Skip to main content

भोग आणि ईश्वर २७

भोग आणि ईश्वर  २७
   
 या चार पायऱ्या सतत करत राहिल्याने लगेचच मन आपल्या ताब्यात येऊन आपसूक सरळपणे वागायला लागेल असा काही भाग नाही. कारण तसं जर इतकं सहज असतं, तर समर्थांना मनाचे श्लोक लिहिण्याचे कष्ट घ्यावे लागले नसते. पण या ४  गोष्टींचा प्रयास सतत केला तर नक्कीच  आत्मविश्वास नक्की येईल. त्याच आत्मविश्वासाने इच्छाशक्तीचा जोर वाढेल. 

या सर्वांमागचा उद्देश ज्यावेळी भोग भोगत असतो किंवा दुष्टचक्रातून किंवा  नकारात्मक काळातून जात असतो, त्यावेळी मनाची स्थिरता टिकवण्यासाठी, या पूर्वतायरीचा उपयोग होऊन, मनःस्वास्थ्य टिकवून, आपण त्या नकारात्मकतेच्या फेऱ्यातून, विचाराने वाहावत जाणार नाही, त्याचप्रमाणे यावर आपण जो उपाय करू त्यावेळी ते करत असताना मन आपल्याला मागे खेचणार नाही.

मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मनःस्वास्थ्य टिकवणं गरजेचं आहेच, विशेषतः आपल्याला ज्यावेळी नकारात्मक अनुभव यायला सुरवात होते, त्यावेळी आपण सर्वात प्रथम देवाला,नन्तर दैवाला आणि प्रारब्धाला नाव ठेवायला सुरवात करतो. त्यावेळी हे विसरून जातो की हे आपल्या दृष्टीने चुकीच्या वेळी आलेले, पण काळाच्या दृष्टीने योग्य वेळी आलेलं, आपल्याच कर्माचे, फलस्वरूप असलेले, भोग आहेत. म्हणून त्यासाठी मानसिक तयारी म्हणून आधीच्या भागात दिलेल्या चार पायऱ्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. 

आतापर्यंतच्या सर्व भागात आपण भोग, त्यामागची तार्किक कारणमीमांसा, त्याचं फलस्वरूप येणं या सर्वाचा सखोल विचार केला. त्यासाठी लागणारी मानसिक तयारी बघितली, आता आपण या सर्व चक्रातून जाताना, अर्थातच हे भोग भोगत असतानाही, स्वतःचं मन त्यात वाहावत जाऊ न देता ते नियंत्रणात ठेवण्याची पार्श्वभूमी तयार केल्यानंतर, पुढच्या पायरी कडे वळूया.

आपण अनेक संत महंत, लोकोत्तर पुरुष यांचं उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल की, त्यांनी घडणाऱ्या गोष्टींना कधीही नावं न ठेवता, त्याचा विचारही न करता आपल्या जीवनाच्या ध्येयाचाच विचार केला. संतांनी फक्त नित्य आराधना, साधना यात कसलाही खंड पडू न देता, त्यात वाढ कशी होईल याचाच विचार. संतश्रेष्ठ तुकोबाराय तर देवाला सांगत की, कितीही संकटं येवोत तुझं नाम ओठातून कधीही पुसलं जाऊ नये. संत ज्ञानेश्वर ते आधुनिक काळातील संत हेच सांगत गेले की, नित्य नाम ओठी असावे, जीवनस्थिती काहीही असुदे.

यामागची महत्वाची पार्श्वभूमी लक्षात आली असेल तर कोणीही तुमचे भोग कमी होतील किंवा ते नष्ट होतील किंवा त्यात काही चमत्कार होईल असा बोध दिला नाही. परंतु त्याकाळातही, कोणत्याही प्रकारची चिंता न करता, नित्य नाम ओठी व हृदयी असावे, इतकीच शिकवण दिली. म्हणजे पुढचा सर्व योगक्षेम त्या नामाचा अधिकारी पाहून घेईल. याचं तात्विक विवेचन इतकंच की, जे भोग आलेत ते भोगूनच संपावे ही मानसिक तयारी मनुष्याने करावी, इच्छाशक्ती दृढ करावी, परम ईश्वराची उपासना सुरूच ठेवावी म्हणजे जे चुकीचं कर्म झालं असेल त्याचा ताप जळून जाईल आणि पुढील फल या नामाच्या उपासनेच्या जोरावर सुलभ होईल.


म्हणून मन शांत ठेवून, नकारात्मक काळात कोणताही गैर विचार न करता उपासनेचा जोर वाढवावा. कारण घडलेलं वाईट वा चुकीचं कर्म जाळण्याची ताकद आपल्याच पुण्यकर्माच्या जोरावर आपणच करून, आपणच आपले पुढील कर्मफल सुधारू शकतो. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे, आपल्या संकल्पातील इच्छेच्या शक्तीचा परिणाम  विलक्षण असतो. अश्या शुद्ध इच्छाशक्तीचे तरंग व त्यांच्या लहरी मागील कर्मफलाचा दोष कमी वा दूर करू शकतात असा अनुभव येतो वा येऊ शकतो. 

परंतु हे सर्व आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने द्विगुणित करू शकतो. असं माध्यम कोणतं आहे की जे आपली एकलहरी उपासनेला अनेकलहरी उपासनेत परिवर्तित करून त्यात स्वतःची शक्ती मिसळून साधकाला इच्छित लाभाप्रत नेऊन ठेवू शकतं, तर ते आहे गुरुतत्व. कलियुगाची तारकशक्ती, प्रेरणाशक्ती आणि विधात्याचे गुह्य हे गुरुशक्ती मर्म आहे. कलियुगाच्या फेऱ्यातून पार पडण्यासाठी आणि त्याच्या तापापासून वाचण्यासाठी गुरुआश्रय साधकाला अत्यंत जरूरीचा आहे. किंबहुना गुरुशक्तीचं अस्तित्वच मुळात या युगासाठी आहे.

बघूया गुरूशक्तीची महती पुढील भागात.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...