Skip to main content

भोग आणि ईश्वर १७७

भोग आणि ईश्वर  १७७

नाम घेताना मन एकाग्र होत नाही, अशी एक तक्रार ऐकायला मिळते. वास्तविक एकाग्र या शब्दातच, त्याचं सारं सार दडलंय. एका अग्रावर अर्थात टोकावर मन स्थिर ठेवून, मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकाग्रता साधणं. कदाचित हा शब्द, ध्यान धारणा करणारे किंवा धनुर्विद्येचा अभ्यास करणारे, या पैकी कोणीतरी शोधून वा यांच्या कृतीतून अपभ्रंशाने तयार झाला असावा.

म्हणजे एकाग्रता या शब्दामध्येच, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरी, काय अपेक्षित आहे, ते समजतं. एक म्हणजे एक नाम आणि त्या एका नामाच्या अग्रावर आपण मन स्थिर करायचं. म्हणजे यात दोन कृती आहेत, किंवा दोन कार्य अपेक्षित आहेत. एक मन किंवा मनाचे सर्व घटक एकत्रित करणं आणि त्यांना लक्षाकडे नेऊन, तिथे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत, ती स्थिरता साधत कार्य करणं.  

विचार करा की, कोणत्याही वस्तूचे, लक्षाचे अग्र, अर्थात टोक किती सूक्ष्म असणार. त्या सूक्ष्म लक्ष्यावर मन केंद्रित करून, तिथे ते मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे किती गाढा अभ्यास करावा लागत असेल. कारण मुळात मन चंचल, डोळे कधीही फार स्थिर राहणार नाहीत, कारण पापण्या या नेहमी उघडझाप करत राहणार, त्या दोहोंना स्थिर करून मग ध्यानधारणा करणं, म्हणजे किती महत्प्रयास लागत असतील. 

अर्थात लक्ष मनात असेल, इच्छा तीव्र केली आणि तिची शक्ती मनापाठी लावली की, हा योग साध्य होतो.पण यामध्ये चित्ताची शुद्धता आणि निरागसता या गुणांची जरुरी असते, तरच मनाला योग्य ती इच्छाशक्ती प्रेरित करू शकते. चित्तशुद्धी साधायला, सर्व प्रकारचा राग, द्वेष, मत्सर आदीं सह सर्व वासना या पूर्ण शांत असणं किंवा त्या नसणं अपेक्षित आहे. म्हणजेच सहा शत्रूंना मनात प्रवेशबंदी घालून, त्याची सवय अर्थात योग साधून मगच चित्तशुद्धी करणं गरजेचं आहे. 

म्हणजेच एकाग्रतेला चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीसाठी मनात कोणतंही पाप, मोह वा इतर वासना नसल्या पाहिजेत. त्या नसतील तर मायासुद्धा आड येणार नाही. एकाग्रतेची पहिली पायरी चित्तशुद्धी, त्यानंतर संकल्प. संकल्प यासाठी जरुरी आहे की, त्यायोगे मनातील सर्व विकल्प अर्थात शंकाकुशंका इत्यादी पर्याय नष्ट करणं, हेदेखील तितकंच महत्वाचं आहे. कारण विकल्प हे मनाला अस्थिर करतात, ध्येयाबद्दल किंतु निर्माण करतात, मायेचा खेळ साध्य करतात आणि एकाग्रता भंग करतात. 

विकल्प हे विषासारखे असतात. ते हळूहळू मनात किल्मिष निर्माण करून, मनाला साशंक बनवतात. जेणेकरून द्वैत निर्माण होईल. द्वैत म्हणजे जिथे एकमत नाही अर्थात साशंकता आहे. एकाचवेळी मनात द्विभाव उत्पन्न होणं म्हणजे द्वैत आणि अश्या भावाचा अभाव म्हणजे अद्वैत. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजेच एक प्रख्यात वाक्य to be or not to be. म्हणजेच करू की नको करू. 

साधनेत बरेचदा अश्या वेळा येतात, का करू,काय उपयोग, कोणाला काय फायदा झाला, कुठे काय फरक पडतोय, तसाही हा जन्म आहे पुढचा कोणी पाहिलाय इत्यादी अनेक प्रश्न मनात येतातच. पण त्यांना मागे सारून, नेटाने नाम घेत साधना सुरू ठेवायला या सर्व विकल्पांना बाजूला सारता आलं पाहिजे. एक छोटं उदाहरण घेऊ. आपलं मूल लहान असताना, कित्येकदा मनावर दगड ठेवून, कर्तव्याच्या पूर्ततेसाठी आपण ऑफिसला जातोच ना. तसंच विकल्प बाजूला सारून नामकडे दृढतेने पुन्हा वळायचं. 

म्हणजेच विकल्प येणार नाहीत अशी परिस्थिती येऊ शकत नाही, कारण मन आहे तर विचार, विकार येणारच, पण त्यात मनाला अडकू न देता, पुढे जाणं याला साधुवृत्ती म्हणतात. विकल्पातून संकल्पाची सिद्धता साधणं आणि पुढे पुढे जाणं. 

एकाग्रतेच्या मार्गातील अजूनही काही गोष्टी, अडचणी आणि काळज्या पाहूया, उद्याच्या भागात, तोपर्यंत नामात रहा, साधनेत रहा. एक दोन दिवसात श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या पुस्तकाबद्दल पोस्ट येईल, तेव्हा लक्ष ठेवा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...