Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२

भोग आणि ईश्वर  ३२
   
भोग आहेत हे कळलं, त्याचं कारण सुद्धा जाणलं की आपलंच कर्म आणि त्याचं परिमार्जन भोग भोगणे, सद्गुरू सान्निध्यात नामस्मरण करणे. पण कळतं तरी वळत नाही. 

मुळात नाम म्हणजे काय. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं, त्यांच्या नित्य साधनेतील किंवा जर आपण गुरू केले नसतील तर दत्तगुरूंना शरण जाऊन त्यांच्या नामाने जप सुरू करावा,  असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं की, 

गुरूपद हेच मुळात श्रीदत्तगुरुमाऊली यांच्या पासून सुरू झालं. त्यामुळे योग्य वेळ आली की तेच तुम्हाला तुमच्या भाग्ययोगातील सद्गुरूंची भेट घडवतील आणि तो भाग्ययोग प्रारब्धानुसार, कर्मबंधनानुसार आणि आपल्या साधनेनुसार ठरेल. ते जेंव्हा ठरवायचं असेल तेंव्हा ठरवेल प्रारब्ध, पण आपण जप आताच सुरू करायला हरकत नाही. 

आपल्या उद्धाराच्या मार्गावर आपण लवकरात लवकर वाटचाल सुरू करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय कर्मबंधनं सुटण्याची वेळ दूर जात राहील. म्हणजेच जर ते काम पुढील जन्मी होणार असेल तर ते अजून पुढे जाईल, कारण आपण सुरवातच मुळात उशिरा करतो आहोत. त्यामुळे निःसंकोचपणे सुरवात करून त्याचा नित्य जमेल तितकाच सुरवातीस अभ्यास करावा. 

आता अभ्यास तोही या वयात किंवा कोणत्याही वयात म्हणजे थोडं कठीण वाटतं. पण अभ्यास म्हणजे प्रयास, सराव जेणेकरून ती गोष्ट अंगवळणी पडेल आणि सतत करताना त्याचा त्रास न होता सरावामुळे सुलभपणा येईल. म्हणून नामस्मरण  सुरवातीला फार न करता त्याचा सराव करून हळूहळू वाढवत जावं, ज्यामुळे त्यात मन हळूहळू गुंतत जाईल आणि गोडी लागेल. 

एखाद्या गोष्टीचा सराव करत गेलं आणि सातत्य राखलं की ती गोष्ट अंगवळणी पडत जाते. त्यानंतर ती आपल्या वृत्तीचा भाग होऊन जाते. वृत्ती म्हणजे मनाची नैसर्गिक अवस्था, ज्यामुळे माणूस खरा ओळखला जातो. शांत वृत्ती, क्रोधीत, विचारशील, चिंतनशील असे वृत्तीचे प्रकार आहेत. अनंताच्या प्रवासात आपण ज्यावेळी आपली वृत्ती सुधारून तिला जाणीवपूर्वक नामाचा वा जपाचा ध्यास लावू त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने पुढच्या मार्गाला लागू. 

चित्तवृत्ती निरोधीत करणं हे नामस्मरणात अत्यंत महत्वाचं आहे. पण ते सारवानेच जमू शकतं. म्हणून त्यासाठी सराव करणं महत्वाचं आहे. सरावाने खूप कार्य सुलभ होतात. त्यासाठी रोज लक्षात येईल त्या त्यावेळी नाम घेत राहणं गरजेचं आहे. कारण नाम हे स्थल, काल व दोषविरहित असल्यामुळे त्याला कोणत्याही नियमांचं, कर्मकांडांचं व आसन अनुशासन याचंदेखील बंधन वा नियमन नाही. 

म्हणून मनसोक्त, अहर्निश, सतत, वेळ असेल नसेल आणि कुठल्याही ठिकाणी असाल तर जिभेला चाळा लावून घ्या नाम घेण्याचा. म्हणजे आपण कामात असताना वा निद्रेत असताना आपोआप आपलं सुप्तमन त्याचा विचार व उच्चार करत राहील. आधी जीभ, मग मस्तिष्क, मग मन आणि सरतेशेवटी हृदयात नाम झिरपत जाईल. असं हृदयात पोचलेलं नाम संपूर्ण देहाचा ताबा कधी घेईल ते कळणार पण नाही.

आपण नाम घेऊन आपलंच भलं करत आहोत हे मुख्य लक्षात आणलं की बाकी काही मनाला समजावून सांगायची गरज पडणार नाही. मुळात मन हे चंचल, चंचलतेमुळे शंकेखोर, त्यामुळे श्रद्धा कमकुवत होते आणि श्रद्धेशिवाय सर्वच व्यर्थ आहे. आपण जे कार्य करतो त्यात मनाला गुंतवणं हे काम सराव व प्रयास याने जमू शकतं. 

साहजिकच  एखाद्या गोष्टीत मन गुंतलं की माणूस आपोआप त्याच्या मागे लागतो.  प्रेमात पडलेल्यांना कसं जिथे तिथे आपलंच माणूस दिसतं, त्यांचं मन तिथे गुंततं आणि ते त्यात हरवून जातात, तशी अवस्था नाम घेताना झाली पाहिजे. 

 पुढील भागात बघूया. 

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!💐💐

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

  1. आपले " भोग आणि ईश्वर " ह्या लेखमालेतील 16 संक्षिप्त भाग वाचण्यात आले, खूप आवडले. अत्यंत सोप्या शब्दांत केलेलं आपलं लिखाण खूप काही सांगून जातं, मनाला विचार करायला भाग पाडत आणि त्या वर आणि आमच्या सारखं सामान्य माणूस कुठे कसं चुकतं ते पण समजतं, खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक नमस्कार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...