Skip to main content

अध्यात्म विराम १००

अध्यात्म विराम १००

ईश्वराने आपल्यासाठी पाहिलेले आणि आपल्या हिता साठी केलेले सर्वकाही एक पिता म्हणून, एक आई म्हणून केलेलं निजकर्तव्य आहे किंवा असते. यामधे सखा म्हणून तत्वतः काही असेल असं मला वाटतं नाही. त्यासाठी ईश्र्वराशी वेगळ्या नात्याची आवश्यकता आहे. वेगळ्या याचं महत्वाचं कारण म्हणजे, प्रत्येक जीवाला आपण जीवनात आल्यानंतर,स्वतःच्या पद्धतीने जीवन जगण्याचा मोठा अधिकार, विधात्याने दिला आहे. याचा उपयोग, सदुपयोग आणि दुरुपयोग करायचं स्वातंत्र्य सुद्धा त्याचं ईश्वराने दिलेलं आहे. 

त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून माणसाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत, कित्येक गोष्टीत आपल्या मर्यादा उल्लंघन करून, आपल्या जीवनाला घोर अंधारात नेलेलं आहे. काहींनी व्यक्तिगत स्वतःच्या आयुष्यात अनेक दुष्कर्म किंवा अज्ञानाने चुकीची कर्मे करून, आपल्या साठीचा मार्ग बिकट करून घेतला आहे किंवा घेतात. आत्म्याचा प्रवास हा अनंता पासून अनंता पर्यंत आहे.  

त्यामुळे, गत कोणत्याही एखाद्या जन्मात देहाने, बुद्धीने, वाचेने व मनाने केलेल्या चुका,अपराध पुढील हे कोणत्याही जन्मात, वेगळ्याच देहाला भोगावे लागतात. यात आपण गफलत ही करतो की, आपल्याला फक्त सद्य जन्म ज्ञात असल्यामुळे, आपण अजूनच गोंधळात पडतो की, हे काय माझ्या भोगत आलेलं आहे. हे का मला सहन करावं लागत आहे. 

एका संकुचित अर्थाने ते म्हणणं योग्य आहे. कारण जीवन म्हणजे हा जन्म आणि हाच देह, हेच खरं, असं संकुचित दृष्टीने पाहण्याचं अज्ञान ज्यावेळी असतं, त्यावेळी आपण फक्त आणि फक्त मार्ग भ्रष्ट होण्या शिवाय काहीही करत नाही. बरं हे अज्ञान बरेचदा संधी पाहून प्रकट होतं. म्हणजे जिथे आपण उपभोगाच्या वा सुखाच्या काळात असतो तेंव्हा, हेच अज्ञान आपल्याला हे पटवून देतं की, हे सर्व प्राप्त होण्यात आपली कर्मे कारणीभूत आहेत. 

इतक्या संकुचित विचाराने आपण त्या सर्व सुख व उपभोग प्राप्तीचं श्रेय स्वतःकडे घेतो. पण ज्यावेळी जीवन दुःखं, भोग या काळात प्रवेश करतं, त्यावेळी मात्र, हेच अज्ञान उलटं होऊन प्रकट होतं. म्हणजे त्यावेळी आपल्याला हे जाणिवेत येतं की, अरे या जन्मात मी कोणाचंही वाईट, गैर केलेलं नाही, तरीही माझ्या वाट्याला हे भोग का यावेत.

म्हणजेच हे अज्ञान हा आपल्या अपसमजाचं कारण आहे. अपसमज हा, गैरसमज किंवा अज्ञान व समज म्हणजे पूर्ण ज्ञान यांच्या मधे असते. आपण हे जाणतोच की पूर्ण अज्ञान किंवा पूर्ण ज्ञान हे केंव्हाही उत्तम कारण अर्धवट ज्ञान हे बरेचवेळा, आपल्या विनाशाला किंवा अधोगतीला कारणीभूत असतं. याच अज्ञान व ज्ञान अर्थात समजाच्या या खेळात आपण कसे भ्रमिष्ट होतो, यावर उद्याच्या भागात विचार करूया.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...