषयांना स्पर्श करत इथपर्यंत आलो आहोत. काल. नामस्मरण अर्थात भक्तीचा तिसरा प्रकार किंवा तिसरी पायरी यावर आपण थोडं चिंतन केलं. वास्तविक श्रवण ते दास्य हे भिन्न पणे बघायचे किंवा जाणून घ्यायचे वा आत्मसात करायचे प्रकार नाहीत. तर त्या भक्...

अध्यात्म विराम १४७

अध्यात्म विराम १४७ काल म्हटलेल्या प्रकारातील लोकांमधे, जी मानसिक स्थिती असते, ती मोठी विचित्र असते.म्हणजे रोग आहे हे माहीत असतं. पण त्याचं कारण मी नाही तर अन्य आहे, अशी ज्यांची धारणा असते, त्यांना मुळात ही धारणा अर्थात विचारांचं मूळ बदलणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही कृतीचा, कर्माचा पाया हा मानसिक धारणा किंवा विचार यावर अवलंबून असतो. एकदा पायाच चुकीचा असेल तर, पुढील सर्वच चुकत जाणार, हे सांगायला खरतर ज्योतिषाची गरज नाही. पण तरीही काहीजण आपल्या विचारतील विषमता लक्षात न इतर अन्य काही मार्गाने, काही सुधारणा होईल, का याचा जास्त विचार आणि पाठपुरावा करतात.  वास्तविक आपण मनाने स्वीकारलं की, भोग आणि उपभोग वा सुख आणि दुःख हे दोन्ही, एकतर जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि हे दोन्ही कर्मधिष्टित आहेत. म्हणजे दुःख आलं की, उद्वेग, निराशा या भावने पोटी आपण अनेक चुकीची विधान, विचार करून, आपल्या कर्माचा आलेख अजून चुकीचा करण्यास आपणच हातभार लावतो. नंतर पुन्हा हेदेखील म्हणतो की, माझं सुख कोणाला बघवत नाही.  म्हणजे आपणच आपल्या मार्गात विघ्नाची बाधा तयार करतो आणि नंतर विघ्न,दुःख आली की आपण त्यासाठी उपाय ...

अध्यात्म विराम १४६

अध्यात्म विराम १४६   आपण ज्या लोकांचा आधी विचार केला, त्याहून वेगळ्या प्रकारचे लोक, या जगतात मोठ्या संख्येने असतात. यांच्या मनात श्रद्धा नसते असं नाही. पण ती दोलायमान असते. म्हणजे सुखात, त्यांना देव आठवत नाही. त्यावेळी त्याचं श्रेयं हे स्व कर्तृत्व आणि कर्म याना देतात. त्यांच्या मते त्यांचं, यश, सुख, उपभोग हे, त्यांना त्यांच्या कष्टामुळे प्राप्त झालेलं आहे. मेहनत आणि जिद्द या त्यांच्यातील गुणांमुळे या स्थितीला ते आलेले असतात. पण आयुष्यात सर्व दिवस कधीही सारखे नसतात. त्यामुळे दुःख, भोग यांचा काळ आला की मात्र, याना अनेक गोष्टींना त्याचं श्रेय वाटून द्यावसं वाटतं. या गोष्टी असतात लोकांचा त्यांच्या यशविषयी मत्सर, त्यांच्यावर देवाची किंवा दैवाची अवकृपा अश्या अनेकानेक गोष्टी, त्यांच्या दुःखाला कारणीभूत असतात, असं याना, अश्या काळात सतत वाटत असतं. बरेचदा अशी माणसं माझं सुख देवालाच बघवलं नाही, असही म्हणायला मागे पुढे पहात नाहीत. म्हणजे त्यांनी मेहनत करून, उत्तम कर्म करून जे प्राप्त केलेलं आहे, त्यावर दुःखाची भोगांची छाया, इतर अनेक बाह्य कारणांनी पडलेली आहे. म्हणजे कर्मात, कर्तव्यात किंवा आय...

