Skip to main content

श्रीकृष्ण नीति २

श्रीकृष्ण नीति २
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
 
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्णाच्या रूपाचं, स्वरूपाचं , उद्देशयांचं , ध्येयांचं , संबंधांचं आणि महत्वाच म्हणजे व्यक्तित्वाचं आकलन होणं शक्यप्राय नाही. म्हणून काही महत्वाचे पैलूच आपण पाहूया. मुख्य उद्देश त्यातून आजच्या काळाला सुसंगत काही सापडततं का आणि ते कितपत आचरण योग्य आहे, याचा पण विचार करूया . 

वास्तविक कृष्णलीलांची सुरवात ख़र तर त्याच्या जन्माच्याही आधीपासून सुरु झाली होती . कृष्ण जन्माचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीमागे कारण मीमांसा आहे. प्रत्येक घटनेमागे आधीच्या कोणत्याना कोणत्या तरी गोष्टीचा संदर्भ आहे. प्रत्यक्ष्य श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीला सुद्धा वालीच्या वधाची पूर्वपीठिका आहे. 

हा भाग नन्तर विस्ताराने येईलच अन्यथा विचार करा की, एक महाकाव्य लिहिलं सत्ययुगात वाल्मीकि ऋषिनी आणि दूसरं महाकाव्य लिहिलं गेलय द्वापरयुगात पण काही संदर्भ आलेत. अजुन एक संदर्भ आहे तो म्हणजे रामायण हे महाकाव्य घड़ण्याआधी लिहिलं गेलय, कित्येक वर्ष आधी आणि महाभारत हे महाकाव्य सर्व घडून गेल्यावर व्यास मुनिनी लिहून घेतलं. . 

आधीच्या जन्मात देवकीने तप करून स्वयं भगवान विष्णुना प्रसन्न करून घेतलं आणि पुत्ररूपात उदरी जन्म घेण्याची इच्छा प्रकट केली . पण हे त्याच जन्मात शक्य नसल्यामुळे भगवंतानी त्याना पुढील जन्मी म्हणजेच द्वापार युगात श्रीकृष्ण अवतारात देवकीच्या उदरी जन्म घेतला. 

हाच धागा सूत्र म्हणून धरून पुढे जायच ठरवूया आणि अनेक गोष्टींचा संदर्भ आधी शोधून काढू. ज्यायोगे कृष्णाच्या जन्मातील कर्म रहस्य, त्यायोगे आधी जाणून घेता येईल. कृष्ण चरित्रातील सर्वात महत्वाची गोष्ट ती ही की , हा जन्म सर्व समावेशक असल्यामुळे तो प्रत्येक रुपात त्या त्या गुणांचा पुरस्कार करतो . 

अश्याच अद्भुत रहस्यानी युक्त श्रीकृष्ण चरित्राचा रहस्य वेध करण्याचा प्रयत्न प्रभुकृपेने करणार आहे . बघुया कस कस होतय ते. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले 
०४/०५/२०२० (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
भाग द्वितीय समाप्त 
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ 
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...