Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग १९

श्रीकृष्णनीती भाग १९
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

महाभारताचं पूर्ण युद्ध ज्या व्यक्तित्वामुळे घडलं. इतके रथी, महारथी, अतिरथी, दोन्हीकडचं मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य ज्याच्यामुळे लढलं, ज्याच्यासाठी द्वारकेचा राणा, स्वयं नारायण रणांगणात सारथी झाला, ते व्यक्तित्व नक्कीच विलक्षण , तितकंच ताकदीचं, तितकंच कठोर आणि जबरदस्त असलंच पाहिजे. अन्यथा इतकं सर्व महाभारत घडलंच नसतं. अर्थातच त्या व्यक्तिविशेषांचं नाव , जे आपण सर्वांनी जाणलं ते  म्हणजे, दुर्योधन. 

महाभारत युद्धाचा कर्ता करविता. मुळात याचा जन्मच एका विचित्र परिस्थितीत झाला. गांधारीला दिवस जाऊन नैसर्गिक कालावधीपेक्षा जास्त काळ गेला. त्यातच तिला भविष्यवाणी समजली होती की,तिच्या पोटी कुल विनाशक संतती जन्माला येणार आहे. या सर्वाने वैतागून तिने आपला गर्भ काढून जमिनीवर पाडला आणि उद्वेगाने व्यास महर्षींचं स्मरण केलं. साक्षात महर्षी समोर उपस्थित झाले. गांधारीने त्यांना नमस्कार करून विचारलं की, आपण तर मला शतपुत्रांचा आशीर्वाद दिला होता. व्यासऋषी म्हणाले अर्थातच. 

त्यांनी तो जमिनीवरील गर्भाचा अंश गोळा करून त्याचे एकशे एक भाग केले. ते , दूध ठेवायच्या एकशे एक मडक्यात ते ठेवून, ती मडकी जमिनीत दोन वर्षे पुरून ठेवली. दोन वर्षांनी पहिलंच मडकं जे उघडलं त्यातून बाहेर आलेलं बालक म्हणजे दुर्योधन. तद्नंतर सर्व बाकीच्या  नव्याण्णव  मंडक्यातून प्रत्येक पुत्राला बाहेर काढून शेवटच्या मंडक्यातून कन्या अर्थात दुश्शला हिला बाहेर काढलं.  माझं व्यक्तिगत मत असं आहे की गर्भा बाहेर वाढवलेले हे जीव हा कदाचित पहिला शास्त्रीय प्रयोग असावा. माझ्यामते मुळात महर्षी व्यास हे शास्त्रज्ञ असावेत. ज्यांनी महाभारतात अनेक प्रयोग केलेत, जे काळाचा विचार करता अद्भुत आहेत. ( त्यावर नन्तर एक स्वतंत्र लेख लिहिनच). 

या अश्या प्रकारे गर्भाबाहेर जन्माला आलेल्या मुलांना गर्भातले संस्कार आणि माता पित्यांच्या प्रेमाचा कोणताही अंश गर्भकाळात न मिळाल्याकारणाने ते अतार्किक व अतिरेकी दुराग्रही झाले असावेत. विशेष करून दुर्योधन. आपल्या सर्व बंधूंवर त्याची पूर्ण हुकूमत होती. एकही बंधू त्याच्या आज्ञेबाहेर नव्हता. सर्वकाळ सर्ववेळ त्याने आपल्या बंधूंना आपल्याच हुकूमात ठेवलं, किंबहुना त्यांनी देखील आपला बंधुधर्म यथास्थित पाळला, मृत्यूच्या दारापर्यंत. 

दुर्योधन एक अलौकिक आणि अचाट सामर्थ्य असलेली व्यक्ती होता. खरतर त्याच्यातील मूळ शक्तीपेक्षा त्याने प्रचंड सरावाने, अभ्यासाने, अंगमेहनतीने सर्व काही कमावलं होतं. दुर्योधन म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीचं स्रोत होता. अंगी असलेल्या ऊर्जेचा योग्य मेहनतीने वापर करून, युद्धातील कौशल्य व अस्त्रविद्या त्याने कमावली होती. गदायुद्धातील त्याचं प्राविण्य वादातीत आणि अवर्णनीय होतं. 

गदायुद्धातील जगतश्रेष्ठ व दुर्योधन आणि भीम यांचे गुरू श्रीबलराम यांचा सर्वात लाडका शिष्य दुर्योधन होता. त्याच्या युद्धातील निपुणतेवर आणि विशेषतः जिज्ञासेवर, त्यांचं प्रेम होतं. त्यांच्या मते गदायुद्धात जगात सर्वश्रेष्ठ दुर्योधन होता.मेहनत आणि प्राविण्य याबाबत तो नक्कीच भीमापेक्षा श्रेष्ठ होता. भीमाला आपल्या दैवी शक्तीची माहिती असल्याकारणाने तो बराचसा गाफील असायचा. खरतर एक व्यक्ति म्हणून आणि एक राजा म्हणूनही दुर्योधन हा योग्य होता. कार्यकुशल होता, मेहनती होता. त्याला युवराज असल्या कारणाने राजकीय, प्रशासकीय व संरक्षण विषयक कार्याचा खूप अनुभव कमी वयात मिळाला. 

उत्तराखंडात विशेषतः डेहराडून मसुरी येथील आदिवासी भागात आणि कुमाऊं आदिवासींसह काही आदिवासी जमातींमध्ये दुर्योधन हा एक देव म्हणून पुजला जातो. तिथे त्याची मंदिरं आहेत. तिथल्या काही भागात आषाढ ते श्रावण उत्सव साजरा केला जातो ज्यात दुर्योधनाच्या मूर्तीची पालखी निघते आणि ती मूर्ती पुढील वर्षासाठी, दुसऱ्या गावाकडे सुपूर्द केली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे दुर्योधनाने राज्यकारभार करताना या भागातील लोकांना खूप सुखसुविधा, समृद्धी आणि विशेषतः त्यांना आदिवासी असूनही मानसन्मान दिला होता. दुर्योधनासह महायुद्धात या भागातील लोकं त्याच्या सैन्यात मानाच्या स्थानावर होती. कारण दुर्योधन त्या काळात कुशलता प्राविण्य आणि क्षमता याला,जातीपेक्षा जास्त महत्व द्यायचा.  त्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात आजही दुर्योधनाचं विशेष महत्व आहे. 

दुर्योधनाबद्दल अजून उद्याच्या भागात !! 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
२२/०५/२०२०
भाग नवमदश समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...