अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ४
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।
वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
विज्ञान, हे या जगताच्या खरतर अणूरेणुत सामावलेलं आहे आणि सर्व चराचर या विज्ञानाचाच भाग आहे. विज्ञान नाही तर हे जगत अस्तित्वात आलंच नसतं. कारण प्रत्येक कणामागे शास्त्र, ज्ञान आणि विज्ञान भरलेलं आहे. किंबहुना विज्ञानाच्या अधिष्ठानावरच या ब्रह्मांडाचं अस्तित्व आहे.
जिथे आपलं अस्तित्वच विज्ञानमय आहे तिथे, आता आपण पाश्चात्यांमुळे विज्ञानाची ओळख करत आहोत, असा एक सार्वत्रिक समज आहे. मुळात इथे हे लक्षात घ्या की, या जगतातील चराचरात वसलेलं विज्ञान जाणायला आता त्यांनी सुरवात केली. आपण हे सर्व पुराणकाळात जाणलं ओळखलं आणि अभ्यासून कागदोपत्री बद्ध करून, गणित, शास्त्र, यांची मांडणी, एका सूत्रबद्ध पद्धतीने आधीच नोंदवली होती.
पुराणकाळात सहजी अस्तित्वात असलेल्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य आपल्यासमोर मांडत आहेत, यात त्यांच्या बुद्धीला कमी लेखण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. पण आपण ते गमावून, आता नव्याने त्याबद्दल आश्चर्यचकित होतो, कारण या सर्वांच्या कारणांचा शोध मागोवा लिपीबद्ध करून मंत्रांच्या रुपात तो आपण ठेवला होताच, तो आपण पूर्ण विसरलो.
वानगीदाखल, विमानाचा वापर आपल्याकडे पुराणकाळात सुदधा झाल्याचे दाखले, त्यासंबंधीची तपशीलवार शिल्प, हे सर्व आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचे पुरावेच आहेत. गणितातील अनेक प्रमेय, ही वेदात असल्याचं आता सिद्ध होऊ लागलं आहे. आज हेदेखील लक्षात येतंय की विश्वात आज शोधल्या गेलेल्या वा शोधल्या जात असलेल्या बऱ्याच गोष्टी इथे वापरल्या गेल्याचं वेद, पुराणात सापडत आहे.
आज मानव साधत असलेली प्रगतीची नवनवीन शिखरं हेच दर्शवतात की, कदाचित आपण त्याच वाटेकडे पुन्हा जात आहोत, जिथे कधीकाळी माणूस पोचला होता. पृथ्वीच्या पाठीवर हे सर्व या भरतभूमीत याआधी कित्येक शतकांपूर्वी अस्तित्वात होतच, पण त्याआधीही कित्येक युगे सहज वापरात होतं.
या सर्व वैज्ञानिक प्रगतीमागे प्रत्यक्ष कोण कार्यकारण आहे तर श्रीगणेश. किंबहुना सर्व ज्ञान, विज्ञान याचा कर्ता करविता श्रीगणेश आहे. सर्व जगत , ब्रह्मांड, यांसह ज्ञात अज्ञात विश्वातील सर्व ज्ञान व या अस्तित्वामागचं विज्ञान, त्या विज्ञानाचे सर्व घटक हे श्रीगणेशापासूनच सुरू होतात आणि श्रीगणेशातच त्यांचा अंत होतो. अर्थात आदी आणि अंत दोन्ही श्रीगणेश आहे.
म्हणजेच आपण साधत असलेल्या प्रगतीमागील विज्ञानाच्या सर्व समीकरणांचा सूत्रधार आणि सर्व सुत्रांचं उत्तर हे श्रीगणेशापाशीच येऊन थांबणार, असाच याचा अर्थ होतो. याचाच अर्थ, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या, एका वैज्ञानिक प्रयोगातील तो देवकण हा कदाचित श्रीगणेश किंवा त्यांच्या एखाद्या सूत्राशी निगडित असू शकेल. खरतर या आपल्याकडील ज्ञानावर पाश्चात्य जगत आज संशोधन करत आहेत, ज्यांनी काही शतकांपूर्वी याच ज्ञानाला आणि ग्रंथांना कपोल कल्पित म्हणून संबोधून टवाळी केली होती.
आज त्यांनाच त्यातील ज्ञान, विज्ञान यांचा शोध घ्यावासा वाटतोय आणि ज्यांच्या हाती हा अनमोल ठेवा होता किंवा आहे, ते याबद्दल विचारही न करता पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात. हे आज जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष पेरलेलं, स्वधर्माच्या हेटाळणीचं बीज, आता पूर्ण फोफावू पहात आहे. अर्थात श्रीगणेश याबद्दल या भूमीतील लोकांना नक्की सद्बुद्धी देईल, हा विश्वास आहेच.
श्रीगणेशाच्या ब्रह्ममे स्वरूपाबद्दल उद्या विवेचन करूया.
जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२१
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।
वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
विज्ञान, हे या जगताच्या खरतर अणूरेणुत सामावलेलं आहे आणि सर्व चराचर या विज्ञानाचाच भाग आहे. विज्ञान नाही तर हे जगत अस्तित्वात आलंच नसतं. कारण प्रत्येक कणामागे शास्त्र, ज्ञान आणि विज्ञान भरलेलं आहे. किंबहुना विज्ञानाच्या अधिष्ठानावरच या ब्रह्मांडाचं अस्तित्व आहे.
जिथे आपलं अस्तित्वच विज्ञानमय आहे तिथे, आता आपण पाश्चात्यांमुळे विज्ञानाची ओळख करत आहोत, असा एक सार्वत्रिक समज आहे. मुळात इथे हे लक्षात घ्या की, या जगतातील चराचरात वसलेलं विज्ञान जाणायला आता त्यांनी सुरवात केली. आपण हे सर्व पुराणकाळात जाणलं ओळखलं आणि अभ्यासून कागदोपत्री बद्ध करून, गणित, शास्त्र, यांची मांडणी, एका सूत्रबद्ध पद्धतीने आधीच नोंदवली होती.
पुराणकाळात सहजी अस्तित्वात असलेल्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य आपल्यासमोर मांडत आहेत, यात त्यांच्या बुद्धीला कमी लेखण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. पण आपण ते गमावून, आता नव्याने त्याबद्दल आश्चर्यचकित होतो, कारण या सर्वांच्या कारणांचा शोध मागोवा लिपीबद्ध करून मंत्रांच्या रुपात तो आपण ठेवला होताच, तो आपण पूर्ण विसरलो.
वानगीदाखल, विमानाचा वापर आपल्याकडे पुराणकाळात सुदधा झाल्याचे दाखले, त्यासंबंधीची तपशीलवार शिल्प, हे सर्व आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचे पुरावेच आहेत. गणितातील अनेक प्रमेय, ही वेदात असल्याचं आता सिद्ध होऊ लागलं आहे. आज हेदेखील लक्षात येतंय की विश्वात आज शोधल्या गेलेल्या वा शोधल्या जात असलेल्या बऱ्याच गोष्टी इथे वापरल्या गेल्याचं वेद, पुराणात सापडत आहे.
आज मानव साधत असलेली प्रगतीची नवनवीन शिखरं हेच दर्शवतात की, कदाचित आपण त्याच वाटेकडे पुन्हा जात आहोत, जिथे कधीकाळी माणूस पोचला होता. पृथ्वीच्या पाठीवर हे सर्व या भरतभूमीत याआधी कित्येक शतकांपूर्वी अस्तित्वात होतच, पण त्याआधीही कित्येक युगे सहज वापरात होतं.
या सर्व वैज्ञानिक प्रगतीमागे प्रत्यक्ष कोण कार्यकारण आहे तर श्रीगणेश. किंबहुना सर्व ज्ञान, विज्ञान याचा कर्ता करविता श्रीगणेश आहे. सर्व जगत , ब्रह्मांड, यांसह ज्ञात अज्ञात विश्वातील सर्व ज्ञान व या अस्तित्वामागचं विज्ञान, त्या विज्ञानाचे सर्व घटक हे श्रीगणेशापासूनच सुरू होतात आणि श्रीगणेशातच त्यांचा अंत होतो. अर्थात आदी आणि अंत दोन्ही श्रीगणेश आहे.
म्हणजेच आपण साधत असलेल्या प्रगतीमागील विज्ञानाच्या सर्व समीकरणांचा सूत्रधार आणि सर्व सुत्रांचं उत्तर हे श्रीगणेशापाशीच येऊन थांबणार, असाच याचा अर्थ होतो. याचाच अर्थ, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या, एका वैज्ञानिक प्रयोगातील तो देवकण हा कदाचित श्रीगणेश किंवा त्यांच्या एखाद्या सूत्राशी निगडित असू शकेल. खरतर या आपल्याकडील ज्ञानावर पाश्चात्य जगत आज संशोधन करत आहेत, ज्यांनी काही शतकांपूर्वी याच ज्ञानाला आणि ग्रंथांना कपोल कल्पित म्हणून संबोधून टवाळी केली होती.
आज त्यांनाच त्यातील ज्ञान, विज्ञान यांचा शोध घ्यावासा वाटतोय आणि ज्यांच्या हाती हा अनमोल ठेवा होता किंवा आहे, ते याबद्दल विचारही न करता पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात. हे आज जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष पेरलेलं, स्वधर्माच्या हेटाळणीचं बीज, आता पूर्ण फोफावू पहात आहे. अर्थात श्रीगणेश याबद्दल या भूमीतील लोकांना नक्की सद्बुद्धी देईल, हा विश्वास आहेच.
श्रीगणेशाच्या ब्रह्ममे स्वरूपाबद्दल उद्या विवेचन करूया.
जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२१
Comments
Post a Comment