अध्यात्म विराम १४५

अध्यात्म विराम १४५ पहिल्या प्रकारातील व्यक्ती या आलेला प्रत्येक क्षण हा निरिच्छ मनाने जगतात. म्हणजे आयुष्यात कोणत्याही काळात, परिस्थितीत आणि सुख वा दुःख या स्थिती असतील, तरीही ही लोकं कोणत्याही प्रकारचा वेगळा विचार मनात येऊ देत नाही. अत्यंत साधेपणाने जगून, कोणताही फार मोठा टप्पा आयुष्यात न गाठता सुद्धा हे मनाने उत्तम आयुष्य जगतात. आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य विनातक्रार आणि प्राप्त परिस्थितीनुसार  जगत मार्गक्रमणा करतात. भौतिक दृष्ट्या फार काही मिळवलं नसेल, पण अध्यात्मिक दृष्टीने याना बरच काही प्राप्त होतं.  कारण ईश्वराच्या नजरेत, ज्यांना वाट्याला आलेलं निमूट पणे सोसून पुढे जाणारी माणसं जास्त आवडतात. कारण जे कर्माच्या मार्गाने प्राप्त झालं,ते आपल्याच हिश्श्यातील नफा वा नुकसान आहे. ते आपल्याच खात्यात आपण नोंदवून घेतलं पाहिजे.त्यामुळे या तत्वाला वा ब्रीदाला जगतो आणि त्यानुसार जगतो, तो या जन्मात नाही, पण पुढील जन्मात, नक्की, उच्च पदावर जातो. हे म्हणजे आपल्या नोकरीत इमानाने काम करणारा, उशिराने पण योग्य पदाला पोचतो. या मागे अजून एक कारण आहे.गीतेत ईश्वराने स्वतः, त्याच्यापर्यंत पोचण्...

अध्यात्म विराम १४४

अध्यात्म विराम १४४ कर्मफल प्राप्ती आणि त्याचा भोग वा उपभोग हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना पूर्ण जीवन त्याच साठी आहे. काल आपण माणसांच्या वैचारिक पातळीचे पाच प्रकार पाहीले. आता त्यावर विचार आणि चर्चा करूया. अनेकदा आपण माणसांचे हे पाचही प्रकार अनुभवले असतील किंवा अश्या प्रकारच्या माणसांशी आपला जवळून किंवा लांबून परिचय, झाला असेल, निदान माहिती झाली असेल.यातील पहिल्या प्रकारातील माणसं आणि शेवटच्या प्रकारातील माणसं ही मला एकाच प्रकारातील वाटतात.  पहिल्या प्रकारातील माणसं, कोणत्याही फल स्वरूप स्थितीत आपलं जगणं दृढतेने आणि कोणत्याही प्रकारची मानसिक आंदोलनं किंवा विचारांची फारशी धांदल न होता जगतात. शेवटच्या प्रकारात ज्ञानामुळे, अनुभूती मुळे, प्रचितीमुळे आत्मसाक्षात्कार झालेले हे जीव, जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भोग आणि उपभोग दोन्ही परिस्थितीत सारख्याच पद्धतीने मार्ग क्रमण करून, जे समोर येईल ते आपल्या कर्माचं फल आहे आणि ते प्राप्त झाल्यावर स्वीकारून पुढे जाण, हे क्रमप्राप्त आहे, याची त्यांना जाण असते. पण ही संचितातील शिल्लक कर्माबाबत त्याची धारणा असते. वर्तमानातील कर्माच...

अध्यात्म विराम १४३

अध्यात्म विराम १४३ कर्ममार्ग आचरतांना, आपल्या कर्माच्या फलातून आपलं जीवन नित्य, अविरत आणि प्रवाही होऊन, पुढे जात असतं. जगात साधारण तीन, चार प्रकारची लोकं असतात.एक आलेलं जीवन निमूटपणे जगून, कोणतीही तक्रार न करता, आपल्याला मिळालेलं आयुष्य जगून, हे जग सोडून निघून जातात. एक प्रकारे निरिच्छ म्हणता येईल, अशी ही माणसं. दुसरा प्रकार म्हणजे, कष्ट, दुःख, भोग या प्रत्येक वेळी, तक्रार करून, सुख आलं की, आपल्या कर्माच्या फलाची प्राप्ती, असं म्हणून आपल्या चांगल्या दिवसांचं, आपल्या कर्मांना श्रेय देऊन, जगणारे जीव.  याना आपल्या उत्तम काळात देव, दैव आठवत नाही, किंवा आठवावस वाटतं नाही. पण भोगांच्या काळात यांना आपला देव आपल्यालाच कसा त्रास देतो, याची सतत बोचणी किंवा सल सतावत असते. म्हणजे सुखात आपल्या कर्माने आपल्याला प्राप्ती होत आहे, हा नाण्याच्या एका बाजूचा न्याय वा तत्व, आपल्या भोग व दुःख या काळात लागू होतं, ही नाण्याची दुसरी बाजू त्यांना जाणवत नाही, किंवा मंजूर नसते, असच म्हणावं लागेल. म्हणून याना कायम देव यांनाच दुःखात लोटतो, या गोष्टीचा त्रास, मनाला सतत टोचत असतो.  तिसऱ्या प्रकारात, कर्म आण...

