Skip to main content

अध्यात्म विराम १२०

अध्यात्म विराम १२०

आपण अनेकदा बोलताना म्हणतो की, एखादा माणूस सेन्सलेस आहे किंवा एखादा व्यक्ती खूप सेंसिबल आहे. हा सेन्स म्हणजे जाणीव. याचा एक अर्थ हा नक्की की, ज्याच्या जाणीवा प्रगल्भ आहेत आणि मनाने निर्णय घेताना, जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांना आपल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करावा लागत नाही. आता याचा अर्थ असा होतो की, त्यांना, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची योग्यता माहीत असते आणि परिणाम काहीही आला तरी, आपण प्रगल्भतेने निर्णय घेतला आहे, याचं समाधान त्यांना असतं, निर्णय चूक अशी किंवा बरोबर. पण हे समाधानच खूप महत्वाचं आहे.

याच जाणिवांच्या प्रगल्भतेबद्दल आज चिंतन करूया. प्रगल्भता म्हणजे ज्याला इंग्रजीत maturity म्हणतात, ते नक्की काय आणि त्यांचा जाणिवांशी काय संबंध याबद्दल बोलू. जाणीवा तुम्हाला प्राप्त परिस्थिती, त्याची विपरितता किंवा अनुकूलता, भूतकाळ, वर्तमान, पुढे येणारी वा येऊ शकणारी परिस्थिती, योग्य अयोग्यता, निर्णयाची परिणती वा परिणाम,या सर्वांचा साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करण्याची क्षमता किंवा अक्षमता देतात. खूप वेळा आपण एखाद्या व्यक्तीला बोलताना ऐकलं असेल की, मला चुकीचं काहीतरी जाणवतंय किंवा i can Sense something phishy in this. 

हाच जाणिवांच्या प्रगल्भतेचा पुढील टप्पा. अंतर्ज्ञान किंवा intuition हे याच जाणिवांच्या प्रगल्भतेचं द्योतक आहे. ही प्रगल्भता त्या व्यक्तीला, बहुतेक प्रकरणात, जन्मतः प्राप्त झालेली असते. त्यामुळे जाणिवांच्या जगताचा विचार करताना, दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात, त्या म्हणजे जाणिवांच्या माध्यमातून योग्य व अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि अंतर्ज्ञान या जाणिवांच्या अत्यंत प्रगत स्थितीत विचार करण्याची क्षमता.  ज्ञान, विचार, कर्म, क्रिया प्रतिक्रिया, सामाजिक पार्श्वभूमी या सर्व माध्यमातून, आपल्या जाणीवा प्रगत होतात किंवा अप्रगत व अविकसित राहतात. 

विचार करण्याची पद्धत व त्याद्वारे निर्णय घेऊन कृती करण्याची पद्धत, आपल्या जाणिवांच्या सद्यस्थितीवर अवलंबून असतं. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. अनेकदा आपण एखाद्या निर्णयाबद्दल भविष्यात पुढे, काही काळानंतर, नक्की विचार करतो की, हा माझा निर्णय वा वागणूक त्यावेळी चुकलीच किंवा मी असा निर्णय, त्यावेळी कसा घेतला, समजत नाही. पण आज असा निर्णय मी घेतला नसता किंवा असा वागलोच नसतो. म्हणजे काही काळानंतर जाणीवा बऱ्यापैकी प्रगल्भ झाल्या असणार. म्हणूनच आपण आपल्या अनेक चुकांचा फेरविचार, पुनर्विचार किंवा पश्चात्ताप करतो. 

यामधे चुकलेल्या निर्णय किंवा कृती यापेक्षासुद्धा आपण असे कसे वागू शकलो, याबद्दल आपण जास्त आश्चर्य चकित असतो. पण यात दोन गोष्टी लक्षात येतात की काही काळापूर्वी आपल्या जाणीवा किंवा senses तितके प्रगत वा प्रगल्भ नव्हते, ज्यामुळे आपण तसे वागलो किंवा तसा निर्णय घेतला. दुसरा म्हणजे आपलीच चुकीची बाजू काही काळानंतर, आपल्याच लक्षात येते, म्हणजे आपल्या आधीच्या बोथट किंवा अप्रगत जाणीवा, आता प्रगत किंवा तीक्ष्ण झाल्या आहेत. 

याचाच अर्थ, जाणीवा या कायम एकसारख्या असतं नाहीत व त्या काळ, अनुभव शिक्षण, ज्ञान यामुळे प्रगत होत जातात. अनुभव ज्ञान यासारख्या गोष्टी जाणिवांच्या लक्ष रुंदावतात. म्हणजेच ज्याला प्रगल्भता म्हणता येईल ते जाणिवांच्या कक्षांच रुंद होणं किंवा प्रसरण पावणं. याच विषयावर उद्या पुढे चिंतन सुरू ठेवूया. एक लक्षात घ्या या सर्व ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या भक्ति मार्गात कसा करून घ्यायचा आहे किंवा कसा होतो, हे त्यामुळे आपल्या लक्षात येईल.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...