Skip to main content

भोग आणि ईश्वर ५

भोग आणि ईश्वर  ५

खरतर इतका गहन विषय लिहायला घेतला आणि कालच्या भागात म्हटल्याप्रमाणे संचितातील साठलेली गाठोडी साफ करण्यासाठी किंवा ,गाळ साफ करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तरीही काही प्रश्न हे सदोदित अनुत्तरित राहतात. कदाचित त्या प्रश्नांचा विचार केला तरी उत्तरं मिळत नाहीत आणि आपण आपल्याच ध्येयापासून मागे खेचले जातो. असं वाटतं इतकं करूनसुद्धा हेच भोग असतील तर मग का करायचं. भोग आहेत भोगूनच नष्ट करू.

इथे एक सोप्प उदाहरण घेऊ. प्रश्नपत्रिका सोडवताना बरेच वेळा आपण इतर विद्यार्थ्यांना बघतो.  कोणी भरभर सोडवत असतं कोणी विचार करत असतात कोणी पुरवण्यावर पुरवण्या घेत असतं. कोणी कोणाला मदत सुद्धा करत असतं. प्रत्येक जण गर्क असतो. जे पूर्ण तयारीत असतात ते सर्व प्रश्न धडाधड सोडवत असतात. पूर्ण वर्षभर त्यांनी तयारी केलेली असते, अभ्यास उत्तम केलेला असतो, बुद्ध्यांकसुद्धा छान असतो. 

हे उच्च दर्जाची संचित घेऊन आलेले. कसे, तर त्यांची वर्षभराची हे त्यांच्या मागच्या कित्येक जन्मातील चांगल्या कर्माचं फलित असतं. त्यांचा वर्षभर अभ्यासाचा नेट आपण पाहिलेला नसतो. आपण फक्त त्याला पेपर सोडवताना पाहतो. वर्षभराची तयारी हे पूर्वकर्म. त्याने पेपर उत्तम सोडवला, मार्क उत्तम मिळाले. आता यात नशीब, पूर्वसुकृत किती कर्माचं स्थान किती हे तुम्हीच समजून घ्या. 

आपण त्याला फक्त पेपर सोडवताना बघतो परीक्षा केंद्रावर, तो आपला हा जन्म, आपण म्हणतो काय नशीबवान आहे. सर्व प्रश्न येत आहेत, किती भरभर  उत्तर लिहितोय. नाहीतर मी. माझं नशीबच खराब आहे. यात नशिबाचा भाग किती आणि कर्माचं महत्व किती विचार करा. त्याला आपण अभ्यास करताना पाहू न शकणं, हे निश्चितच आपल्या या जन्मातील मर्यादित देहाच्या मर्यादित ज्ञानासारखं आहे. त्रिमितीच्या मर्यादा आणि काळाचा पडदा यामुळे, तो आधीच्या जन्माचा भाग अर्थात वर्षभराचा अभ्यास, कधीच कळणार नाही. 

त्यामुळे आपल्या ज्ञानाला या मर्यादा  आयुष्यभर असणार. म्हणून देवाने मनुष्याला फक्त मनुष्याला तर्कांच वरदान, विचार आणि कल्पना यांचं प्रबळ पाठबळ बुद्धीची जोड आणि या सर्वांच्या साथीला वा सर्वांना गुंफायला मनाचा धागा दिला. या तर्क,बुद्धी, कल्पना आणि मन या वरदानरूप भांडवलावर विचारांच्या मार्गाने जाऊन काही निष्कर्ष काढायचं स्वातंत्र्य ईश्वराने प्रत्येकाला दिलं. त्याद्वारे ज्या गोष्टी समोर दिसतात, पण त्यामागची कारणमीमांसा समजत नाही वा लक्षात येत नाही, त्या गोष्टी या चार भांडवलाच्या माध्यमातून जाणून सत्याची कल्पना करू शकतो. 

आता वरील उदाहरणाकडे पुन्हा जाऊया. त्या विद्यार्थ्यांच्या हुशारीचं रहस्य त्याचा अभ्यास असू शकेल, किंवा त्याला पेपर आधी कळला असेल किंवा तो कॉपी करत असेल. यात अजून एक गोष्ट आपण गृहीत धरतो की आपल्याला कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसेल तेंव्हा आपण सोप्पा तर्क करतो. हा पूर्वग्रहदूषित विचार ही चुकीची पहिली पायरी असते. 

बघूया अजून काय काय चुका करतो आपण विचारांच्या. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...