अध्यात्म विराम १४२

अध्यात्म विराम १४२ सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.  काल म्हटल्याप्रमाणे ज्या कार्यात ईश्वरी स्मरण असतं, ते कार्य अंती उत्तम फलदायी होतं. त्याचप्रमाणे जे कार्य करताना ईश्वराच्या स्मरणाचां विसर होतो, ते कार्य अंती, दुःख, भोग आणि कष्ट आपल्या वाट्याला येतात. आज यावर विचार करूया. कारण हे फक्त एक विधान नाही, तर ते एक सत्यवचन आहे. तेदेखील प्रत्यक्ष ईश्वराचं वचन आहे. आता विषयाकडे वळूया. जे कर्म ईश्वराच्या स्मरणात केलं जातं ते अंती उत्तम फल देत. हे सर्वश्रुत आहे.  यावर लगेच एक विचार मनात येतोच की, कोणतंही कर्म जे ईश्वर चिंतनात वा स्मरणात केलं जातं, ते सर्व या सदरात येत. मग यात चांगलं वाईट असं सर्व कर्म येत का. तर हो, येतं. काही गोष्टी खुलासेवार चिंतनातून जाणून घेऊ. चांगलं कर्म केलं तर नक्कीच त्याचं फल चांगल मिळेल कर्मफल न्यायाने. पण ईश्वराच्या स्मरणात त्याचं फलित योग्य स्वरूपात आणि विशेष म्हणजे योग्य तऱ्हेने आणि योग्य वेळी आपल्याला प्राप्त होतं. हा या स्मरणाचा मुख्य लाभ आहे.  मुळात एक लक्षात घ्या की, ईश्वर स्मरण हा व्यवहार नाही. त्यामुळे हे ...

अध्यात्म विराम १४१

अध्यात्म विराम १४१ खरंतर विश्वाची निर्मिती करताना विश्वाच्या पालक असलेल्या ईश्वराला, सांसारिक, प्रापंचिक आणि अध्यात्मिक, या भिन्नते बाबत कल्पना नसेल, हे म्हणणं धाडसाचं आहे. कारण त्रिकाल ज्ञानी ईश्वराला कल्पांता पर्यंत काय काय होणार याची पूर्ण कल्पना असणार. मग या दोन्हींमध्ये सांगड घालून, दोन्ही मार्गाने इश्वरापर्यत जाण्यासाठी एक मुख्य रस्ता जो यामधे आखून दिलेला आहे, तो म्हणजे,भक्तिमार्ग. पण कर्माची सीमा पार केल्याशिवाय हे शक्य आहे का. तर नाही. कारण जोपर्यंत कर्म आहेत, तोपर्यंत फलरुपात भोग व उपभोग आहेतच. पण हे भोग आणि उपभोग आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात किंवा करू शकतात.  कारण कर्महिन कोणीही राहू शकत नाही. पण मग उपाय काय. कारण मन हे असं इंद्रिय आहे, ज्याला गतिमानता आणि चंचलता दोन्ही अवगुण प्रदान केले आहेत आणि जाणिवांच्या कोणत्या केंद्रातून, कोणता विचार येईल, हे ईश्वराला सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे ते मन, सतत प्रत्येक गोष्टीचा विचार करत राहणार. सुख आलं की हरखून जाणार आणि दुःख आलं की,हिरमुसणार. म्हणजे प्रत्येक क्षण कोणत्यातरी विचारात देह, बुद्धी वाचा व सर्वेंद्रिय यांना कार्य...

अध्यात्म विराम १४०

अध्यात्म विराम १४० भूतलावरील किंवा ब्रम्हांडातील अनेक गोष्टींचं ज्ञान डोळे, कान, बुद्धी, मन, यांच्यामुळे होतं. जे दृश्य, श्राव्य या भौतिक स्वरूपा तील गोष्टींचं ज्ञान आहे, ते देहाच्या इंद्रिये, स्पर्श, गंध, रस, इत्यादी माध्यमातून बुद्धीपर्यंत प्रवास करून, त्याचा अर्थ, रूप, स्वरूप आवाज या सर्वांचं आकलन देहाला होतं. हे सर्वश्रुत असलेलं वैश्विक पण सर्वसामान्य ज्ञान आहे. या ज्ञानाने, मनुष्याची, इह लोकातील सर्व जाणिवांची जागृती होऊन, अनेक गोष्टींचं आकलन होतं. आयुष्यभर ज्ञानेंद्रिय आहेत तोपर्यंत, हे ज्ञान प्राप्त होत असतं. याचं ज्ञानाच्या अनुभवातून मनुष्य समृद्ध जीवन जगतो किंवा जगू शकतो. या भूतलावर असलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून मनुष्य भौतिक जगता तील सर्व सुख, आपल्यासाठी सिद्ध करू शकतो आणि समृद्ध होऊ शकतो. पण हा प्रवास फक्त या इहालोकातील असेल तर, सर्वच योग्य झालं असतं. पण तसं होताना दिसत नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे कर्म फल सिद्धांत. जो एखाद्या ऐन सुखाच्या क्षणी हातातून पेला हुसकावून घेतो आणि क्षणापूर्वी भरलेला हात रिक्त करून मोकळा होतो. एखादी घटना क्षणात डोंगरा वरून उतरवून, दरीच्या खो...

