श्रीकृष्ण नीति ११
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
श्रीकृष्ण या नावाबरोबर एक नाव जोड़ल गेलय ते म्हणजे राजकारण. या शब्दाची परिपूर्ण व्याख्या करणं, तसं मुश्किल आहे. राज्य करताना केलेली खलबतं किंवा कौशल्य आणि युक्त्या वापरून आपले डावपेच यशस्वी करण्याचा यत्न करणं किंवा हेतु सफल करण्यासाठी केलेली कृत्य. ही झाली एक मर्यादित व्याख्या.
अर्थात ह्यात फक्त राज्य करताना करण्यात आलेल्या युक्त्या, प्रयुक्त्या , डावपेच याचाच समावेश होतो. यात तोपर्यंत दृढ़ असलेले बरेच समज श्रीकृष्णानी खोटे ठरवत अनेक नवीन पायन्डे पाड़ले. शत्रूचा पूर्ण अंदाज घेणं, त्याची इथंबूत माहिती असणं , ती मिळवणं, शत्रूच्या ताकदीनुसार डाव आखणी करणं, त्या माहितीचा युद्धात आणि तहात उपयोग करून घेणं, या सर्व गोष्टीत नव नवीन युक्त्या वापरून कधीही कोणत्याही शत्रूला वरचढ होऊन दिलं नाही.
इथे एक गोष्ट जाणवते की, यातील अनेक कौशल्याचा वापर प्रत्यक्ष छत्रपतींनी आणि नन्तर पेशव्यानी करून अनेक लढाया मारलेल्या आहेत.
मुख्य तंत्र जे छत्रपतींनी वापरलं त्या गनिमी कावा तंत्राचा सुद्धा वापर प्राचीन काळात भगवंतानी केलेला आहे. पण एक महत्वाची गोष्ट की राजकारण हे फक्त राज्य करण्या साठी न वापरता, इतर क्षेत्रात सुद्धा त्याचा यशस्वी वापर श्रीकृष्णांनी केला. कालयवनाचा अंत, बलराम दादानी सुभेद्रेचं दुर्योधनाशी ठरवलेलं लग्न होऊ नये यासाठी योजलेली युक्ति वापरून अर्जुन सुभेद्रचं लग्न आणि त्यासाठीचा अर्जुनाचा त्रिदंडी सन्यास. प्रत्यक्ष महाभारत युद्धातसुद्धा अनेक युक्त्या वापरून, विजय पांडवांच्या हाती आणून दिला. कारण जर वासुदेव श्रीकृष्ण नसते, तर शूर असूनही विजय पांडवांना मिळणं मुश्किल नाही तर अशक्य होतं.
राजकारणात कट कारस्थान करणं,कुटनितीचा वापर करणं किंवा समोरच्याचे डाव उधळुन लावण्याची ताकद आणि त्याही पेक्षा व्रुत्ति असणं हे मधुसूदनाने जगाला पटवून दिलं. एक खुप मोठा दृष्टिकोण जगाला दिला, तो म्हणजे धर्माच्या बाजूने आहात म्हणजे साधे भोळेच असलं पाहिजे, असा कुठेही नियम नाही. तुम्ही दुसर्याला फसवू नका तितक्या खालच्या पातळीला जायची गरज नाही , पण दुसऱ्या कडून फसवले जाल इतके भोळे सुद्धा राहु नका.
राज्य करणं म्हणजे संतांची मठी चालवणं नाही. शत्रूला आणि त्याच्या चालीना आधी ओळखा, त्याचा अचूक अंदाज घ्या, त्याप्रमाणे आपले डावपेच आखा. हा खुप मोठा धड़ा, श्रीकृष्णाने आपल्या जीवन चरित्राने घालून दिला. चांगल्या राजाला प्रजेच्या रक्षणासाठी जे जे शक्य आहे आणि शक्य असेल, ते केलच पाहिजे. नव्हे ते त्याचं आद्य कर्तव्य आहे. वेळप्रसंगी अगदी युधिष्ठिरालासुद्धा या डावपेचात सामील करून घेतलं, म्हणजे येणाऱ्या काळात राजाने सुद्धा कूटनीती, कटास प्रतिकट. ठकास महाठक असलच पाहिजे.
आजच्या पुरत इथेच थांबूया . उदया निरोपसाठी भेटू.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
१३/०५/२०२०
भाग एकादश समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment