Skip to main content

भोग आणि ईश्वर १९

भोग आणि ईश्वर  १९
  
मुळात हे ब्रह्मांड का आहे, आपण का आहोत चराचर का आहे हे जाणलं की यात मी कोण आणि माझं अस्तित्व काय व का हे आपोआप लक्षात येईल. 

असं समजून घ्या की परमेश्वर एक खूप मोठा आचारी आहे आणि उत्तम पदार्थ बनवण्याची इच्छा त्याला जागृत झाली. त्यासाठी स्वप्रेरणेने व स्वसंकल्पाने ब्रह्मांडरूप पदार्थ जमा केले त्यात जगतरुपी कढईत स्थिर व चल जीवसृष्टीचा उत्तम स्वयंपाक तयार करण्याची योजना आखली आणि कार्यान्वित केली. 

उत्तमोत्तम जीव जन्माला आले,जग फुलू लागलं. पण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुणधर्म असतो आणि असे असंख्य पदार्थ एकत्र आल्यानंतर त्या एकत्रित पदार्थात, जो घटक जास्त तो वास, ती चव त्या पदार्थाला येणार. जगाचंही तसंच झालं. 

त्यात भरीसभर म्हणून मायारुप मसाला या पदार्थात मिसळून त्याला जरा चवदार करू अश्या विचाराने माया मिसळली, ज्या जीवांना त्या मसाल्याचं आकर्षण वाटलं ते त्या मायेच्या मसाल्यात लुप्त होऊन आपलं अस्तित्व हरवून बसले. ज्यांना त्या मायेच्या मोहाची गोडी लागली नाही, ते आपलं स्वत्व टिकवून वेगळे उरले. त्या मायेत गुरफटून अस्तित्वहीन झालेले जीव, या वेगळ्या उरलेल्या पदार्थांचं कौतुक करू लागले. काही काळाने परमेश्वर येऊन बघून त्या पदार्थांची चव चाखून म्हणाले हा रसहिन आहे. थोडा मसाला अर्थात माया थोडी जास्त मिसळू म्हणजे या पदार्थाला चव येईल. 

त्याचप्रमाणे जे पदार्थ आपलं अस्तित्व टिकवून स्थिर होते त्यांना वेगळं बाहेर काढून त्यांचा वेगळा जिन्नस बनवू असा विचार करून म्हणाले, तरीही या पदार्थांची चव अजून रसदार व्हावी यासाठी प्रभूंनी आपलं मन त्यात समाविष्ट केलं. आता मायेच्या मसाल्यात तयार झालेला हा ब्रह्मांडरूप पदार्थ प्रभूंच्या मनरुप लीलेत सजला आणि अलौकिक चवीने खुलून आला. 

आता या पदार्थाचा शोध घेऊया. देहरुप कढईत पंचमहाभूत रुप पदार्थ मिसळून जगतात सोडून दिलेले आपण. जगतव्यापार हा त्या कढईखालची शेगडी, षड्रिपुरूप फोडणीत सजलेला हा जीव संसाराच्या, कर्माच्या अंगारात होरपळून निघालाय, जसा संसार नेईल तसं आणि त्या दिशेने बेहिशोबी जाणारे आपण, आपलं अस्तित्व गमावलेले, जे आपलं अस्तित्व टिकवून या जगतरुप कढईत कच्चे राहिले ते पुण्यात्मे. त्यांना लवकर बाहेर काढून जगताच्या तापातून व मायेच्या मोहातून बाहेर काढलं, ईश्वराने. 

आता या सर्वात मन हा परमईश्वराचा आपल्याला मिळालेला दिव्य आधार आपलं अस्तित्व या जगतरुपी कढईत अर्थात देहात टिकवून ठेवण्यासाठी आणि या सर्वात आत्मा कुठे आहे असा प्रश्न पडला असेल, तर आत्मा म्हणजे परमेश्वराचं प्रत्यक्ष अस्तित्व. जे खरतर प्रत्येकाला आपल्या आत आणि जगतात व जगताबाहेर दिसलं पाहिजे. परंतु मायारुप छायेने ते व्यापून टाकलेलं असल्याकारणाने आपण त्या मायेच्या मसाल्यात आपलंच अस्तित्व जिथे  हरवून जातो, तिथे ईश्वराचं अस्तित्व कुठून जाणवणार. . 

आता या सर्वात आपण कोण तर कालच्या उदाहरणातील तो दिव्य शास्त्रज्ञ ज्याने मानवरूपी यंत्र तयार करून त्याहून वेगळा उरला तरीही जो आपल्या या निर्मितीचा प्राण आणि आजच्या उदाहरणातील पदार्थाचा कर्ता म्हणजेच समस्त जिवातील परम तत्व अर्थात आत्मा म्हणजेच आपण, अर्थात ईश्वराचा अंश. जो आत बाहेर सर्वत्र पुरून उरला आहे. ज्याला हे अस्तित्व जाणवेल तो कोणत्याही मायेच्या सापळ्यात न अडकता सुखरूप कढईबाहेर येईल. बाकीचे कढईत राहून त्याच चक्रात फिरत राहतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...