अध्यात्म विराम १३९

अध्यात्म विराम १३९    खरतर अध्यात्मिक मार्ग हेच प्रत्येक जीवाचं एकमेव ध्येय असायला हवं. कारण ईश्वराने आत्म्याला, या ब्रम्हांडात पाठवताना, तोच उद्देश समजावून पाठवलं आहे. पण या ब्रम्हांडात आल्यावर, प्रथम त्या आत्म्याला देहाचा आसरा घ्यावा लागतो. कारण या नरदेहाशिवाय अन्य कोणताही मार्ग,आत्मोध्दार व आत्मोन्नती चा उपलब्ध नाही. त्यामुळे इथे ईश्वराने त्या आत्म्याला घातलेलं कोडं सुरू होतं. कारण या देहात आल्यावर सर्वात प्रथम मायेचा खेळ सुरू होतो आणि नंतर प्रपंचाचा गुंता अधिकाधिक दृढ होत जाऊन, जीव जन्मोजन्मा साठी मायाबद्ध होतो. विश्व पसाऱ्यात माझा प्रपंच मी, माझे भोग, उपभोग आणि मी, माझं भलं आणि मी या संकुचित चक्रात अडकून जातो. काळाच्या ज्या खेळात तो जन्म घेतो, यानुसार तो त्या त्या भूमिका वठवून, आपली प्रपंचा प्रती योग्यता सिध्द करतो. हाच फेरा प्रतीजन्मी असच पडत राहतो आणि जीव मायेत अडकत जाऊन, विश्वाच्या चक्राचा एक अविभाज्य भाग होऊन राहतो. खरा उद्देश काय, आपलं खरं कार्य काय आणि आपल्याला काही दिवसांसाठी मिळालेला, त्या त्या जन्मातील देह हेच आपण, हा विश्वास दृढ होऊन, पक्का होतो. कदाचित हा आता म...

अध्यात्म विराम १३८

अध्यात्म विराम १३८   आपल्या आयुष्यात अनेकदा अश्या काही सांकेतिक घटना घडतात. त्यांचा गूढार्थ आपल्याला उमगत नाही. कदाचित त्यांचा संबंध या जन्मातील मागील किंवा मागील जन्मातील एखाद्या घटनेशी निगडित असूही शकतो. पण आपल्याला त्याचा अर्थ सापडत नाही. बरेचदा आपण स्वप्नात सुद्धा अश्या काही गूढ गोष्टी बघतो, ज्यांचा वास्तविक संबंध आपल्या जीवनात, निदान या जन्मात आणि आपल्याला स्मरणात असलेल्या कोणत्याही गोष्टीशी, प्रसंगाशी वा घटनेशी नसतो. त्यांचे गूढार्थ उमगावेत असं आपल्याला वाटतं. काहींना ते स्वप्न म्हणून फार लक्ष देण्यासारखं वाटतं नाही. तर काही जणांना त्यांचा अर्थ समजावा असं वाटतं. मानसशास्त्र असं सांगतं की, आपल्या आयुष्यात कुठेतरी घडलेली, आपण पाहिलेली पण त्यावेळच्या व्यस्ततेमुळे जागृत मनाने नोंद न घेतलेली एखादी गोष्ट, छोटीशी घटना सुद्धा, सुप्त मनात नोंदवली जाते. अशी घाईत आपल्या जागृत मनाने नोंद न घेतलेली घटना वा एखादा प्रसंग सुप्तमन, जागृत मनाच्या पटला वर मांडून, ते नोंदवून देण्याचा प्रयत्न करतं. पण परमानसशास्त्र म्हणून एक जन्माला आलेली विज्ञानापलीकडील एक संशोधन करणारी शाखा आहे. त्यांचा उद्देश ...

