Skip to main content

भोग आणि ईश्वर ७

भोग आणि ईश्वर  ७

आता दुसरं उदाहरण घेऊन विषय पुढे नेऊया. अशी कल्पना करा की एखादा माणूस, ज्याचा काही कारणाने स्मृतिभ्रंश झाला आहे. म्हणजे आधीचं काहीच त्याला आठवत नाही. कदाचित एखादया अपघातामुळे असेल आणि त्याच कारणाने त्याचा स्थानबदल पण झाला आहे. म्हणजे तो एखादया ठिकाणी कामानिमित्त गेला आहे आणि तिथे अपघातात त्याची स्मृती गेली आहे. याकारणाने त्याच्या मूळ स्थानी तो परत येऊ शकत नाही.

म्हणून जिथे आहे तिथेच तो राहायला लागला. पण स्मृतिभ्रंश झाल्यामुळे मागचं काहीही आठवत नव्हतं. जीवन तर थांबत नाही, ते तर सुरू राहिलं. नवीन जीवन ,  नवीन कर्म नवीन काल्पनिक नावाने सुरू झालं. आता या ठिकाणी त्याला ओळखणारं कोणीही नव्हतं, परंतु गत काळातील कर्म असतात ती तर असतात. कल्पना करूया की हा माणूस स्मृती जाण्याआधी कर्जबाजारी, बाहेरख्याली, जुगारी मनुष्य होता. कर्मधर्मसंयोगाने त्याला आधी ओळखणारा एक मनुष्य 
त्या ठिकाणी आला. त्याच्याकडून याने काही उसने घेतले होते आणि अनेक प्रकारे व अनेक कारणाने त्रास दिला होता, छळ केला होता. 

या ठिकाणी तो मनुष्य भेटल्यावर त्या हातउसने पैसे दिलेल्या मनुष्याने याला धरला, या समजुतीत की, हा इथे पळून आला आहे. ज्याला स्मृतिभ्रंश झाला होता, त्याला वास्तवात काहीच स्मरत नसल्यामुळे तो गोंधळात पडला की, हा मला का धरतोय. मी तर याचं काहीच वाकडं केलं नाही. हा का मला त्रास देतो. बर या नवीन ठिकाणी तो मनुष्य उत्तम प्रकारे राहत असल्यामुळे तेथील लोकांनासुद्धा कळेना हा नवीन आलेला मनुष्य याला का त्रास देतोय, हा तर एक उत्तम माणूस आहे, भले मागचं काही त्याला स्मरत नसेल. पण आज तर उत्तम वागतो आहे. 

कारण स्मृतिभ्रंश झाल्यामुळे आपलं आधीचं सर्व विसरलेला तो मनुष्य, या ठिकाणी उत्तम माणूस म्हणून मान्यता पावलेला आहे. कोणालाच काही कळेना इतक्या सज्जन माणसाला हा कुठून आलेला कोण का त्रास देतोय, का गळा धरलाय याने.  सगळाच गोंधळ. 

आता विरुद्ध बाजूला जाऊया. स्मृतिभ्रंश झालेला तो माणूस ज्या घरातील होता, तिथे काही दिवस गोंधळ, दुःख रडारड झाली. काही दिवस लोकांची सहानुभूती मिळाली. पण काही दिवसात देणेकरी दारात यायला लागले. घरच्यांना काही कळेना की इतकं सर्व वाईट कर्म या माणसाने करून ठेवलं आहे. हे देवा आमच्याच नशिबात हे का लिहून ठेवलस. सर्व गोंधळाचा बाजार झाला.

आता मुद्द्यावर येऊया. तो स्मृतिभ्रंश म्हणजे एक जन्म संपून त्या जन्माची झालेली सुरवात. तो भेटलेला घेणेकरी म्हणजे पूर्वजन्मातील कर्माचं फलद्रूप, जे समोर येऊन अभं राहिलं आहे. या जन्मात केलेलं कर्म चांगलं असूनसुद्धा गत जन्मातील केलेल्या वाईट कर्माचं फलरूप उत्तर त्या घेणेकऱ्याच्या रुपात समोर आलं. जे अयोग्य वेळी समोर आलं, असा आपला समज होतो. कारण गत जन्मातील काहीही स्मरत नसल्यामुळे होणारा गैरसमज.  जरी स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाला काही स्मरत नसलं, तरी त्या घेणेकऱ्याला स्मरत असल्यामुळे तो त्याचं येणं वसूल करणारच. 

इथे उदाहरणात घेतलेला दुसरा मनुष्य स्मृती व्यवस्थित असल्यामुळे देणेकऱ्याला ओळखत होता, पण आपण जर नवीन जन्मात असलो तर आपल्याला त्रास, दुःख देणारा, इजा पोहोचवणारा मनुष्य सुद्धा सद्य जन्मात असतो. मग तो कसा काय ओळखतो आणि त्रास देतो. हा एक स्वाभाविक प्रश्न मनात येऊ शकतो. हे सर्व कर्माच्या बद्ध शृंखलेमुळे शक्य होतं. जी आत्म्याच्या प्रवासात आत्म्यासोबत नवीन जन्मात येते आणि गत जन्मातील देणी वा येणी वेगळ्या प्रकारे वसूल करून घेते. 

कर्म केलं की त्याचं बीज रुजलंच म्हणून समजा आणि बीज रुजलं की योग्य वेळी त्याचं रोप येणार आणि त्या रोपाला फळदेखील येणार. कदाचित अत्यंत सज्जन, निगर्वी, निष्पाप माणसांना आपण अनेकानेक वर्ष त्रास होताना बघतो, जीव तुटतो की इतक्या चांगल्या माणसांना हा त्रास कसा काय होतो. कदाचित हे स्मृतिभ्रंशाचं उदाहरण डोळ्यासमोर आणलं तर त्यांना होणाऱ्या त्रासाची थोडी बहुत कल्पना येऊ 
शकते. पण किती काळ हे त्या गत जन्मातील चांगल्या व वाईट कर्माच्या झाडावर अवलंबून आहे, जे आपणच रुजवलेलं आहे. 

माझ्या माहितीत अशी माणसं आहेत जी या जन्मी अत्यंत सज्जन, निरुपद्रवी व निष्पाप आहेत.  पण त्यांना अनेक वर्षे त्रास होतो आहे अज्ञाताचा. त्या अज्ञाताचं कारण कोणत्या गत जन्मातील कोणत्या कर्माचं आहे हे भगवंत जाणे. 

असो हा विषय उद्या पुढे नेऊया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...