Skip to main content

अध्यात्म विराम ९२

अध्यात्म विराम ९२

सख्य आणि भक्ती हे बऱ्याच प्रमाणात समान आहेत. सख्य म्हटलं की, सखा हा नेहमी बरोबरीचा असतो. एकमेकांच्या मनात, समान पातळीवरील भाव आणि भावना असतात. एकमेकांविषयी जिव्हाळा, स्नेह आणि ममत्व समान असतं. अनेकदा आपल्याला अश्या मत्रीच्या गोष्टी वाचायला मिळतात ज्यामधे, ये ह्रदयीचे ते हृदयी, न सांगताही कळले, असं घडतं. बरं असं घडणं, हा निव्वळ योगायोग नसतो, तर तो समान पातळीवरील, विचारांची, मनाची समसमान आंदोलनं, समान स्पंदनं आणि समान लहरींचं प्रसारित होणं, या गोष्टी सहजी घडतात.

लहरींचं प्रसारित होणंच नव्हे तर, त्या लहरींचं दुसऱ्याच्या मनाने ऐकून, समान साद देणं, हेदेखील सहजी घडतं. म्हणजेच कोणतीही गोष्ट मुद्दाम कळवावी लागत नाही, एकमेकांना. सर्व काही आलबेल असेल असं नक्कीच नाही. पण काहीही गैर घडल्यास आपला सखा समजून आणि सांभाळून घेईल, हा विश्वास दृढ असतो किंवा असावा. किंबहुना विश्वासाच्या एका अदृश्य धाग्याने, हे सख्यत्वाचे संबंध, दृढ केलेले असतात. हा धागा खूप कोमल, पण त्या दोन्ही हृदयातील भावनांनी बांधलेला आणि मजबूत असतो. 

सख्य खरं आणि मनातून असेल तर, प्रत्यक्ष बोलण्या शिवाय संवाद, प्रत्यक्ष नजर भेट न होता चर्येवरील व डोळ्यातील भाव व मनात व्यक्त केलेले विचार या मनातून त्या मनात पोचतात. हे विज्ञान आहे. यात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नाही. याचं खूप महत्त्वाचं कारण, म्हणजे मन, वाचा, बुद्धी आणि देह अनेक प्रकारच्या लहरी प्रसारित करतात. प्रत्यक्ष वाचेने, नजरेतून सांगून किंवा चेहऱ्यावरील हावभावात ते प्रकट होत असल्यामुळे समोरच्याला श्रवणाने, दृष्टीने, बुद्धीने जाणता येतं. 

पण मनातून केलेले विचार ओळखायला, समोरच्या व्यक्तीच्या मनाशी तादात्म्य पावता, एकरूप होता आले पाहिजे. त्यासाठी मनाने, बुद्धीने, आत्म्याने त्या व्यक्तीच्या भावभावना, व्यक्तित्व इत्यादींची ओळख असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीला आपण खूप जवळून ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. हे ओळखण किंवा जाणणं फक्त व्यक्तित्व जाणणं नसून, मनातील सारे भाव कळणं. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर, त्याच्या मनात उठणारे, विचारतरंग, विचारकंपनं, विचारलहरी तिकडे उठताच, त्याचा साद इकडे तसाच्या तसा उमटला, जाणवला पाहिजे. 

असं सख्य किंवा मैत्रीचे भाव या मनातून त्या मनात त्याचवेळी प्रकट होतील, जेंव्हा दोघानाही एकमेकांबद्दल एकच भाव वाटत असेल. अश्या अतूट सख्य किंवा मैत्रीचे बंध जुळलेल्या दोन महत्वाच्या जोड्या म्हणजे कृष्ण- सुदामा आणि कृष्ण-अर्जुन.या दोन्ही उदाहरणात एक महत्वाचा दुवा आहे आणि एक महत्वाचा भेद सुद्धा आहे. दुवा म्हणजे दोन्हींमध्ये एक समान सूत्र आहे, ते म्हणजे परम ईश्वर श्रीकृष्ण.भेद हा की,सुदामा कृष्णाचा बाल सखा होता. पण अर्जुन आणि कृष्ण हे एकमेकांना खूप उशिरा भेटले.

या सख्य भक्तीच्या अनेक पैलूंवर उद्याच्या भागात प्रकाश टाकूया. पण तोपर्यंत, ईश्वराला आपला सखा म्हणून जाणण्याच्या मार्गातील आपला सहभाग, नामाने सुरू ठेवला आहे, तो सहभाग तसाच चालू ठेवूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...