अध्यात्म विराम १३७

अध्यात्म विराम १३७ ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पोचून तिथे आपला संदेश स्वतः देऊ शकत नाही, तिथे आपण अनेकदा अप्रत्यक्ष पणे आणि इतर माध्यमाने, आपला संदेश किंवा म्हणणं पोचवण्याचा प्रयत्न करतो.म्हणजेच आपल्याला, एखाद्या बद्दल कळकळ किंवा करुणा भाव असेल तर त्याला काहीही करून आपण त्याला मार्ग मिळावा यासाठी, प्रयत्न करतो. असा प्रयत्न अनेक मार्गांनी असू शकतो. पण मूळ उद्देश त्या व्यक्तीबद्दल असलेला स्नेह, करुणा हा असतो. आपल्या विशिष्ट स्थानामुळे व स्थिती मुळे आपण असा संदेश पाठवू शकत नसलो, तर आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकणाऱ्या, एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीला त्यासाठी निःसंकोचपणे कामाला लावतो.  किंवा जिथे यातील काहीही शक्य नसेल तर निदान काही सांकेतिक अर्थाने, संदेश पाठवून, त्या व्यक्तीला चुकण्या पासून रोखण्याचा प्रयत्न जरूर करतो. अर्थात तेवढी घसट असेल किंवा तितकं स्नेह माया व प्रेम असेल, त्याच ठिकाणी आपण असे संदेश पाठवून जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. यात मुख्य उद्देश त्या व्यक्तीला सत्य परिस्थिती जाणवून, त्यातून त्याने सावरावं, पुढे जावं, ठेच खाऊ नये आणि जीवनात मागे तर निश्चितच येऊ ...

शिंदे ठाकरे खटला, युक्तिवादाचा शेवटचा दिवस !!

शिंदे ठाकरे खटला, युक्तिवादाचा शेवटचा दिवस !! काल १६/०३/२०२३ ला, ठाकरे शिंदे खटल्यात, सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रचूड आणि ठाकरे यांचे वकील श्री अभिषेक मनु सिंघवी यांच्यातील संवादाचा भाग जसाच्या तसा.  While the questions yesterday were addressed to Solicitor General Tushar Mehta, the Court today addressed its queries to the lawyers appearing for the Thackeray camp. *"What happens if we come to the conclusion and say that exercise of power by the Governor was not correct? What happens - does Uddhav Thackeray becomes CM? But he resigned no? It is like the Court being told that reinstate a government which has resigned."* *Justice Shah weighed in saying,* *"How can this Court reinstate a Chief Minister who did not face the floor test only?"* *Senior Advocate Abhishek Manu Singhvi responded saying that only the status quo ante has to be restored.* *To this the CJI said,* *"The correct thing to do was you (Uddhav Thackeray) should have faced the t...

हुकलेला शापत्विधी, देवाभाऊ आणि अजितदादा !!

हुकलेला शापत्विधी, देवाभाऊ आणि अजितदादा !!  नुकतंच काही दिवसांपूर्वी हुकलेल्या तीन दिवसीय सरकारबद्दल, फडणवीस थोडंसं किंवा अगदी किंचित बोलले. त्यात त्यांनी हा सत्याचा काही भाग आहे, असा उल्लेख केला. काही दिवस ही बातमी चवीने चर्वण करत, मराठी मीडियाने हा विषय चघळला. त्यावर पवार साहेबांनी त्रोटक विधान करून, आपल अंग झटकण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते अपेक्षित होतच. कारण त्यावेळी फडणवीस यांनी पवारांच्या संमतीने हे सर्व झालं असं मोठं विधान केलं आणि पवारांनी त्याचा इंकार केला नाही. पण एवढं विधान जरूर केलं की, आपण फडणवीस याना एक सभ्य व्यक्ती समजतो.  म्हणजे फडणवीस याना सूचक इशारा की, पुढचं बोलू नका, अर्थात आतापर्यंत दाखवलेला सभ्यपणा असाच पुढे दाखवा. त्यामुळे जे काही घडलं, त्यामधे काकांचा रोल नक्कीच असणार आणि हा औट घटकेचा संसार मोडायला पवारांचीच खेळी कारणीभूत झाली. दादांकडे असलेले सर्व आमदार हळूहळू करत, परत माघारी गेले. दादांना सुद्धा नाईलाजाने जावं लागलं. म्हणजे एकतर त्यांचं फडणवीसांकडे येणं किंवा फडणवीसा कडून जाणं, दोन पैकी एक हे दादांच्या मनाविरुद्ध होतं,हे नक्कीच. तरीही माझ्या अंदाजाने...

शिंदे ठाकरे खटला, युक्तिवादाचा शेवटचा दिवस !!

