Skip to main content

श्रीकृष्ण नीति १

श्रीकृष्ण नीति १ 
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

युगांधर, युगपुरुष, युगप्रवर्तक, योगेश्वर, जगतोद्धारक , भक्तवत्सल,त्राता,तारणहार,अश्याच अगणित नामा भिधानाने या जगावर युगानुयुगे मोहिनी करून असलेल्या आणि आपल्या गुणवर्णन विशेषाहुन दशांगुळे उरलेला श्रीकृष्ण.कृष्णाच्या चरित्राचा वेध घेणं म्हणजे महा सागरात अणु सम एखादा कण शोधण्याइतकंच कठीण, किंबहुना अत्यंत दुरापास्त कर्म.त्यामुळे हा विषय विचारात येण्याची प्रेरणा,प्रत्यक्ष त्यानेच दिली असणार हेच गृहीत धरून, काही भागात कृष्णचरित्राचा विश्लेषणा त्मक मागोवा घेण्याचं ठरवून, हा लेख प्रपंच करण्याचं योजलं, अर्थात त्या योगेश्वराच्या आधारावरच हे सम्पूर्णा कडे जाईल हे निश्चित . 

या युगप्रवर्तक व्यक्तीच्या चरित्राचा विचार करण्याचं कारण म्हणजे, त्याच्या चरित्रातील विविधता. विश्व कवेत घेण्याची ताकद असणारा बालकृष्ण यशोदामातेला घाबरतो, तिच्या आज्ञेबाहेर नाही,पण तीच माता रागावल्या नन्तर तिचा रुसवा काढण्याची चलाखी, चातुर्य त्याच्याकड़े आहेच , पण त्याच बालरूपात पूतनासारख्या राक्षसीला मारण्याचं अचाट आणि अफाट सामर्थ्य त्याच बाहूत आहे, हेही विशेष. 

राधेसह समस्त गोपींच्या शब्दात बंदिवान होतो, सर्व गोपाळाना जमवून अनेक लीला करून देखील, कुठेही न अडकण्याच कौशल्यसुद्धा त्याच्यामध्ये मध्ये आहे. कंसा सह चाणूर, शिशुपाल, कालयवन आदिंचा वध करण्याचं सामर्थ्य असलेला हा युगपुरुष,त्यांची शंभर पाप भरण्याची वाट पाहू शकतो. आणि तीच शंभरी भरल्यावर क्षणांचा देखिल विचार करत नाही .

हाच परममित्र आहे आणि सुदामाला अनेक वर्षानी भेटल्यावर राजा असून देखील सिंहासनावर मित्राला बसवून, त्याचे पाय धुण्यापासुन पूर्ण आतिथ्य करण्याचा गृहस्थधर्म सुद्धा यांच्याकडे आहेच. त्याने न मागता सुद्धा युगानुयुगाचे दान मित्रकर्तव्य म्हणून फक्त काही पोह्यांच्या बदल्यात सहजी देण्यास तो विसरत नाही. किंबहुना काही मिळाल्यास तितकच व्याजाने देण्याची परम कर्तव्यता त्यांच्यात आहे. 

गृहस्थाश्रमी असताना रुक्मिणी, सत्यभामेसह आठ पट्ट राण्याच्याही अधीन आहेच.सर्वशक्तिमान असून सुद्धा निःशस्त्र राहून, अर्जुनासह पांडवां कड़ून महाभारता तील महायुद्धात,कौरवांसह समस्त दुष्टशक्तिंचा निःपात करून घेण्याची ताकदसुद्धा त्यांच्यात आहे. 

या सोळा विद्या चौसष्ठ कलांचा अधिष्ठाता असलेल्या आणि अनेक रुपात व रंगात विराजमान असून सुद्धा, त्यात कुठेही न गुंतलेल्या भगवंताच्या चरित्राचं आकर्षण कोणाला नसेल तरच आश्चर्य. पण हे करत असताना श्रीकृष्णाच्या चरित्रा तील विशेष गुणांचा मागोवा घेण हे या लेख मालेच मुख्य वैशिष्ट्य असेल. एक महामानव म्हणून त्याचं असेलेलं स्थान अधोरेखित करणं हाच मुख्य उद्देश्य. श्रीकृष्ण एक देव म्हणून नव्हे तर एक महामानव या अर्थी त्याच्या चरित्राचा वेध घेण हे उद्देश्य ठेवून हे कथासार सुरु करत आहे 

आज पुरत इथेच थांबून पुढील भागापासून कृष्ण चरित्राची एक एक पाकळी आणि विशेष पैलु हळूवारपणे उलगडून बघुया आणि पाहुया काय काय हाती लागतय.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!! 

© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०३/०५/२०२०
भाग प्रथम समाप्त 
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ 
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...