Skip to main content

भोग आणि ईश्वर १५४

भोग आणि ईश्वर  १५४
 
एखाद्या मंत्राचा जाप केल्याने निर्माण होणारी कंपनं, त्या मंत्रांच्या मूळ शक्तीस्रोतांच्या शक्तीप्रमाणात निर्माण होऊन, उच्चारणापश्चात त्यांची कंपनसंख्या वेग व व्याप्ती, त्या म्हणणाऱ्याच्या मानसिक शक्तीमुळे गुणोत्तरीत होतो. असा एखादा शक्तीजाप व मंत्रोच्चारण करताना योग्य मानसिक भूमिका आणि मनातील उर्जाना सकारात्मकतेचा जोर असेल तर निर्माण होणाऱ्या लहरींची वा कंपनांची गती आणि शक्ती त्या पटीत वाढते.

विशिष्ट कारणासाठीचे मंत्र, जाप स्तोत्र इत्यादी, विशिष्ट हेतू मनात योजून, विशिष्ट कार्याप्रीत्यर्थ, अर्थात सहेतुकच म्हणावे. याचं कारण असं की,त्या त्या कार्याची शक्ती प्राप्त असलेल्या त्या त्या विशिष्ट देवता अथवा शक्तीस्थानं ही त्या कार्या साठीच जागृत असतात आणि केली जातात. परंतु अन्यथा करण्यात आलेल्या मंत्रोच्चाराच्या लहरी वा कंपनं अहेतुकच त्या शक्तीला जागृत करतात. 

अश्या जागृत केलेल्या उर्जेला वा शक्तीला, जागृतीनन्तर उचित कार्य नसेल तर, त्या निर्माण उर्जेचा वा शक्तीचा चुकीचा वापर  होण्याची शक्यता असते. कारण शास्त्रीय सिद्धांता नुसार हे सिद्ध झालेले आहे, की एकदा निर्माण झालेली ऊर्जा वा शक्ती नष्ट करता येत नाही, फक्त तिचा वापर करता येतो आणि तिचं स्वरूप बदलता येतं. म्हणून विशिष्ट कार्यासाठीचे मंत्र रिकामपाणी वा छंद म्हणून, म्हणू नयेत वा त्यांच्याशी उगाचच छेडछाड करू नये. 

परंतु आपला नित्य नामाचा मंत्र वा जाप हा अहेतुक वा सहेतुक जरी केला तरी, त्यातून निर्माण होणारी कंपनं योग्य ती ऊर्जा शक्ती निर्माण करतात. मात्र कालच सांगितल्या प्रमाणे सकारात्मक मनःस्थितीत म्हटले तर इच्छित लहरी वा कंपनं निर्माण करण्यास सक्षम असतात. अजून एक प्रश्न जो नेहमी मनात येतो तो म्हणजे नामस्मरणाने काय साध्य होणार.

बाकी लाभ काय याचा नन्तर  विचार करू. असा विचार करा की आपण काहीही काम न करता स्वस्थ बसून आहोत. अशावेळी मनात काहिनाकाही विचार येतच राहणार. त्यात चिंता, काळज्या, गैरविचार इत्यादी प्रथम येणार.ज्यामुळे सकारात्मकता नष्ट होऊन मनाची शक्ती क्षीण होऊन, त्याचा परिणाम देह अर्थात शरीरांतर्गत होणार. चुकीचे हार्मोन्स निर्माण होऊन, त्याचा परिणाम एकूणच स्वास्थ्यावर होणार. 

हे सर्व अकारण नकारात्मक विचार करत बसल्याने होणार. तुम्ही स्वतः कधीतरी नोंद घ्या की, चुकीच्या , नकारात्मक विचारांनी शरीरावर किती दुष्परिणाम होतो. याउलट सकारात्मक विचार करत गेल्यास मनःस्वास्थ्य सुधारतच, पण हार्मोनल बॅलन्स राहून शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो आणि हे शास्त्राने देखील सिद्ध केलं आहे. 

मग अशी सकारात्मक मनःस्थिती कायमस्वरूपी लाभावी म्हणून जाणूनबुजून प्रयत्न करणं हितकारक आहे. परंतु अशा प्रकारचे समतोल विचार सतत मुद्दामहून करत राहणं जमेलच असं नाही. अन्यथा त्यासाठी योग , ध्यान इत्यादी करत राहणं गरजेचं आहे.  पण हे सर्वांनाच जमेल हे शक्य नाही. म्हणून अश्या प्रकारचे सकारात्मक विचार व तशी विचारसरणी जाणूनबुजून जोपासण्यासाठी सर्वात सहजसाध्य  साधन म्हणजे नाम. म्हणजे ईश्वरी हेतू मनात न धरतासुद्धा आपल्याला मात्र शारीरिक व मानसिक लाभ प्राप्त करण्या साठी नाम घेण्यास काहीच हरकत नाही. 

नामाचे शरीरांतर्गत इतरही अनेक लाभ आहेत, त्यावर उद्या चर्चा करूया तोपर्यंत नामात रहा, मार्गात रहा.

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...