शिंदे ठाकरे खटला, युक्तिवादाचा शेवटचा दिवस !! काल १६/०३/२०२३ ला, ठाकरे शिंदे खटल्यात, सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रचूड आणि ठाकरे यांचे वकील श्री अभिषेक मनु सिंघवी यांच्यातील संवादाचा भाग जसाच्या तसा.  While the questions yesterday were addressed to Solicitor General Tushar Mehta, the Court today addressed its queries to the lawyers appearing for the Thackeray camp. *"What happens if we come to the conclusion and say that exercise of power by the Governor was not correct? What happens - does Uddhav Thackeray becomes CM? But he resigned no? It is like the Court being told that reinstate a government which has resigned."* *Justice Shah weighed in saying,* *"How can this Court reinstate a Chief Minister who did not face the floor test only?"* *Senior Advocate Abhishek Manu Singhvi responded saying that only the status quo ante has to be restored.* *To this the CJI said,* *"The correct thing to do was you (Uddhav Thackeray) should have faced the t...

अध्यात्म विराम १३६

अध्यात्म विराम १३६ ज्ञानाचे ढोबळ दोन प्रकार होऊ शकतात. एक विश्वाचं आणि दुसरं विधात्याबाबतच. विश्वाचं ज्ञान हे या जगता तील अनेक गोष्टींबाबत गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण ते इतकं विपुल आहे की, बहुतेक जण आपल्या गरजा व जगण्याच्या आपल्या स्थितीनुसार ते ज्ञान अर्जन करून, त्यावर आपली गुजराण करण्याचा प्रयत्न करतो. पण हे ज्ञान, प्राप्त परिस्थितीचा विचार करून घडलेलं व घडवलेलं असतं. अर्थातच जशी परिस्थिती, काळ, स्थळ, गरजा व स्थिती बदलते, त्याप्रमाणे त्याची आवश्यकता बदलत जाते आणि नवनवीन ज्ञानाच्या प्राप्तीची पुन्हा पुन्हा आवश्यकता भासत जाते. पण जगतातील सर्वच या ज्ञानाला प्राप्त करू शकतील असं नाही. उदाहरणार्थ एखाद्या वय झालेल्या आणि त्यामुळे जुन्या पठडीत, व्यवस्थेत शिकलेल्या व्यक्तीला, आवश्यक असूनही, वयामुळे निवृत्ती स्वीकारून जीवन जगण्याच्या शर्यतीत मागे पडावं लागतं. काही त्यावर मात करून, नवनवीन कल्पना, कला, कर्तृत्व, कसब, ज्ञान प्राप्त करून टिकून राहण्यात यशस्वी असतात. यात तुमची बुद्धी, शारीरिक क्षमता, वय, मनाची घडी यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तश्या त्या अनेक गोष्टी बाबत या सर्व गोष्टींवरअवलंबून ...

अध्यात्म विराम १३५

अध्यात्म विराम १३५ मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट, विचार लहरी या कुठल्या तरी तर्काने किंवा सिद्धतेने प्रेरित किंवा सक्षित्वाने सिध्द होणारी असते. म्हणजे अतार्किक, असंबद्ध असैद्धांतिक गोष्टी मन करमणूक म्हणून पाहून वा ऐकून सोडून देतं. मनाचा हा मूळ व नैसर्गिक गुणधर्म आहे. पण ही परिमाणं व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. पुन्हा व्यक्तिपरत्वे ही भिन्नता परिस्थिती,ज्ञान,आकलन, चिंतन आणि विश्लेषण यावर अवलंबून असते.म्हणजे माणूस परिस्थिती व आपल्या व्यक्तिगत स्थिती यावर आधारित लहरी, विचार तर्क याना स्वीकारतो किंवा नाकारतो. नाकारतो म्हणजे तो त्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्या नाकारलेल्या गोष्टींचा, विचारांचा व लहरींचा कोणताही परिणाम, मनावर होत नाही. अर्थात माणूस विचार करून एखादी गोष्ट मनात ठरवतो किंवा अविचाराने न ठरवून कृती करतो. पण या दोन्ही स्थितीत त्याची मनाची भावावस्था त्याला मार्गदर्शन करते. आता मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही. उदाहरणार्थ एखाद्या दुर्गम भागात खेड्यात राहणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या कल्पनेत किंवा निरीक्षणात न आलेली कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती खरी वाटू शकते. याचं कारण ज...

