Skip to main content

श्रीकृष्ण नीति ३

श्रीकृष्ण नीति ३
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

कृष्ण जन्माच्या आधी सुरु झालेली हि अद्भुतता आणि कृष्ण लीला एक विलक्षण अनुभूती आहे. ती कितीही वेळा वाचली तरी त्याची गोडी कमी होत नाही.एक कल्पना म्हणून असं समजूया कि कृष्ण कथा किंवा संपूर्ण महाभारत हि एक काल्पनिक कथा आहे. म्हणजेच व्यास विरचित नयनरम्य चित्रकथा आहे आणि आताच्या जमान्यातील प्रसार माध्यमांचे निकष त्याला लावले तर एक सुंदर कहाणी आहे, कृष्ण नावाच्या कोण्या राजाचे महत्व वृद्धिंगत होण्यासाठी.

तरी त्यातून काही गोष्टी अचंबित करतात त्या येणेप्रमाणे :

१. इतक्या पुराण काळात जिथे कोणतंही प्रसार माध्यम 
     वा संपर्कांचे साधन नसताना, उत्तरेतील एका
    राज्याच्या कपोलकल्पित कथा, संपूर्ण भारतभर 
    प्रसारित होतात, त्याची देवळे बांधली जातात,  
    युगानुयुगे त्याचे पुजन केले जाते ,

२. कथांचा संदर्भ बऱ्याच अंशी तोच किंबहुना त्याच कथा 
    वेगवेळ्या भाषेत लिहिल्या गेल्यात. आज देखील
    कोणत्याही भाषेतल्या कथांचं,भाषान्तर, टीका   
    टिप्पणी, विश्लेषण करणं, हे तितकंच जिकिरीचं किंवा
    त्रासदायक काम आहे आणि इतक्या मोठ्या काव्यचं 
    भाषान्तरण करणं किंवा त्या कथा अनेक भारतीय   
     भाषांत मांडणं हा खेळ वा कल्पना विलास निश्चितच 
     नव्हतं आणि हेच खुप अद्भुत आहे

 ३. कोणतेही संदर्भ अथवा विश्लेषण जे एकमेकांविरुद्ध 
     आहे, असे श्रीकृष्णाबाबत आढळत नाही. किंबहुना
     श्रीरामासह, कोणत्याही पौराणिक कथांबद्दल 
      आढळत नाही . 

४. आणि त्या कपोलपल्पित कथा आहेत असं गृहीत   
    धरलं काही काळ, तरी त्यातील काही गोष्टींचे,    
    आजसुद्धा आढळणारे संदर्भ हे अचंबित करणारे 
    आहेत. जस :

     - कंसाचे कारागृह जे अजूनही शाबूत आहे.

     - गुजरात मधील महासागरात कित्येक हजार मीटर 
       खाली (जिथे आताची द्वारका आहे,त्या खाली खोल
      समुद्रात ) जुन्या द्वारकेचे अवशेष, सिद्ध करतात कि 
       द्वारकाच नव्हे तर संपूर्ण श्रीकृष्ण कथा घडली होती

     - हजारो वर्षांपासून चालू असलेले कृष्ण जन्माचे 
       उत्सव, ज्याचं पारंपारिक स्वरूप आसेतु हिमाचल 
       बऱ्याच अंशी सारखंच आहे.

हे सर्व सांगण्याचं मुख्य कारण कि, कपोलकल्पित कथा मानली तर, इतक्या गोष्टी आजही अस्तित्वात असणं, हेच सिद्ध करतं कि, काही हजार वर्षांपूर्वी, या भूमीत नक्कीच वास्तविक स्वरूपात, श्रीकृष्ण या रूपात, एक दैवी अंश, महामानवीय रूपात, अस्तित्वात होता.

जन्मतः कारागृहातून सुटताना घडलेले चमत्कार हे थोडे नजरेआड केले, तर तो व्यापक राजकीय कटाचा भाग असू शकतो, असं गृहीत धरूया. जेणेकरून सहभागी व्यक्ती या गुप्त स्वरूपात वासुदेव आणि देवकी यांना, कंसाविरुद्ध मदत करत होत्या. ज्यांनी पद्धतशीर पणे श्रीकृष्ण या बालकाला कंसाच्या कारागृहातून सुखरूप मथुरे बाहेर पडण्यासाठी मदत केली असावी. एका व्यापक कटाचा भाग म्हणून याकडे बघितल्यास एक वेगळी कथा यातून दृष्टीस पडते. प्रश्न उरतो कि यासाठी वासुदेव आणि देवकीचीच निवड का करण्यात आली असावी.

बघुया उद्याच्या भागात. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०५/०५/२०२०
भाग तृतीय समाप्त 

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ 
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...