Skip to main content

अध्यात्म विराम ११६

अध्यात्म विराम ११६

जाणिवांच्या जगतात, अर्थातच आपल्या मनात किती गोष्टी एकाच वेळी, एकाच मुद्द्याबद्दल घडतं असतील आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून आपली मानसिक स्थिती तयार होते, घडते, बिघडते, पुन्हा सावरते. या सर्व घडामोडीत आपलं आयुष्य अर्थातच क्रिया आणि प्रति क्रिया यांचा खेळ असतो किंवा बनतो. अर्थात पुन्हा ते सर्व कर्माशी निगडित आहे, हे गृहितक ध्यानात ठेवूनच आपण जाणिवांचा विचार करूया. आपल्या मनात येणारे वेगवेगळे विचार,अनेक मार्गांनी,प्रसंगांनी, कारणांनी कधी विनाकारण आपण आपली मनोभूमिका तयार करतो. त्यानुसार स्वभाव तयार होतो 

त्यामागे अनेक गोष्टी असतात. पण त्या सर्वांच्या मुळाशी आपल्या जाणिवांची जागृती व विकास हे नक्कीच अवलंबून असतात. म्हणजे अर्धजागृत किंवा सुप्त जाणीवा या जागृत होण्याची प्रक्रिया घडून येणं, हे देखील प्रारब्ध, संचित आणि सद्यकर्म यांच्या संयोगाने घडून येतं. ते घडण्यासाठी कर्मांची तशी जमापुंजी असणं आवश्यक आहे. कारण आता भोगावे लागणारे किंवा आपण भोगत असलेले भोग किंवा उपभोग हे मागील कर्मांचा परिणाम आहे किंवा असतो, हे नक्की. म्हणजे जाणिवांच्या सुप्त ते जागृत, या परिवर्तनासाठी आपल्या कर्मात सुधारणा होणं हे आवश्यक आहे. 

पण आज ज्या जाणीवा जागृत अवस्थेत आहेत, त्या कश्या आहेत, याचा आपण जरा विचार करूया. जाणीवा म्हणजे मनातील भावकेंद्रे असतात,ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान होतं आणि त्यांच्या क्रिया किंवा प्रतिक्रिया मनात उमटतात. त्या व्यक्त करून किंवा अव्यक्त ठेवून आपण काही कर्म घडवतो. म्हणून या जाणिवांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. प्रापंचिक जीवनात,जगताना,अध्यात्मिक मार्गात वाटचाल करताना आणि एकूणच पदोपदी व क्षणोक्षणी आपण क्रिया आणि प्रतिक्रिया यांचाच खेळ खेळत असतो. त्यातूनच कर्म घडत असतात. 

आपण मुख्यतः अध्यात्मिक मार्गाबद्दल या लेखमालेत दीर्घ चिंतन करत आहोत, म्हणून आपण त्या कार्यात उपयोगी येणाऱ्या, निरुपयोगी आणि अनावश्यक किंवा त्याज्य जाणीवा यांचा विचार करणार आहोत. कारण प्रापंचिक कार्यात उपयोगी अथवा त्याज्य जाणिवांचा विचार आपण भोग आणि ईश्वर या लेखमालेत केलेला आहे. अध्यात्मिक वाटचालीत, श्रवणभक्ती ते दास्यभक्ती हे मार्ग या आधी बघितले आहेत आणि सख्य भक्तीच्या मार्गच दीर्घ चिंतन करत आहोत. मुळात भक्तिमार्ग स्वीकारणं किंवा अध्यात्मिक चिंतन करणं हे मुद्दामहून केल्या शिवाय घडत नाही. 

आपल्यात आणि अध्यात्मिक मार्गी साधू, संत सज्जन यांच्यामधे हाच मूलभूत भेद आहे की, त्यांचं जीवन, चिंतन, कर्म हे सर्व मात्र एकाच गोष्टीचा, उद्देशांचा विचार, चिंतन आणि कर्म करण्यासाठी असतं. यासाठी त्यांच्या जाणिवांची जागृती आणि स्थिती ही अत्युच्च दर्जाची असते. मुळात जाणिवांच्या जगतात, कोणत्या सुप्त असाव्यात, कोणत्या जागृत असाव्यात आणि कोणत्या कार्यरत नसल्या पाहिजेत, याचं परमोच्च कोटीचं ज्ञान, आत्मचिंतन आणि त्यावर आधारित मार्गक्रमण हा त्यांच्या श्वासाचा भाग असतो. 

जीवनात येण्यासाठी आणि आल्यानंतर काय करायचं, काय करू नये, हे अभ्यासाने अनेकांना शक्य होत किंवा आत्मसात करता येतं.पण या उच्च कोटीच्या साधकांना ते, त्यांच्या संचीतातून प्राप्त झालेलं असतं.म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण पुढील भागात, जाणिवांचा अभ्यास करून, त्यायोगे भक्ती मार्गात पुढे जाण्यासाठी आवश्यक गोष्टींचं चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...