अध्यात्म विराम १३४

अध्यात्म विराम १३४ ज्ञान व संस्कार यांनी आत्मा घडतं जातो आणि तो प्रत्येक देहात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यामधे, मनाची साथ ही अत्यंत महत्वाची आहे. कारण देह व आत्मा याना सांधणारा दुवा किंवा लिंक ही मन आहे. पण मन हे फक्त दुवा किंवा लिंकच नाही तर ते कळ म्हणजे बटण, बल म्हणजे force, power, ऊर्जा म्हणजे energy आहे. त्यामुळे मनाला जपणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या मनाला इतकं महत्व आहे म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचून आपल्याला, त्यांचा नित्य अभ्यास करण्यास सांगितलं आहे.  आपण त्याला फक्त अध्यात्मिक महत्व देऊन, देवघरात स्थान देऊन, स्थापित करून मोकळे झालो किंवा त्यांचं नित्य पठण करणं आपलं कर्तव्य समजतो. वास्तविक त्यांचं महत्व माणूस म्हणून माणसाला घडवून, नंतर त्याला परम ईश्वराच्या मार्गाकडे वळवावं हा त्यामागे उद्देश आहे. तसं पाहिलं तर आपल्या नित्य अभ्यासात असलेल्या किंवा आपल्याला माहीत असणाऱ्या अथवा माहीत नसलेल्या अनेक मंत्र, श्लोक, स्तोत्र इत्यादी मागे गूढ आणि गहन वैज्ञानिक अर्थ आणि प्रक्रिया दडलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास त्याचं दृष्टीने व उद्देशाने व्हावा, यासाठी त्या स्तोत...

अध्यात्म विराम १३४

अध्यात्म विराम १३४ ज्ञान व संस्कार यांनी आत्मा घडतं जातो आणि तो प्रत्येक देहात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यामधे, मनाची साथ ही अत्यंत महत्वाची आहे. कारण देह व आत्मा याना सांधणारा दुवा किंवा लिंक ही मन आहे. पण मन हे फक्त दुवा किंवा लिंकच नाही तर ते कळ म्हणजे बटण, बल म्हणजे force, power, ऊर्जा म्हणजे energy आहे. त्यामुळे मनाला जपणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या मनाला इतकं महत्व आहे म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचून आपल्याला, त्यांचा नित्य अभ्यास करण्यास सांगितलं आहे.  आपण त्याला फक्त अध्यात्मिक महत्व देऊन, देवघरात स्थान देऊन, स्थापित करून मोकळे झालो किंवा त्यांचं नित्य पठण करणं आपलं कर्तव्य समजतो. वास्तविक त्यांचं महत्व माणूस म्हणून माणसाला घडवून, नंतर त्याला परम ईश्वराच्या मार्गाकडे वळवावं हा त्यामागे उद्देश आहे. तसं पाहिलं तर आपल्या नित्य अभ्यासात असलेल्या किंवा आपल्याला माहीत असणाऱ्या अथवा माहीत नसलेल्या अनेक मंत्र, श्लोक, स्तोत्र इत्यादी मागे गूढ आणि गहन वैज्ञानिक अर्थ आणि प्रक्रिया दडलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास त्याचं दृष्टीने व उद्देशाने व्हावा, यासाठी त्या स्तोत...

अध्यात्म विराम १३२

अध्यात्म विराम १३२ विचारांची मशागत पक्की होण्यासाठी त्यांचं बीज मनात रुजलं पाहिजे.विचार ज्याप्रकारचे असतील त्याप्रकारचं पीक येणार. अर्थात जसे विचार रुजवले जातील, तसेच विचार परावर्तित होऊन मनातून बाहेर येणार. जसे विचार येणार,तशीच कृती घडणार.सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार मनात रुजू शकतात. जे विचार रुजतील, तेच कर्म रुपात बुद्धी वाचा व मन यातून बाहेर येतील. अर्थात ज्या लहरींची बीजं आपण मनात पेरत जाणार, त्याचं लहरी विचार रूपातून प्रकट होऊन, बुद्धी, वाचा व देह यांचा उपयोग करून, आपल्याला कर्मरुपात समोर आलेली दिसणारं. कारण मन हे उत्पादनशील जमिनी प्रमाणे आहे. ती कधीही कोणत्याही विचारांना निराश करत नाही, जोपर्यंत आतील विचारांची बैठक पक्की असतं नाही. म्हणजे बी जमिनीत नीट रुजत नाही तो पर्यंत चांगल्या पिकाची शाश्वती देता येणार नाही. म्हणजे तुमचे विचार ठाम आणि स्थिर असतील तर बाहेरून येणारे कोणतेही दुसरे विचार, त्यात बदल करू शकत नाहीत. याकडे दोन प्रकारे पाहता येईल. जर मना तील वाईट, दुष्ट, कु व दुर्विचार ठाम असतील तर बाहेरून आलेले चांगले विचार,त्याजागी रुजणार नाहीत. याउलट, जर मनातील, सकार...

