Skip to main content

अध्यात्म विराम ९८

अध्यात्म विराम ९८
 
हित या शब्दाबद्दल पुरेसं चिंतन झालं आहे. त्यामुळे खरा हितदर्शी ईश्वर का आहे आणि तो कधी सहाय्य करण्यास धावून येईल आणि न आल्यास, त्यातही आपलं हितच आहे,हे जाणण्याची जाणीव आपल्यामध्ये जागृत झाली असेल, असं गृहीत धरून, आपण आता हा विषय पुढे नेऊयां. आता जो खरं हित जाणतो आणि ते जपून आपल्या हिताचं रक्षण करतो, तो खरा आपला सखा. वास्तविक पणे सखा या शब्दाची अनेकांनी अनेक प्रकारे व्याख्या केली आहे, तरीही आपण पुन्हा एकदा त्या शब्दाच्या संज्ञेत जाण्याचा प्रयत्न करूया.

सखा हा शब्द उलट लिहिला की, त्याचा एक अर्थ त्वरित ध्वनित होईल. खास. म्हणजे जो आपल्यासाठी खास आहे तो सखा. पण हे खास असणं, म्हणजे काय तेही समजून घेऊया.खास म्हणजे, ज्याची जागा खास कुठेतरी असते, तो सखा. पण असे अनेक स्नेही असतात जे सुख आणि दुःख किंवा फक्त सुख व फक्त दुःख यामधे खास असतात. पण ते सखा या व्याख्येत बसतात का याचा सुद्धा विचार करूया. 

काहीजण, इमानाने आयुष्यभर आपल्याला सुख आणि दुःख यामधे साथ देतात. ते नक्कीच मनाच्या व हृदयाच्या खास जवळचे असतात. पण त्यांना सखा म्हणायचं का. कदाचित त्यातील काही, आपल्याला योग्य वेळी आर्थिक मदत नक्कीच करतात किंवा करू शकतात. पण सखा या खास शब्दात कोण येतं किंवा येऊ शकतं, याचा मागील काही भागातून मिळालेल्या ज्ञानातून निष्कर्ष काढला तर लक्षात येतं की, सखा दोन प्रकारचे असतात.

एक जे या ऐहिक व आधीभौतिक जगतात, जीवन सुसह्य व्हावं आणि दुःखातून, भोगातून मार्ग मिळावा म्हणून हे आपल्याला अनेक प्रकारांनी, सहाय्यभूत होतात, ते या जगतातील आणि पहिल्या प्रकारातील सखा. त्यांचे आणि आपले कर्मधिष्ठीत संबंध असतात. ते कर्म बंधना तून निर्माण झालेले आणि ऋणातून घडलेले सखे. त्यांचं महत्व कोणत्याही प्रकारे कमी होत नाही. किंबहुना आयुष्यात भोगातुन पुढे जाताना आणि सुखाच्या वाटेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गातील महत्वाचे पथदर्शी असे हे सखे असतात. 

दुसऱ्या प्रकारातील सखे हे आपलं आधी आत्मिक सखे व या जगतापार जाणाऱ्या मार्गावर आपले पथदर्शी, दिशादर्शक, मार्गदर्शक असतात, होतात आणि त्या मार्गात कायम आपलं फक्त आणि फक्त अध्यात्मिक हित जपतात व त्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे तिथे पूर्ण सहाय्यभूत होतात. हे सखे कोण यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...