Skip to main content

अध्यात्म विराम ९९

अध्यात्म विराम ९९
 
आपण मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे, भौतिक व ऐहिक जगतातील सख्य जाणणारे सखे हे सुख दुःख या जाळत आपल्याला साथ देतात. त्यांची साथ नक्कीच मोलाची असते, यात वाद असायचं कारण नाही. कारण आयुष्यात कधीकधी उभे राहण्यासाठी किंवा जगण्या साठी त्या साथीची व अशा सख्यांची जरुरी असतेच असते. यात दुमत असायचे कारण नाही.

पण फक्त जगण्याचा संघर्ष हेच जीवनाचं अंतिम ध्येय असू शकत नाही. तो काही ठराविक काळासाठी अस्तित्वाचा लढा असू शकतो. त्या काळातील सखे हे आपल्या लक्षात अनंत काळापर्यंत राहू शकतात. पण फक्त चाकोरीबद्ध जीवन म्हणजे संपूर्ण जीवन नाही. जन्म जन्माच्या अनेक शृंखलाचा विचार केला तर आपलं सत्तर ऐंशी वर्षांचं साधं व सहज जगलेल जीवन हे आपल्या आत्मिक प्रगतीच्या दृष्टीने शून्य टक्के प्रगती. असलेलं जीवन म्हणता येईल. 

विधात्याच्या व्यापक दृष्टीने विचार केला तर, आपण त्याने दिलेल्या काही क्षणांच्या जीवनात ( हजारो वर्षांचा अनेक जन्मांचा, आत्म्याचा प्रवास पाहिल्यास, सत्तर ऐंशी वर्षं ही काही मिनिटं किंवा तास यांच्या प्रमाणे आहेत. ज्यामधे आपण, आत्म्याच्या दृष्टिकोनातून काहीही भरीव केलं नाही तर, नक्कीच निरुपयोगी जीवन जगलो. 

विधात्याच्या दृष्टीने आपण करत असलेली नित्य कर्म व जीवन जगण्याचा सर्वसामान्य प्रवास हा भौतिक जगता तील एक नित्य बाब झाली. पण आत्म्याचा खरा प्रवास हा, फक्त एक देह ते दुसरा देह, इतकाच नसून, त्या आत्म्याला, त्याच्या मूळ स्थानी घेऊन जाणे, हे देह, मन, बुद्धी यांच्या संयुक्त प्रयत्नाने साधले पाहिजे. म्हणूनच त्यासाठी आपली कर्माची संचित साठवण कमी करत आणून, त्यात नवीन कर्मांची भर पडणार नाही, याची सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

यामधे आपल्याला जो खरी साथ देईल, तो आपला दुसरा आणि खरा सखा समजावा. कारण त्याला आत्म्याचे हित अहित पाहून, प्रसंगी, साथ वा सहाय्य न करण्याचा कटू निर्णय सुद्धा घ्यावा लागतो. म्हणजेच प्रसंगोपात, जेंव्हा ईश्वर आपल्या पडत्या काळात कधीकधी सहाय्य भूत न होता फक्त साक्षीभूत राहतो, तेंव्हा त्या सहाय्य न करण्याच्या भूमिके मागे, अंतिम हित आत्म्याचे आहे जाणावे. हाच विषय आपण उद्याच्या भागात पुढे सुरू ठेवूया. तोपर्यंत आपला खरा हितदर्शी, जो ईश्वर, त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...