अध्यात्म विराम १३३

अध्यात्म विराम १३३ मुळात विचारांना महत्व का द्यायचं,तर तेच सर्व काही साध्य करून घेतात आणि देतात. कारण विचार शून्य कृती ही घातक आहेच पण अविचाराने केलेली कृती हीसुद्धा तितकीच आत्मघातकी असते. म्हणजे विचारांचा अभाव आणि योग्य विचारांचा अभाव अश्या दोन्ही कारणांनी माणूस चुकीची कर्म करून, भोग, दुःख, पश्चात्ताप ओढवून घेतो. पण नंतर मात्र दोष देव व दैव याना देतो. एकजरी खरं असलं की, आपण प्रत्येक कर्माची संगती फलाशी लावू शकत नाही, तरीही तशी तर्क संगती लावून आपण ताडून पाहू शकतो. पण आपल्या सर्व कर्मांची फलनिष्पत्ती याचं जन्मात होईल असं नाही. कारण आपण फक्त या देहाचा आणि याच जन्माचा विचार करू शकत असलो तरीही, आत्मा हा अविनाशी आहे आणि तो नित्य एका देहातून दुसऱ्या देहात, इच्छापूर्ती साठी फिरत असतो. इच्छा या वासने तून जन्म घेतात आणि वासना मायेतून. आता वासना या चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या असतात त्याच प्रमाणे माया सुद्धा चांगली व वाईट दोन्ही प्रकारची असते. जसं लग्न करणं आणि आपला प्रपंच पुढे नेऊन, प्रजोत्पादन करणं, हा एक नैसर्गिक नियम व अधिकार आहे. त्या अधिकारापोटी अनेक गोष्टी माणूस करतो. म्हणजे इथे...

अध्यात्म विराम १३१

अध्यात्म विराम १३१   अनेकवेळा मन अनेक कारणांनी, बोथट, कठोर किंवा रुक्ष होतं किंवा होऊ शकतं. असा प्रत्यय आल्यानंतर, आपण त्या मनाला, थोडावेळ, निश्चिंत किंवा शांत बसायला लावावं. जेणेकरून, त्याला आपल्यातील रुक्षतेची प्रचिती येईल. या प्रचीतीचा अनुभव अनेक प्रकारांनी मनाला येऊ शकतो. आपण बरेचवेळा चित्रपटात पाहतो की, एखादी अती तापट, कोपिष्ट व्यक्ती, एकतर तितक्याच तापट, रागीट व्यक्तीच्या सान्निध्यात आली असता, विचारी होते आणि काही क्षणात त्या व्यक्तीच्या स्वभावात अमुलाग्र बदल होतो किंवा होऊ शकतो.  या मागे मानसशास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहे. दोन समान आणि अविनाशी व एकाच दिशेने आलेल्या शक्तींचा संघर्ष झाला की, त्या घर्षणातून नक्कीच काही उत्तम उत्पन्न होतं, हा निसर्गनियम आहे. उदाहरणार्थ एकाच दिशेने आलेले दोन ढग, जेंव्हा एकमेकांवर आदळतात, तेंव्हा त्यातून पाऊस आणि वीज निर्माण होते, हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. त्याप्रमाणे मन जेंव्हा अतिरागीट वा अतीचंचल असतं, तेंव्हा त्याला एकतर अतिविचाराने किंवा एकदम शांत करून, नियंत्रणात आणता येतं. म्हणून आपल्या हातात जे आहे, ते म्हणजे ज्या क्षणी राग, क्रोध अती...

श्रीकृष्णनीती भाग ३८

श्रीकृष्णनीती भाग ३८ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्णाच्या काळापासून,अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक अशी सर्वच स्तरावर सुबत्ता अनुभवून उपभोगणारा जगातला एकमेव देश म्हणजे भारतवर्ष. इतर देश वा संस्कृती या चाचपडत देखील नव्हत्या, त्यावेळी येथे सर्व बाबतीत संपन्नता नांदत होती. खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात सोन्याचा धूर निघत होता. कदाचित याचं आकर्षण वाटून, यांच्या लोभापायी हे वैभव लूटण्याकरता येथे अश्या मुलखातून टोळ्या आल्या, ज्यांनी या वैभवाचा एक शतांश देखील, कधी अनुभवाला नव्हता.  प्रथम येऊन गेलेले या बद्दल या देशाबाहेर जितकं जास्त सांगत गेले असतील, त्या वर्णनानुसार येथील अमाप संपत्तीचा, वैभवाचा उपभोग घेऊन, यातील जास्तीत जास्त लुटून नेण्याकरिता, अजून अजून टोळ्या येत गेल्या. सुरवातीला कदाचित इथली संपन्नता इतकी होती कि, लुटून नेलेलं ऐश्वर्य हे गुंजभर भासत असल्यामुळे, येथील राजे आणि प्रजा दुर्लक्ष करत गेले. त्याचा परिणाम म्हणून अजून लूट नेण्यासाठी, टोळ्या येत गेल्या.  अगणित संपत्ती असल्यामुळे असलेली बेफिकिरी, हि घातक ...