Skip to main content

अध्यात्म विराम ११७

अध्यात्म विराम ११७

उच्च कोटींचे साधक जाणीवेच्या जगतात अत्यंत प्रगत असतात. त्यामुळे त्यांना मोजक्याच प्रतिक्रिया देण्याची सवय असते. कारण त्यांना जाणीवेच्या जगतात अत्यंत नाजूक भाव सुद्धा जाणवतात, स्पर्शतात, त्यांच्या मनात सूक्ष्मातील सूक्ष्म स्पंदनं पोचून, त्यांचं आकलन त्यांना होतं. ज्याद्वारे त्यांना अनेकांच्या मनातील भाव कळतात. ही प्रक्रिया शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि यात कोणताही चमत्कार असा असतं नाही.मनातील जाणिवांची केंद्रे अभ्यासाने तीक्ष्ण किंवा अतिसंवेदनशील करता किंवा घडवता येतात . ज्याद्वारे अती सूक्ष्म संदेश लहरी प्राप्त होतात आणि त्या संदेशांचं पृथक्करण करता येतं. 

ज्यामुळे या भूतलावर किंवा अंतराळात कुठेही निर्माण झालेल्या लहरींची स्पंदनं त्यांच्या जाणिवांच्या अती संवेदनशील केंद्रांना स्पर्श करून, त्यांना ते संदेशरुपात प्राप्त होतं. त्यानंतर, त्यातील कोणत्या लहरींना प्रतिसाद द्यायचा आणि कोणत्या लहरींना प्रतिसाद द्यायचा नाही, हे त्यांना ठरवता येतं. त्यानुसार ते क्रिया अथवा प्रतिक्रिया देतात किंवा शांत राहून पुढील क्रियेचा अंदाज घेतात. त्यांना प्राप्त सिद्धिमुळे, त्यांना जाणवतं, समजतं आणि उमजतं की, कोणत्या लहरी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या लहरी फार महत्वाच्या नाहीत. 

या सिद्धी सुद्धा मानवीय देह,बुद्धीरूप यंत्राची व मनरुप इंद्रियांची अतिप्रगत अवस्था आहे. कारण सर्व विद्या, ज्ञान, इत्यादी प्राप्त करून, त्यानुसार साधना करत करत, आत्मोन्नत्ती साधत पुढे जाताना, या देहातील अनेक सुप्त शक्ती, ऊर्जा,प्रेरणा जागृत होतात आणि त्या या देहरुप यंत्राला अद्ययावत यंत्रामध्ये परिवर्तित करतात. म्हणून अंतराळात विहरणाऱ्या अनेक सूक्ष्मातील सूक्ष्म लहरी, या संदेश रुपात, अश्या उच्च कोटीच्या साधकांना समजतात आणि त्यांच्या मनामधे त्यानुसार त्या संदेशांचं पृथक्करण अर्थात processing करण्याची क्षमता जागृत होऊन, कार्यान्वित झालेली असते. 

आपल्याला या थोड्या माहितीची आवश्यकता याचसाठी आहे की, आपल्याला जाणिवांच्या जागृती बद्दल आणि त्यांच्या अंतिम उपयोगाबद्दल थोडी माहिती असावी. जेणेकरून, आपल्या जाणिवांना कोणत्या स्थिती पर्यंत जायचं आहे,हे आपण समजून घेऊ शकतो.मुळात ज्याला telepathy किंवा मनातील अप्रकट विचार जाणणं व intuition अर्थात अंतर्ज्ञान, या दोन्ही विद्या म्हणतो, त्या, जाणिवांच्या प्रगत अवस्थेत, आत्म्याला प्राप्त झालेल्या विद्या किंवा शक्ती आहेत.

मुळात या सर्व गोष्टी शास्त्रीय आधारावर रचलेल्या, देहाच्या, बुद्धीच्या व मनाच्या प्रगत अवस्थांची अनुभूती व प्रचिती आहे. देहाला त्यासाठी सशक्त व सक्षम करूनच ईश्वराने, या जगतात मानवाला पाठवलं आहे. ते प्राप्त करण्यासाठीची तयारी, या जाणीवेच्या जागृती, प्रगती यामधून साधता येते. म्हणून जाणीवा जितक्या संवेदन शील होत जातील, तितकीच सूक्ष्म लहरी प्राप्त करण्याची मनाची, आत्म्याची शक्ती जागृत होत जाऊन, वाढत जाते. 

म्हणून आपण जाणिवांचा अभ्यास, उद्याच्या भागापासून सुरू करूया. कारण आपण सर्व, त्याबाबतीत, अप्रगत जीव आहोत. म्हणून हा अभ्यास आणि प्रगती साधण्या साठी आपल्याला, यातील तज्ञ अर्थात आपले सद्गुरू यांच्यासारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आपल्याला मुळातच जाणीवा कोणत्या, त्यातील आवश्यक, अती आवश्यक, त्याज्य, क्षीण, दुर्बल, बलवान, या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. उद्याच्या भागात, याबाबत पुढे जाऊ. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...